Saturday 12 January 2019

ऑगस्टा वेस्टलॅंड भाग ६

Image result for raju santhanam


Zee Television's Execuive Editor Raju Santhanam

मिशेलमामांचे पिताश्री काय करत होते हे तर आपण वाचले पण त्यांच्या मातोश्री देखील बड्या असामीच होत्या. व्हॅलरी फूक्स ह्यांच्या निवासस्थानाविषयी मी आधी लिहिले आहे. ख्रिश्चियन आणि व्हॅलरी दोघेही एका ट्रस्ट्मध्ये ट्रस्टी आहेत - कायदा एज्युकेशनल ट्रस्ट - ह्याची नोंदणी ब्रिटनमध्ये आहे आणि ट्रस्ट तर्फे परदेशामध्ये शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना मदत करणे हा उद्देश होता. पण आर्थिक वर्ष उलटून दहा महिने हो ऊन गेले तरी ट्रस्टने आजवर आपल्या आर्थिक ताळेबंदाची माहिती चॅरिटी कमिशनरकडे दिलेली नाही असे कमिशनर म्हणतात.  हे गंभीर असून आम्ही हे तपशील मिळवायच्या प्रयत्नात आहोत कारण कायद्यानुसार प्रत्येक ट्रस्टने आपल्या निधीचा विनियोग कसा केला हे जाणण्याचा नागरिकांना हक्क असतो. कमिशनरच्या प्रवक्त्याने असेही म्हटले की ख्रिश्चन मिशेलवरील आरोपांबद्दल आमच्याकडे माहिती आहे. ट्रस्टतर्फे नेमक्या कोणत्या "भारतीय" मुलांना "शिक्षणासाठी" आर्थिक मदत मिळाली व किती मिळाली ह्याची कोणतीही माहिती मिळत नाही. ह्या तपशीलामध्ये अथवा ट्रस्टचे आर्थिक व्यवहार कमिशनरकडे देण्यामध्ये काय अडचन असू शकते हे कोडेच नाही का? स्वतः व्हॅलरी ह्यांची राहणी एखाद्या अब्जोपतीसारखी आहे. विशेष नोंद अशी की ह्याच ट्रस्टचे अन्य दोन ट्रस्टी म्हणून निवृत्त मेजर जनरल एस सी एन जठार आणि एस एन इनामदार अशी नावे मिळतात. हेच जठार साहेब पुणे येथे नागरिक चेतना मंच म्हणून संस्था चालवतात आणि पारदर्शक व चोख सरकारविषयक आग्रही आहेत असे दिसते. आधार कार्डावरती आक्षेप घेणारी याचिका त्यांच्याच संस्थेने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. मल्ल्या आणि चोकसी ह्यांच्यावर सरकारचे नियंत्रण नाही पण गरीबांच्या तोंडच्या घासावर त्यांना नियंत्रण हवे आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. IDSA ह्या ख्यातनाम संस्थेतर्फे जी वेबसाईट चालवली जाते तिच्यात साहेबांचे लेख आहेत. ऑईल इंडिया लि. आणि ओएनजीसी विदेश लि. ह्या कंपन्यांचे ते माजी चेयरमन व डायरेक्टर म्हणून काम करत होते. त्यांना ह्या पदावरून हाकलावे म्हणून आसाम स्टुडंटस् युनियनने मोठे आंदोलन केले होते. 

मिचेलचे भारतामधले जाळे काही व्यक्तींवर अवलंबून होते त्यामधले आर के नंदा आणि जे बी सुब्रमण्यम हे मिडिया एक्झिम कंपनीमध्ये होते. जावेद युनुस् ओएनजीसीमध्ये जॉईंट डायरेक्टर होते. त्यांच्या मध्यस्थीने मिशेलने अनेक ओळखी मिळवल्या. या व्यतिरिक्त अन्य नावे या आधी आलेलीच आहेत. मिशेलने भारतामध्ये अनेक बेनामी मिळकती जमा केल्या होत्या. सफदर एन्क्लेव्ह - सातबारी - डीएलफ गुरगाव येथील मिळकतींविषयी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटकडे आज माहिती आहे. दिल्लीजवळच्या छत्तरपूरमध्ये त्याने एक फार्महाऊस घेतले होते. झी न्यूजचे राजू संथानम मिशेलच्या विशेष जवळचे होते. १९९८ पासून आजपर्यंत मिशेल भारतमध्ये ३०० वेळा आला. गेल्या वीस वर्षांमध्ये नारायण बहादुर हा ड्रायव्हर त्याच्याबरोबर नेहमी असे. पोलिसांनी नारायण बहादुरला ताब्यात घेऊन त्याच्याकडून महत्वाची माहिती मिळवली आहे. भारतामध्ये आल्यावरती मिशेल राजू संथानम - आर के नंदा - रॉबिन थलिया - समीर पांडे - प्रभात कुमार - मेजर जनरल एस सी एन जठार - ख्रिस - मार्क व पीटर ह्यांना स्वतःच्या घरी किंवा हॉटेल हयात वा इंपिरियल इथे भेटला होता. ह्यापैकी ख्रिस मार्क व पीटर ह्यांना नारायण बहादुर सैनिकी फार्म्स ह्या संजीव त्यागी ह्यांच्या बंगल्यापर्यंत घेऊन गेला होता असे नारायणने पोलिसांना सांगितले. यातील समीर पांडे हा सत्यम कॉम्प्युटर्स मध्ये काम करत असे!!! कालच्याच लेखामध्ये मी सत्यम कॉम्प्युटर्सचा उल्लेख केला होता. 

