Sunday 24 December 2017

कारस्थानांचे आरोप - गुजरात निवडणूक २०१७

कारस्थानांचे आरोप भाग १


कार्यकर्त्यांना उद्देशून केलेले भाषण

२०१४ मध्ये मी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यातील भाजप नेतृत्वाला मानसिक दृष्ट्या नामोहरम करण्याचे डाव खेळले गेले आहेत. या निवडणुकीत राज्य सरकारला पूर्णतः घेरण्यात आले आणि जाणूनबुजून खोट्या माहितीचा भडिमार करून वादळ निर्माण करण्यात आले. समोर केवळ काँग्रेस दिसत असली तरी अनेक शक्ती कार्यरत होत्या. त्यांचे लक्ष्य एकच होते - एकदा मोदींना खाली खेचा. अनेक कारस्थाने रचली गेली.

Modi, who was the chief minister of Gujarat from 2001 before he became the prime minister in May, 2014, said attempts were made to "demoralise" the state BJP leadership after he moved to the Centre.

Referring to the just-concluded Gujarat poll, he said the state government was attacked from all sides and there was a "storm of disinformation".

"The Congress might be visible on the ground but there were many forces at work beside it. 'Bring down the BJP once'. All sorts of conspiracies were hatched," Modi said.



कारस्थानांचे आरोप - भाग २


९ तारखेच्या मतदानानंतर १० डिसेंबर रोजी मोदींनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवत म्हटले की पाकिस्तानी आयएसआयचे डायरेक्टर जनरल अर्शद रफिक म्हणतात की अहमद पटेल गुजरातचे मुख्यमंत्री होतील. ह्या रफिकना गुजरातमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यात काय रस आहे??

मामला एवढ्यावर आटोपला नव्हता. पटेल व राहुल यांचे फोटो असलेली पोस्टर्स आधल्याच आठवड्यात  मतदारसंघात झळकली होती. ह्यामध्येही पटेल यांना वझिर ए आलम बनवण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले होते.

खरे तर मुख्यमंत्री पदाला वझिर ए आला म्हटले जाते तर वझिर ए आझम म्हणजे पंतप्रधान!! मग आलम (दुनिया) हा शब्द का बरे योजला गेला होता?? ही पोस्टर्स जितक्या वेगाने लावली गेली तेवढयाच वेगाने वादळ सुरू होण्याच्या आत उतरवली गेली. आपल्याला मुख्यमंत्रीपदात रस नाही असे पटेलांनी सांगून सुद्धा असे कसे घडले??

कोणासाठी होता हा इशारा?? काँग्रेस निवडणूक जिंकलीच तर पटेलांनी पद स्वीकारले असते का हा प्रश्न बरोबर नाही ते पद त्यांनी हिसकावूनही घेतले असते. हा पेच भाजपसमोरच होता असे नाही तर राहुल गटासमोरही होताच.

पटेल मुख्यमंत्री व्हावेत असे पाकिस्तानला का वाटत होते?? वारंवार सद् गदित होणाऱ्या मोदींना कसली भीती भेडसावत होती?? हा विजय मोठा आहे असे आज आवर्जून सांगणाऱ्या मोदींना कोणते कारस्थान दिसत होते?? कसल्या भीषण संकटातून आपण वाचलो याची आठवण त्यांच्या डोळ्यात पाणी आणते आहे??

देशप्रेमी सहृदय माणसाचे मन हेलावून गेल्याखेरीज राहत नाही.


कारस्थानांचे आरोप भाग 3

गुजरात निवडणूक प्रचाराच्या दरम्यान श्री मोदी यांनी आणखी एका मुद्द्याला हात घातला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की काँग्रेसला हे पक्के माहीत होते की अमित शहा गया तो मोदी गया! ही गोष्ट अर्थातच 2002 ते 2006 च्या काळामधली मोदी सांगत होते. याचाच अर्थ असा होता की काँग्रेसला गुजरातमध्ये राजकारणाच्या मार्गाने मोदींना हरवणे अशक्य झाले होते. म्हणूनच कारस्थानांचा सहारा घ्यावा लागला होता.

मोदी अजिंक्य होते कारण त्यांच्या मागे अमित शहांसारखा कसलेला सेनापती पूर्ण निष्ठेने उभा होता. त्यांची सर्व मदार अमित शहांवरच होती. कुठल्याही संकटात हाक मारली तर येणारा हा जिवाभावाचा मित्र होता. मोदींना हरवायचे तर शहांचा "बंदोबस्त" काँग्रेस  करता अत्यावश्यक झाला होता  असे मोदी सांगत होते.

याच अगतिकतेमधून इशरत जहाँच्या केस संदर्भाने श्री अमित शहा यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले आणि त्यांना गुजरातच्या न्यायालयासमोर खेचण्यात आले. यामागचे नाट्य आपण आजही विसरलेलो नाही.

फार काय जाहिरा शेख यांची केस तरी आपण कुठे विसरलो आहोत?  या केसमध्ये गुजरातच्या न्यायालयाकडून खरा न्याय मिळू शकणार नाही असा युक्तिवाद करत खटला महाराष्ट्राच्या न्यायालयासमोर आणला गेला. हाच युक्तिवाद मग अमित शहा यांच्या खटल्याला लावून तोही खटला महाराष्ट्राच्या न्यायालयांसमोर आणण्यात आला. श्री अमित शहा यांना काही काळ तुरुंगवासही झाला. परंतु शहा आणि मोदी यांनी दिलेल्या नेटाच्या लढतीमुळे शहांची यातून सुटका झाली. दुसऱ्या बाजूला मोदींना सुद्धा सीबीआय समोर नऊ तास चौकशीला सामोरे जावे लागले.

मोदी - शहा हे तर गुजरातचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. पण तरीही हा नरकवास त्यांना भोगावा लागला. अशा या नरकवासाच्या आठवणी निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मोदी का काढत होते हे स्पष्ट आहे.

संकटांचे डोंगर त्यांनी एकमेकांच्या सोबतीनेच पार पाडले ही  आठवण ते कसे विसरू शकतात?? आतासुद्धा २०१७ साली गुजरातची सत्ता काँग्रेसच्या हातात गेली असती तर हेच खटले वा नवे खटले टाकून भाजप अध्यक्ष असलेले शहा व पंतप्रधान मोदी यांचे छळनाट्य नव्याने सुरू झाले असते यात शंका नाही.

आपल्यासमोर काय काय वाढून ठेवले आहे याची स्पष्ट कल्पना मोदींच्या डोळ्यासमोर तरळत असावी. मग गुजरात मध्ये विजय प्राप्त करून सुद्धा दुःखाचे कढ येतच राहिले, खरे ना??

गुजरात जिंकला आता तुम्ही निर्धास्त झाला असाल. मोदी नाहीत. मित्रहो प्रश्न आहे तो केवळ आठ आमदारांचा. केवळ आठ आमदार फोडले तर गुजरातची सत्ता जाऊ शकेल. कदाचित २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसोबत गुजरातमध्ये नव्या विधानसभा निवडणुकीचा घाटही घातला जाऊ शकतो.

म्हणूनच धोका संपला नाही. कारस्थानेही संपली नाहीत. वारंवार गदगदून रडणारे मोदी कसल्या कसोटीतून जात आहेत ह्या विचाराने अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

शहा गया तो मोदी गया - हेच सूत्र राहील भविष्यातील काँग्रेसी कारस्थानांचे!!

स्वाती तोरसेकर