Thursday 28 February 2019

बालाकोटचे महत्व काय?


balakote

भारतीय वायुदलाने केलेल्या नेत्रदीपक चढाईनंतर त्यांना त्याचे श्रेय नाकारण्यासाठी उत्सुक असलेले लिब्बू पूंछजवळचे बालाकोट की मुझफ़्फ़राबादजवळचे बालाकोट ह्यावर काथ्याकूट करत बसली होती. मोदी करून करून काय करणार? नियंत्रण रेषा ओलांडण्याची परवानगी देणे अशक्यच असे आडाखे वाजपेयी सरकारच्या अनुभवावरून बांधले जात होते. फार फार तर काय रेषेच्या आत दोन चार किलोमीटर्सच्या पलिकडे ह्यांची उडी पडणार नाही हेही डोक्यात पक्के होते. तेव्हा अख्खा पाकव्याप्त काश्मिर ओलांडून वायुदलाची विमाने खैबर पख्तुनवा पर्यंत पोचली आणि पाक वायुदलाकडून जराही प्रतिकार न होता ठरलेल्या जागी बॉम्ब टाकून सुखरूप परतली ह्या घटनेने लिब्बूंचे "देव" पाण्यात बुडाले होते. काल पाकिस्तानची १० हून जास्त एफ १६ विमाने आली आणि ह्या चौथ्या पिढीतील आधुनिक विमानांना यःकश्चित दुसर्‍या पिढीतील मिग २१ विमानाने हटकले आणि पळवून लावले म्हटल्यावर लिब्बूंची इज्जत पूर्णतया धुळीस मिळाली. ह्या प्रतिकारामध्ये शूर वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्तमान ह्याच्या मिग विमानाच्या इंजिनात निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे ते पडले व अभिनंदनला त्यातून उडी मारून जीव वाचवावा लागला. वार्‍याच्या दिशेमुळे तो नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन पडल्यामुळे अलगद पाकड्यांच्या हाती गेला. पाकड्यांनी एक भारतीय वैमानिक जीवंत पकडल्यामुळे इज्जत धुळीला मिळालेल्या लिब्बूंच्या जीवात जीव आला आणि आता कशी पलटवतो बाजी बघा आम्ही म्हणून ते कोल्हेकुई करू लागले. अभिनंदनला सोडतो पण युद्ध वाढवू नका असा पवित्रा घेऊन इंटरनेटवरून जोरदार प्रचार सुरू झाला. No more War - De-escalate हॅशटॅगच्या गजरामध्ये भारतीय जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू झाले. हे सगळे कशासाठी? IC814 विमानाच्या  अपहरण प्रसंगी हे लिब्बू असेच वागले होते आणि त्यांनी केलेल्या प्रचारामुळे भारत सरकारवर दडपण येऊन खतरनाक दहशतवाद्यांना सोडून देण्याची नामुश्की वाजपेयी सरकारला सोसावी लागली हा इतिहास आणि त्यांचा पराक्रम लिब्बू विसरलेले नाहीत. याहीवेळी आपण असेच रान उठवू आणि मासूद अझरला संकटातून वाचवू अशी त्यांना आशा आहे. पण पाकिस्तानी आयएस आयच्या सुरक्षित घरट्यामध्ये बसलेल्या मासूदवर असे कोणते संकट आले आहे की ज्यातून त्याला वाचवण्यासाठी रान उठवले जात आहे?

काल म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी फ्रान्सने मासूद अझरला युनोने दहशतवादी म्हणून घोषित करावे असा प्रस्ताव नव्याने मांडला आहे. ह्या प्रस्तावावरती सहप्रस्तावक म्हणून अमेरिका आणि ब्रिटननेही सह्या केल्या आहेत. आजपर्यंत तीन वेळा ह्या प्रस्तावावरती व्हेटो वापरणारा चीन यावेळी मात्र प्रस्तावाला संमती देतो काय ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाच कायम सभासदांखेरीज अन्य १० सभासदांना भेटून त्यांचेही होकारार्थी मत मिळवण्यासाठी मोदी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. जर असा प्रस्ताव मंजूर झालाच तर त्यानुसार पाकिस्तानला मासूदवर कारवाई करावी लागेल अन्यथा संपूर्ण जगामध्ये त्याची छीथू अटळ होऊन जाईल. नेमक्या ह्याच संकटातून मासूदला नव्हे तर पाकिस्तानला वाचवण्यासाठी इथल्या लिब्बूंनी कमरा कसल्या आहेत. 