मिशेलशी जोडलेली दुसरी कंपनी म्हणजे ग्लोबल ट्रेड एंड कॉमर्स लि. यूके. ह्या कंपनीने पवनहंस कडून निकामी झालेली हेलिकॉप्टर्स विकत घेण्यासाठी एक कोटी ८२ लाख युरोची बिले बनवली होती. पण प्रत्यक्षात व्यवहार झालाच नाही. त्यामुळे ही रक्कम भारतामध्ये आली का आणि ती कशी वापरली गेली हे एक कोडेच नाही का? 

पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये आपल्या ड्रायव्हरमार्फत मिशेल विमल नागपाल - सामा आणि सुबी ह्यांना पैसे पाठवत असे असा उल्लेख आहे. ह्यापैकी नागपाल हा वेस्टलॅंड सपोर्ट सर्व्हिसेस लि. ह्या आगुस्ता वेस्टलॅंडच्या सबसिडियरीमध्ये कर्मचारी होता. सामा आणि सुबीचे तपशील अजून पोलिसांनी सांगितलेले नाहीत. नागपालला पंधरा लाख रुपये नगद कर्जापोटी दिल्याची नोंद मिळते. ह्याशिवाय दहा लाख रुपये अनिल अरोरा नामक गृहस्थाला दिले गेले होते. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वायुदलाने सिम्युलेटर घेण्याचे मान्य केले तर अरोरांच्या कंपनीला ते काम देण्याचे मिशेलने आश्वासन दिले होते. २०१२ मध्ये मिशेल शेवटचा भारतामध्ये आला. त्यानंतर तो दुबई येथूनच सूत्रे हलवत होता. पण जाण्यापूर्वी त्याने आपली सगळी संपत्ती इथे विकून टाकली होती. 

सर्वांच्या उत्सुकतेचा कळस असेल तो मिशेलने तोंडे बंद ठेवण्यासाठी इथल्या पत्रकारांना किती पैसे चारले ते उघडकीला येण्यात. मिशेलच्या ग्लोबल सर्व्हिसेस् एफझेडइ कंपनीला आगुस्तावेस्टलॅंड कंपनी दरमहा पावणे तीन लाख पौंड पाठवत होती. ही रक्कम पत्रकारांसाठी होती असे म्हटले जाते. मिशेलची रिटेनरशिप घेतलेले पत्रकार राजू संथानम ह्यांनी आपल्याला मिशेलकडून पैसे मिळाल्याची कबूली दिली असून ते सरकारच्या बाजूने साक्ष देतील अशी शक्यता वरतवली जाते. ८ नोव्हेंबर २०१५ मध्ये म्हणे मिशेलने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सीबीआयतर्फे होणार्‍या आपल्या तपासाविषयी नाराजी व्यक्त केली होती अशी बातमी एका वर्तमानपत्राने छापली. तसेच त्या पत्राचा काही भागही प्रसिद्ध केला. पत्राखाली मिशेलचे संपूर्ण नाव नसून केवळ जेम्स असे लिहिले आहे. जर पत्र खरे असेल तर संपूर्ण नाव का दिसू नये बरे? यूपीएचे लाडके पत्रकार श्रीमती बरखा दत्त व राजदीप सरदेसाई ह्या पत्राचा वारांवार उल्लेख करताना दिसतात. साठ लाख युरो एव्हढी रक्कम पत्रकारांना देण्यासाठी आली असे संदर्भ असताना हे कोणाकोणाच्या हाती पडले असतील ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. पत्रकारांना कसे मॅनेज करायचे ह्याचे धडे मिशेलने म्हणे आर्म्स डीलर अभिषेक वर्माकडून घेतले होते. कोणकोणते पत्रकार महत्वाचे आहेत आणि त्यातले गप्प बसणारे कोण आहेत हे वर्माने मिशेलला सांगितले असावे. वर्माचे पिताजी पत्रकार श्रीकांत वर्मा कॉंग्रेसतर्फे दोन वेळा राज्यसभेमध्ये खासदार झाले होते. राजीव व सोनियाजींना हिंदी शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर गांधी कुटुंबाने टाकली होती असे संदर्भ मिळतात. त्याकाळामध्ये ते कॉंग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळामध्ये वावरत होते. २०१२ ला मिशेल दुबईमध्ये परतल्यानंतर रक्कम येण्याचे थांबले. तोपर्यंत माध्यमांमध्ये ह्या कराराविषयी चकार शब्दही कोणी लिहिल्याचे दिसाणार नाही. बातम्या येऊ लागल्या त्या २०१३ पासून. कारण अपरिहार्य बनले होते. ह्याच वर्षी इटालीतील सरकारने फ़िनमेकॅनिकाच्या प्रमुखाला अटक केली. 

7 comments:

  1. अभ्यासपूर्ण 👍👍👍👌💐

    ReplyDelete
  2. हा कांड कांग्रेसच करू शकते,60 वर्षे या देशाला मूर्ख बन व ने हेच यानी केले आहे

    ReplyDelete
  3. हे सर्व समजणे कदापि शक्य नव्हते कारण सर्वच मीडिया यात फायदा करून घेत होते असे समजते.ते कधीही ही सविस्तर माहिती इतक्या चपखल शब्दात लिहिणे शक्यच नाही.
    धन्यवाद. या एकाच कारणासाठी सोशल मीडिया आवश्यक आहेच. बाकी विरंगुळा म्हणूनच सोशल मीडिया चे नाव घेतले जाते. धन्यवाद.

    ReplyDelete
  4. Part 7 is not visible now. Is it withdrawn?

    ReplyDelete
  5. Account hack zala ki kay 7th part parat disat nahi aahe

    ReplyDelete