ह्या पार्श्वभूमीवरती भारताने हल्ला चढवण्यासाठी ज्या बालाकोटची निवड केली त्याचे महत्व काय आहे ह्याविषयी माध्यमे मूग गिळून बसली आहेत म्हणूनच हा विषय सविस्तर विशद करणे भाग पडत आहे. मासूद अझरचा जन्म बहावलपूरचा असला तरी त्याचे इस्लामी शिक्षण कराची जवळच्या बानुरी गावात झाले आहे. ह्याच बानुरी गावामधली बानुरी (बिनोरी) मशीद रॅडिकल इस्लामच्या प्रचारासाठी जगप्रसिद्ध असून एक काळ होता जेव्हा ९/११ च्या हल्ल्यानंतर खुद्द ओसामाने ह्या मशिदीमध्ये आश्रय घेतला होता असे सांगितले जाते. तर मासूद अझरने जेव्हा हरकत उल मुजहिदीन मधून बाहेर पडून स्वतःची जैश ए मोहमद ही स्वतंत्र संघटना काढायचे ठरवले तेव्हा त्याला बानुरी मशिदीचे मुफ्ती शमझई ह्यांनी पुरेपूर मदत केली आणि आय एस आय ने बालाकोट येथे एक पूर्णतः नवे कोरे प्रशिक्षण केंद्र उघडून दिले. बहावलपूरमध्ये जन्मलेल्या आणि कराची मधून काम करणार्‍या मासूदसाठी बालाकोटची निवड का करण्यात आली असावी ह्याची रंजक माहिती मिळते.

आज आपल्याला बालाकोट हे नाव वायुदलाने केलेल्या हल्ल्यामुळे माहिती झालेले असले तरीही हे नाव रॅडिकल इस्लामच्या अभ्यासकांना नवे नाही. सय्यद अहमद शहीद बरेलवी हे नाव ह्या वर्तुळामध्ये मोठे मानले जाते. त्यांचा जन्म १७८६ सालचा आणि उत्तर प्रदेशच्या "रायबरेली" मधला. मूळ सुन्नी कुटुंबातले हे लोक इस्लामच्या हनफी न्यायशाखेमधले होते. हा काळ होता दिल्लीमधील औरंगजेबाची सल्तनत ढासळण्याचा आणि काफिर मराठे आणि शिख ह्यांच्या उदयाचा. त्याच काळामध्ये इस्लामच्या पुनरुज्जीवनाचे आणि इस्लामी राजवट पुनश्च प्रस्थापित करण्याचे स्वप्न घेऊन सय्यद ह्यांनी आपले काम सुरू केले आणि वैयक्तिक मित्रत्वाच्या जोरावर साथीदारांचे एक जाळे तयार केले. फिरता फिरता ते पश्तून टोळ्यापर्यंत पोचले आणि  त्यांच्यामध्ये इस्लामच्या प्रचाराचे काम दृढ केले.  सय्यद ह्यांचे अनुयायी भारताच्या अनेक भागामध्ये दिसून येत व त्याकाळी त्यांचा प्रभाव काश्मिर व अफगाणिस्तानवरही पडला होता. १८२६ मध्ये ते पेशावर येथे पोचले आणि तेथील शिखांच्या राजवटीला आव्हान उभे करण्याचे काम त्यांनी सुरू केले. आज नॉर्थ वेस्ट फ्रॉंटीयर प्रॉव्हिन्स म्हणून जो भाग ओळखला जातो तिथे महाराजा रणजित सिंग ह्यांची सत्ता होती. कट्टर इस्लामच्या पायावरती त्यांनी ह्या सत्तेला आव्हान उभे केले. हे हिंदुस्तानच्या भूमीवरचे एक जिहादी युद्ध होते असे म्हणता येईल. १८३१ मध्ये मनशेरा जिल्ह्यातील बालाकोट येथे जी लढाई झाली त्यामध्ये सय्यद ह्यांनी शिख सैन्यासाठी मोठ्या शिताफीने सापळा रचला होता. त्यांनी आजूबाजूच्या प्रदेशामधल्या शेतांमध्ये दलदल बनवली आणि ते शिख सैन्याची वाट बघू लागले.  पण शिखांचा सेनापती शेरसिंगही चतुर होता. त्याने वाट पाहण्याचे ठरवले. नंतर सय्यदच्या एका अनुयायाला राहवले नाही आणि तो प्रथम त्याच शेतांमध्ये घुसला. त्याच्यामागून सैन्यही घुसले. दलदलीमध्ये ते फसले आहेत से बघून शेर सिंगाने त्यांना वेढा घातला. एकूण १३०० मुस्लिम मारले गेले.  शिख सैन्याकडून शिरच्छेद होऊन सय्यद मारले गेले - शहीद झाले. याच लढाईमध्ये आणखी एक महत्वाची व्यक्ती मारली गेली. शिखांचे पाचवे गुरू अर्जुन सिंग ह्यांना ठार मारणार्‍या शेख सिरहिंदी ह्यांच्या कुटुंबातील शाह इस्माईल सईद देखील तेव्हा बालाकोटमध्ये इस्लामी सैन्यामध्ये शिखांच्या विरोधात लढत होते. अशा तर्‍हेचे अनन्यसाधारण अहत्व असलेल्या बालाकोट मध्ये मासूद अझर आला आणि त्याने तिला आपली कर्मभूमी मानली कारण मासूद अझर सय्यद अहमद बरेलवी ह्यांना आपला हिरो मानतो. धर्माच्या आधारावर लढण्यात आलेल्या ह्या लढाईला त्याच्या दृष्टीने फार मोठे महत्व आहे. म्हणून बालाकोट गावाला रॅडिकल इस्लामींच्या दुनियेमध्येही एक वेगळेच स्थान आहे. 

पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी जेव्हा जैश ए मुहमद संघटनेने स्वीकारली त्यानंतर पाकिस्तानचे माजी सरसेनापती आणि पुढे अध्यक्षपद भूषवलेले परवेझ मुशर्रफ ह्यांची खास मुलाखत टीव्हीवरती तुम्ही बघितली असेल. मुशर्रफ ह्यांच्या जीवनामध्ये जैश संघटनेचे एक महत्व आहे. सुप्रसिद्ध ज्यू पत्रकार डॅनियल पर्ल ह्यांचे कराची येथून अपहरण करून हत्या करण्यात आली त्या गुन्ह्याबाबत पाकिस्तानाध्ये जैशवरती ठपका ठेवण्यात आला होता. इतकेच नव्हे तर ह्याच जैशने आपल्याला ह्या खटल्यामध्ये गुंतवले ह्या रागाने मुशर्रफ ह्यांच्याच हत्येचा कट रचला होता. ह्यापैकी एका कटाची माहिती मुशर्रफ ह्यांना आश्चर्यकारकरीत्या वाजपेयी सरकारकडून देण्यात आली.   अशा प्रकारे आपला जीव वाचवणार्‍या अटलजींबाबत मुशर्रफ कसे हळवे होतात ते आपण बघितले असेलच. 

असो. तर मासूद अझरच्या पापांचा घडा लिहायचा तर बरेच काही लिहावे लागेल. इतके असूनही त्याची पाठराखण करणारे आजही पाकिस्तानात अनेक जण आहेत आणि ते सत्तवर्तुळामध्ये उजळपणे वावरतात हे ढळढलीत सत्य आहे. खेदाची गोष्ट अशी की पर्ल ह्या अमेरिकन पत्रकाराच्या हत्येबाबत अमेरिका किती संवेदनशील आहे असा प्रश्न पडण्याइतकी अमेरिका ह्या प्रकरणी अलिप्त असल्याचे दिसत नाही काय? म्हणूनच भावना बाजूला टाकून प्रत्येक व्यवहारामध्ये स्वतंत्र तत्वे "शोधून" काढणार्‍या अमेरिकनांना अफगाणीस्तानसारख्या देशाची नस कधीच समजली नाही असे दिसते आणी त्यांच्यावर अग्निवर्षाव करणार्‍या तालिबानांच्या हाती अफगाणिस्तानची सत्त द्यायला ही विद्वान मंडळी उतावळी झाल्याचे बघितले की मन साहजिकच विषण्ण होते. आज आपण जी लढाई छेडली आहे ती पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर एव्हढ्याच मर्यादित स्वरूपात बघणार असलो तर आपलाही पराभव ठरलेला आहे म्हणॊओन समजा. पाकिस्तानातील जिहादींचा प्रश्न हा ह्या भूभागातील स्थैर्याशी आणि सुरक्षेशी जोडला गेला आहे आणि त्यावर सर्वंकष विचार करूनच तोडगा काढता ये ईल भले प्रत्यक्षात् परिणाम दिसायला वेळ लागला तरी चालेल पण मूळ दिशा मात्र आपण विसरता नये असे मला खात्रीने वाटते. हेच महत्व आहे बालाकोटवरील चढाईचे. जय हिंद.

Wednesday 27 February 2019

जशास तशा प्रत्युत्तराची मोदीनीती.



(from my mahaMTB aticle)

२६ फेब्रुवारी २०१९ हा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये लिहिला जाईल. आपण सर्वजण ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट आहे. १९७१ नंतर पहिल्यांदाच म्हणजे जवळजवळ ४८ वर्षांनंतर भारताने मनामध्ये कोणताही संदेह न बाळगता पाकिस्तानच्या हद्दीमध्ये विमाने नेऊन तेथील काही ठिकाणांवरती जोरदार हल्ले चढवले आहेत. अगदी १९९९ च्या कारगिल युद्धाच्या प्रसंगी सुद्धा नियंत्रण रेषा न ओलांडता कारगिल परत ताब्यात घ्या असे बंधन लष्करावर तत्कालीन अटल सरकारने घातले होते. आजच्या हल्ल्यासाठी मात्र मोदी सरकारने सैन्याला पूर्ण सूट असल्याचे निःसंदिग्धपणे जाहीररीत्या सांगितले होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजे पाकिस्तानप्रणित शक्तींनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या काफिल्यावरती जो निर्घृण हल्ला चढवला होता त्यामध्ये देशाचे ४० जवान कामी आले. ह्यानंतर देशभरात एकच आक्रोश उठला होता. देशप्रेमी जनता पुलवामा हल्ल्याला सरकारने प्रत्युत्तर द्यावे म्हणून आग्रही होती. इतक्या व्यापक प्रमाणावरील जनमताच्या पाठिंब्यानंतर आणि स्वभावतःच मोदी ह्यांनी अगदी २०१४ च्या प्रचार मोहिमेमध्ये जाहीर केल्यानुसार पाकिस्तानला सडेतोड उत्तर मिळणार ह्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नव्हतीच. अगदी पाकिस्तानच्या मनामध्येही संदेह नव्हता. हल्ला कुठे होणार कधी होणार कशा स्वरूपाचा असेल ह्याविषयी मात्र काहीच माहिती उपलब्ध नव्हती. पण अशामुळेच गेल्या काही दिवसात पाकिस्तान रडकुंडीला आल्याप्रमाणे थेट युद्धाची तयारी करू लागला असल्याच्या बातम्या थडकत होत्या. मोदी ह्यांनी २०१४ पासून पाकिस्तानशी कडक धोरण अवलंबले होते. दहशतवादी हल्ले होत असतील तर पाकिस्तानशी चर्चा करू शकत नाही कारण स्फोटांच्या आवाजात चर्चा ऐकूच येत नाही असे ते वारंवार सांगत असूनही पाकिस्तानने आपली वाकडी पावले कधी सुधारली नाहीत. उलटपक्षी भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ ठरेल अशा पद्धतीने तो प्रतिक्रिया देत होता आणि इथल्या काही राजकारण्यांना हाताशी धरून आपली प्यादी पुढे सरकवत होता.

पठाणकोट आणि उरी हे दोन मोठे हल्ले मोदी ह्यांच्या कारकीर्दीमध्ये झाले आणि मोदी सरकारने त्याला प्रत्युत्तर दिले पण पाकिस्तानने मात्र उरीनंतर भारत सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची चेष्टा मस्करी करण्याचे - असा काही हल्ला झालाच नाही - असेल तर व्हिडियो का नाही दाखवत अशी मुक्ताफळे उधळली. मुख्य म्हणजे अशाप्रकारे सैनिकी व्हिडियो प्रसिद्ध केले तर सैन्याची अनेक गुपिते शत्रूला कळू शकतात हे माहिती असूनसुद्धा इथले मोदी विरोधक पाकिस्तान जे प्रश्न रावळपिंडीमध्ये विचारत होता ते ते प्रश्न इथे मोदी सरकारला दिल्लीमध्ये विचारत होते. ह्या मोदी विरोधकांमध्ये जसे राजकीय प्रतिस्पर्धी होते तसेच सामिल होती इथली सेक्यूलर बुद्धिवंत लेखक कलाकार पत्रकार मंडळी. ह्या सर्वांनी मिळून केलेल्या गलक्याने सामान्य जनता बिथरेल आणि मोदी सरकार आपण पाकिस्तानवर हल्ला केल्याच्या आपल्याला थापा मारत आहे - प्रत्यक्षात तर हे सरकार नेभळट आहे आणि ते असे काही करूच शकत नाही असा हा सूर  जनतेला मोदींपासून दूर नेईल ह्या भ्रमामध्ये ही मंडळी होती. प्रत्यक्षात झाले ते उलटेच. जितका सेक्यूलर मंडळींनी जोरात गलका केला तितक्याच जोमाने जनतेचा मोदी सरकारने केलेल्या हल्ल्यावरती अधिकाधिक विश्वास बसत गेला. हे वास्तव स्वीकारण्यासाठी कॉंग्रेसप्रणित विरोधकांना उरी वर काढण्यात आलेल्या चित्रपटाच्या यशाने डोळे दीपवून घ्यावे लागले. अशा प्रकारे आधीच भाजलेल्या तोंडाची हे मंडळी डोळे एकदाचे उघडल्यामुळे आजच्या हल्ल्याचे पुरावे काही मागत बसली नाहीत. त्यांनी खुल्या दिलाने मोदी सरकारचे नव्हे तर सैन्याचे कौतुक केले. सैन्याने केलेल्या कामगिरीला तोडच नाही पण त्यांच्या मागे उभे राहण्याची राजकीय इच्छा शक्ती मोदींनी दाखवली त्याबाबत कॉंग्रेस मूग गिळून गप्पगार बसली आहे हे चाणाक्ष सामान्य जनतेच्या नजरेतून सुटेल काय?

जेव्हा जेव्हा भारतावर परचक्र आले आणि कॉंग्रेस सरकार सत्तेमध्ये होते तेव्हा तेव्हा येथील विरोधी पक्षाने सराअरबरोबर सहकार्य करण्याचे धोरण वलंबले होते पण मोदी सरकारच्या भाग्यामध्ये असा देशप्रेमी विचारी विरोधी पक्ष नाही. बाहेरचे काय विरोध करतात ते सोडा इथे अंतर्गत विरोधक काय म्हणतील आणि त्यांचा मुकाबला कसा करायचा ह्याचा सरकारला आज विचार करावा लागत आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. उदा. आजच्याच हल्ल्यानंतर जेव्हा पाकिस्तान सरकारनेच आपल्या बालाकोट वरती भारतीय विमानांनी हल्ला केला असे जाहीर केले तेव्हा इथले विरोधक आणि सेक्यूलर पत्रकार मंडळी हे बालाकोट नेमके कोणते म्हणून चर्चा करत बसले होते. पूंछ् जवळचे बालाकोट असेल तर सरकारने फार काही मर्दुमकी गाजवली नाही एव्हढेच म्हणायचे त्यांनी बाकी ठेवले होते. ह्या गॅंगमध्ये अग्रेसर होते ते जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री श्री ओमर अब्दुल्ला. जसजसे हे स्पष्ट हो ऊ लागले की हे बालाकोट पूंछ जवळचे नसून पाकिस्तानच्या खैबर पख्तून्वा मधील बालाकोट आहे तेव्हा मात्र ह्यांची बोबडी वळली. मोदी सरकारच्या द्वेषाने त्यांना इतके पछाडले आहे की अशा काहीतरी शंका उपस्थित केल्याने इथल्याच जनतेसमोर आपली नाचक्की होत आहे हे देखील ते विसरून गेले आहेत.

पाकिस्तान ह्या हल्ल्याने गडबडून गेले नाही तरच आश्चर्य मानले असते. भारताची एकूण १२ मिराज २००० विमाने बिनदिक्कत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसतात आणि आपल्याला हव्या त्या लक्ष्यावरती बॉम्बफेक करून सुखरूप निघून जातात आणि "बलाढ्य" पाकिस्तानचे वायुदल त्यांना साधे हटकू शकत नाही हे विदारक चित्र आता पाकिस्तानी जनतेसमोर उघड झाले आहे. मिराज २००० ह्या विमानामधून न्युक्लियर हल्ले घडवता येतात हीच एक बाब पाकिस्तानला झोंबणारी आहे. अशी विमाने आपल्या हद्दीमध्ये येत असतील तर आपण कितपत सुरक्षित आहोत असा विचार तिथली सामान्य जनता केल्यावाचून राहणार नाही. भारताने दमदार  प्रत्युत्तर दिलेच तर पाकिस्तान तात्काळ आपली अण्वस्त्री डागेल आणि आण्विक युद्धाला प्रारंभ होईल असे एक चित्र ह्या दगाबाक सेक्यूलरांनी आपल्यासमोर रंगवले होते. आणि आण्विक युद्ध टाळायचे तर उभयतांमधील चर्चेमधूनच प्रश्न सोडवता ये ईल त्यासाठी चढाई हा पर्याय नाहीच असे कंठरवाने आपल्याला सांगितले जात होते. अगदी २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर सुद्धा आम्हाला हेच ऐकवले गेले होते. त्याप्रसंगी जनतेच्या मनामध्ये हेच होते की भारताने दमदार उत्तर द्यावे. सैन्याने तर तशी तयारी केली होती आणि सरकारकडे परवानगी मागितली होती. पण समोर पाकिस्तान आहे म्हटल्याव्र सेक्यूलरांची धोतरे सुटतात हेच खरे. मग ११ जुलैचा मुंबई ट्रेनवरील हल्ला असो की २६/११ चा - सलाम मुंबई - तुमच्या संयमाला सलाम असे एकदा ऐकवायचे आणि ठंडा कारभार डोळे मिटून करत राहायचे आणि पाकिस्तान मारेल तेव्ह्ढ्या थपडा खात राहायचे हेच ज्यांचे पाकिस्तान धोरण होते तेचा आजवर गेले पाच वर्षे मोदींची मर्दुमकी कुठे आहे हे भिंग लावून शोधत बसले होते. आज त्यांच्या भिंगाच्याच नव्हे तर डोळ्यातील भिंगाच्याही ठिकर्‍या उडाल्या आहेत. ही लाजिरवाणी परिस्थिती त्यांना धड लपवून ठेवावी एव्हढेही भान उरलेले नाही.

इतके दमदार निर्णय मोदी घेऊ शकले कारण त्यांच्या मागे लोकसभेमध्ये एकजिनसी बहुमत आहे - त्यांच्या धोरणामागे इथली जनता खंबीरपणे उभी आहे हे तर आहेच पण मोदी सरकारने ज्या खेळी खेळल्या आहेत त्यांनाही दाद द्यावी लागते. १४ फेब्रुवारीनंतर पहिला आठवडा मोदी सरकारने जगातील महत्वाच्या देशांमधून आपल्या भूमिकेसाठी पाठिंबा मिळवण्याचे अवघड काम पूर्ण केले. ह्यानंतर पाळी आली ती राजकीय खेळींची. ह्यामध्ये पाकिस्तानचे हे बिरूद काढून घेणे पाकिस्तानी मालावरती २००% ड्यूटी लावणे आणि सिंधुजलकरार तंतोतंत पाळत भारताच्या वाटेचा एकही थेंब पाकिस्तानला मिळू देणार नाही ही घोषणा करणे ह्यातून वातावरण निर्मिती करण्यात आली. आज च्या हल्ल्यानंतर जगामधल्या एकाही देशाने भारताचा निषेध केलेला नाही किंबहुना भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे हे सूत्र सर्व जगाने मान्य केल्याचे दृश्य दिसत आहे. हे यश इतके मोठे आहे की अगदी चीनने सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने एकही विधान केल्याचे दिसत नाही. ही मोदी सरकारची भरीव कामगिरी आहे.

पाकिस्तानच्य अंतर्गत राजकारणाचा विचार केला तर काय दिसते? पंतप्रधान इम्रान खान आज खूष असतील. पाकिस्तानी लष्कराची जेव्हढी बे इज्जती हो ईल तितके तिथल्या पंतप्र्धानाचे राजकीय महत्व वाढेल हे काय इम्रानला समजत नाही काय? वरकरणी काहीही बोलले गेले तरी हा संघर्ष तिथे तीव्रच राहणार. ओसामा बिन लादेन मारला गेला तेव्हा देखील अमेरिकेची विमाने ह्यांच्या हद्दीत घुसली आणि ओसामाला मारून बिनदिक्कत बाहेर पडली. तेव्हा अमेरिकेला तेथील सैन्याची छुपी संमती होती असे राजरोसपणे म्हटले जाऊ लागले. क्षणभर विचार करा की स्वतःचे स्थान वाचवण्यासाठी आजसुद्धा तेथील काही जनरल्सनी भारतीय विमानांना प्रत्युत्तर देण्याचे हटकण्याचे टाळले नसेलच असे आपण खात्रीशीररीत्या म्हणू शकतो काय? पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळातच नव्हे तर त्याच्या आयएस आय मध्ये आणि सैन्यामध्ये सुद्धा जबरदस्त फूट असल्याच्या बातम्या गेले काही वर्षे बघायला मिळत होत्या. ही फूट नेमकी कोणते स्वरूप धारण करेल ह्याविषयी आता आपण केवळ अंदाज बांधू शकतो.

सर्वथया लाज गेल्यानंतर आता पाकिस्तान नेमके काय करणार? चढाई करून युद्ध छेडेल काय ह्याविषयी कयास बांधले जात आहेत. मोदींनी बाजी पल्टवली आहे. Dialogue is the only way forward हे पालुपद आता पाकिस्तानला घोळवावे लागणार आहे. शहाणा असेल तर पाकिस्तान ह्याला उत्तर म्हणून थोडेफार दहशतवादी हल्ले करून गप्प बसेल आणि मूर्ख असेल तर युद्ध पुढे वाढवेल. उठसूट आण्विक युद्धाच्या धमक्या देणार्‍या पाकिस्तानने आतापर्यंत असे का केलेले नाही ह्याचे उत्तर त्यांना स्वतःला माहिती नाही काय? त्याचे उत्तर अटलजींनीच त्यांना ऐकवले होते. अणुबॉम्ब टाकून तुम्ही भारताचा १०% प्रदेश उद्ध्वस्त कराल पण नेमके काय झाले बघण्यासाठी पृथ्वीतळावरती पाकिस्तान शिल्लक उरणार नाही असे उत्तर वाजपेयींनी दिले होते त्याची आज आठवण येते.

हा एक आठवडा अत्यंत महत्वाचा आहे. आणि होणार्‍या घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. आजपर्यंत भारताला भवानीमातेचाच आशीर्वाद होता आणि मोदींनी जय भवानी म्हटलेच आहे कारण त्याच आध्यात्मिक बळावरती त्यांनी आपले लक्ष्य ठरवले आहे हे निश्चित.

(MahaMTB Link: http://mahamtb.com/Encyc/2019/2/27/Article-on-PM-Modi-s-strategy-to-tackle-terrorism.html)

मोदींचे परराष्ट्र धोरण झळाळले

Image result for modi churu


पाकिस्तानच्या खैबर पख्तून्वा  प्रांतातील बालाकोट येथे भारतीय वायुदलाने चढवलेल्या हल्ल्यानंतर सर्वजण गुंतले आहेत ते आता पाकिस्तान काय उत्तर देणार आणि त्यामध्ये अण्वस्त्रे वापरली जातील ह्या प्रश्नांची उकल करण्यात. ह्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा भारताने राबवलेल्या यशस्वी परराष्ट्र धोरणामध्ये लपलेली आहेत ह्या कडे थोडे दुर्लक्ष होत आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने एक आघाडी उघडून पाकिस्तानमधून हे हल्ले कशा तर्‍हेने केले जात आहेत आणि दहशतवादी संघटना म्हणजे कोणी अलिप्त म्होरके नसून पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांचा त्यांच्यावर वरदहस्त आहे हे प्रकाशझोतामध्ये आणण्यासाठी भारताने शक्ती उभी केली होती.

ह्याचाच दृश्य परिणाम म्हणून आज कोणत्याही देशाने पाकिस्तानच्या बाजूने एकही वक्तव्य केल्याचे उदाहरण आपल्याला मिळत नाही. अमेरिका चीन रशिया अशा टोकाच्या भूमिका मांडणार्‍या देशांकडून आपल्या भूमिकेवरती शिक्कामोर्तब करून घेणे हे काम सोपे नव्हते. एक महत्वाची बाब तुम्ही बघितली आहे काय? पुलवामा हल्ल्यानंतर युनोच्या सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये ठराव स्वतः भारताने मांडला नाही तर आज हे करण्यामध्ये फ्रान्स पुढाकार घेत आहे. चीनसकट सर्व देशांनी ठराव तर मान्य केलाच शिवाय बैठकीनंतर जो ठराव मंजूर करण्यात आला त्यामध्ये काय म्हटले आहे हे पाहणे तर फारच उद् बोधक आहे. हा ठराव काय म्हणतो?

The members of the Security Council underlined the need to hold perpetrators, organizers, financiers and sponsors of these reprehensible acts of terrorism accountable and bring them to justice, and urged all States, in accordance with their obligations under international law and relevant Security Council resolutions, to cooperate actively with the Government of India and all other relevant authorities in this regard, the statement pointed out in indirect jibe to Pakistan. 

The members of the Security Council reiterated that any acts of terrorism are criminal and unjustifiable, regardless of their motivation, wherever, whenever and by whomsoever committed. They reaffirmed the need for all States to combat by all means, in accordance with the Charter of the United Nations and other obligations under international law, including international human rights law, international refugee law and international humanitarian law, threats to international peace and security caused by terrorist acts.

सुरक्षा समितीने सर्व देशांना आवाहन केले आहे की त्यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताशी सहकार्य करावे. इथे हे नमूद करायला हवे की जगामध्ये एक युनोची सुरक्षा समिती सोडली तर जगामध्ये शांतता नांदावी म्हणून प्रयत्न करणारी खर्‍या अर्थाने जागतिक पातळीवरील दुसरी कोणतीही यंत्रणा नाही. अशी समिती जेव्हा सर्व देशांना स्पष्ट शब्दांमध्ये आवाहन करते त्याचा अर्थ स्पष्ट आहे. आणि तो पाकिस्तानच्या मर्मावरती घाव घालणारा आहे. अशाप्रकारे सुरक्षा समितीकडून भारताने स्वसंरक्षणाकरता आणि दहशतवादाला आळा घालण्य़ासाठी जी काही पावले उचलावी लागणार आहेत त्यासाठी संपूर्ण जगाकडून मंजूरी मिळवली आहे. हा मोदींच्या परराष्ट्र धोरणाचा प्रचंड मोठा विजय आहे. 

गेले कित्येक महिने कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री राहुल गांधी ह्यांनी राफाल सौद्यावरून मोदी सरकारल आणि व्यक्तिशः मोदी ह्यांना धारेवर धरले असून चौकीदार चोर आहे म्हणून गोंगाट चालवला आहे. DPP Defence Purchase Policy ह्या कागदपत्रामध्ये दिलेल्या पद्धतीनुसार भारताचे लष्कर आपल्याला लागणारी सामग्री विकत घेत असते. त्यामध्ये लिहिलेल्या कलमानुसार भारत सरकारला ही अनुज्ञा देण्यात आली आहे की जागतिक राजकारणामध्ये देशाचे महत्व राखण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीतून दोन देशांच्या खरेदी करारामधून अशी सामग्री विकत घेता यावी. ही पद्धती तर कित्येक वर्षे जुनी असून श्रीमती इंदिराजींच्या काळामध्ये तर भारत आपल्या संरक्षण सामग्री साठी बव्हंशी रशियावरती अवलंबून होता आणि ही सर्व खरेदी दोन सरकारांमध्ये झालेल्या करारानुसार केली जात होती. अगदी २०१३ साली जी पॉलिसी यूपीएचे संरक्षण मंत्री श्री अन्थनी ह्यांनी सही केलेल्या DPP दस्तावेजामध्येही ही सुविधा होतीच. ही सुविधा पुढे असे स्पष्ट करते की जेव्हा दोन देशामधील करारानुसार खरेदी व्यवहार करायचे ठरते तेव्हा DPP मधील अन्य बाबींची पूर्तता करण्याचे बंधन त्यावर राहत नाही. तेव्हा नेहमीच्या पद्धतीमधील कोणत्या अटी ठेवाव्यात आणि कोणत्या गाळाव्यात ह्याचा निर्णय सरकारला घेता येतो. इथेच हे स्पष्ट होईल की राहुल गांधी करत असलेली कोल्हेकुई कशी फसवी आणि अनाठायी आहे. याहीपलिकडे जाऊन आपल्याला असे दिसून ये ईल की आज युनोच्या सुरक्षा समितीमधील कायम स्वरूपी सभासद फ्रान्स आज ह्या जागतिक व्यासपीठावरती भारताची पाठराखण करताना दिसत आहे. तेव्हा राफालच्या निमित्ताने मिळालेले जागतिक पातळीवरील लाभ काय आहेत हे अगदी कमी बुद्धी असलेल्या माणसालाही कळणे अवघड नाही. परंतु अशा समजूतदारपणाची अपेक्षा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ह्यांच्याकडून ठेवायची की नाही हे आपल्या अनुभवावरून आता ठरवायचे आहे.


युनोच्या सुरक्षा समितीमध्ये मिळालेल्या ह्या भरघोस यशानंतर एकेका देशाच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर पाकिस्तानची वस्त्रेच जणू उतरवण्यात आली आहेत हे दिसून येते. पाकिस्तानचे जागतिक राजकारणामधले जे जवळचे मित्र आहेत त्यात चीन आणि अमेरिकेचा नंबर वरचा आहे. दोन्ही देशांनी एक तर सुरक्षा समितीच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले इतकेच नव्हे तर पाकिस्तान फुशारून जाईल अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य ह्या देशांनी केलेले दिसत नाही. दोन्ही देशांनी संयमाने परिस्थिती हाताळावी असे म्हणत असताना चर्चेस बसा म्हणून आगांतुक सल्ला दिलेला आढळत नाहीच शिवाय पाकिस्तानने जैश ए मुहम्मदच्या जिहादींवरती कारवाई करावी असा सल्ला दिल्याचे दिसते. कोणत्याही परिस्थितीमध्ये बालाकोट हल्ल्यानंतर हा संघर्ष दोन सैन्यदलांमधला संघर्ष म्हणून रूपांतरित होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे असे म्हणत असताना त्यामागे पाकिस्तान हे अण्वस्त्रधारी राष्ट्र असल्यामुळे भारताने नरमाईने घ्यावे असेही म्हटल्याचे दिसत नाही. आज तर अमेरिकेने म्हटले आहे की पाकिस्तानने F16 विमाने वापरू नयेत.   तेव्हा आपण जराजरी पाउल उचलले तरी पाकिस्तान अण्वस्त्र उगारेल अशी जी भीती यूपीए सरकार आपल्याला दहा वर्षे घालत होते ती किती तकलादू होती आणि प्रत्यक्षात यूपीए सरकारकडे दहशतवादाविरोधात अर्धे पाऊल टाकण्याची राजकीय इच्छाशक्तीच नव्हती हे लोकांसमोर येऊन चुकले आहे. 

पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र असल्यामुळे मध्यपूर्वेतील अनेक देश त्याला पाठीशी घालत आणि काश्मिर प्रकरणी तर पाकिस्तानची री ओढायचे काम हे इस्लामी देश करत असत. आज परिस्थिती बदलली आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कन्ट्रीज ह्या संस्थेने बालाकोटसाठी भारताचा निषेध जरी केला असला तरी आपल्या बैठकी साठी भारताला निमंत्रण पाठवले आहे. पाकिस्तानने आगपाखड करत सुषमाजी बैठकीस आल्या तर आम्ही येणार नाही म्हणून त्रागा केला आहे त्याचे काय होते हे नजिकच्या दिवसात स्पष्ट होईल.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला सज्जड दम भरून हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा राजकीय निर्णय आणि राजकीय इच्छाशक्ती मोदी सरकारने दाखवली असून अशा प्रकारचे वर्तन यूपीए काळामध्ये पाहायला न मिळाल्यामुळे आज जनता मोदींवर प्रचंड खूष आहेो. हेच शल्य इथल्या राजकीय विरोधकांचे असून राष्ट्रीय संकटाच्या प्रसंगीही त्यांना केवळ २०१९ ची निवडणूक आणि त्यामध्ये आपला होऊ घातलेला अटळ पराभव पचवण्याचे भान त्यांच्याकडे उरलेले नाही. अर्थात विरोदकांनी अपशकुन केला म्हणून मोदींचा विजयरथ काही थांबणार नाही हे अटळ भविष्य आहे. ह्या संकटामधून कसोटीला उतरलेल्या सोन्यासारखे ते तावून सुलाखून बाहेर पडतील आणि त्यांच्या कर्तबगारीवर सोन्याची झळाळी चढेल हे निश्चित आहे.