Friday 31 August 2018

शहरी नक्षल - भाग ३


Image result for navlakha singhvi




जमाते पुरोगामींची कवायती फौज म्हणून मी लेख लिहिला. ही फौज काम कशी करते आणि त्यांच्या दिमतीला कोण कोण असते हे सगळे पडद्या आड जीवापाड जपलेले गुपित असते. पण काही नाट्य तरी सगळ्यांसमोर यावेच लागते. ऑगस्ट २८ रोजी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच व्यक्तींच्या बचावासाठी काही तासांच्या आत मध्ये न्यायालयामध्ये जे नाट्यपूर्ण प्रवेश घडले त्याची उजळणी होणे आवश्यक आहे.

किमान तीन कोर्टामध्ये प्रवेश रंगले होते. त्यापैकी दिल्ली हायकोर्टामध्ये अटक करण्यात आलेले श्री गौतम नवलखा ह्यांची केस चालू होती, पुणे कोर्टामध्ये इथे ताब्यात घेतलेल्या आरोपींची केस होती तर सर्वोच्च न्यायालयामध्ये एक नवी केस दाखल करण्यात आलेली होती. नेहरू घराण्याशी थेट संबंध असलेल्या प्रसिद्ध इतिहासकार श्रीमती रोमिला थापर व अन्य अर्जदारांनी हा अर्ज दाखल केला होता. 

पुणे पोलिसांनी रीतसर दिल्ली येथील मॅजिस्ट्रेटची ट्रान्झिट रिमांडची ऑर्डर मिळवून नवलखा ह्यांना ताब्यात घेऊन कायद्यानुसार त्यांना दुसर्‍या दिवशी कोर्टापुढे हजर केले होते. ही केस आली होती न्यायमूर्ती श्री जे. मुरलीधरन आणि न्यायमूर्ती विनोद गोयल ह्यांच्या समोर. ह्यापैकी श्री मुरलीधरन ह्यांची पत्नी श्रीमती उषा रामनाथन स्वतः वकील आहेत. काही माध्यमांनी असे छापले आहे की आधार कार्डावरती आक्षेप घेणार्‍या काही चळवळकर्त्यांच्या गटामध्ये ह्या सामील होत्या. तसेच श्री गौतम नवलखा ह्यांच्यासोबत त्यांनी या आधी कामही केले असल्याचे म्हटले आहे. जिज्ञासूंनी पुढील लिंकवरती उपलब्ध असलेली माहिती स्वतः तपासून घ्यावी. (https://amp.reddit.com/r/indianews/comments/9bib5h/ysk_delhi_hc_judge_muralidhar_who_gave_bail_to/?__twitter_impression=true) तर माध्यमांनी प्रकाशित केलेली ही माहिती तथ्यपूर्ण असेल तर सामान्य जनतेची हीच अपेक्षा असते की न्यायमूर्ती श्री मुरलीधरन ह्यांनी स्वतःहून ह्या केस मध्ये आपला कॉन्फ़्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असल्याचे जाहीर करून बाजूला व्हावे. तसे काही न झाल्यामुळे मुळात माध्यमे सांगत आहेत ती माहिती खरी आहे का ह्याची पडताळणी केस पुढे चालवण्याआधी केली जावी अशी अपेक्षा करणे संयुक्तिक ठरेल. 

आता प्रत्यक्ष कोर्टामध्ये काय झाले ते पाहू. केस सुरु होताच न्यायमूर्तींनी हे स्पष्ट केले की आपण नवलखा ह्याची अटक तसेच मॅजिस्ट्रेटने दिलेली ट्रान्झिट रिमांड ऑर्डर यथोचित होती का याबाबत इथे ऊहापोह करणार आहोत. पीठाने असे म्हटले की अटकेचा मेमो मराठीमध्ये आहे. तसेच इतरही काही कागदपत्रे मराठीमध्ये आहेत. एखाद्या माणसाला अटक होत आहे आणि त्याच्या अटकेचे कागद मात्र मराठीमध्ये आहेत मग अशा माणसाला आपल्याला का अटक होत आहे हे कसे समजणार असा प्रश्न पीठाने विचारला. मॅजिस्ट्रेटना दाखवण्यासाठी कागदपत्रे मराठीमध्ये आणली होती असे कोर्टाने नमूद केले पण जिथे कोर्टाला तसेच आरोपीला न कळणार्‍या भाषेमध्ये कागदपत्रे दाखवली गेली तिथे अशा आधारावरती मॅजिस्ट्रेटने ऑर्डर कशी दिली असा प्रश्न कोर्टाने विचारला तसेच - अशा प्रकारे मेकॅनिकली ऑर्डर देणे उचित नाही असे म्हटले. ह्यावेळी पोलिसांतर्फे कामकाज बघणारे वकील श्री अमन लेखी ह्यांनी असे प्रतिपादन केले की मॅजिस्ट्रेटसमोर कागदपत्रांचे तोंडी भाषांतर करण्यात आले होते . ट्रान्झिट रिमांड देणार्‍या मॅजिस्ट्रेटने केसच्या मेरीटमध्ये जाण्याची गरज नसते कारण त्याच्यासमोरील छाननीचे स्वरूप अत्यंत सीमित असते. मॅजिस्ट्रेटने केवळ प्रथमदर्शी पुरावा पुरेसा आहे की नाही एव्हढे बघायचे असते. अटक करताना श्री नवलखा ह्यांना अटक कशासाठी केली जात आहे ते समजावून सांगण्यात आले आहे असे श्री लेखी ह्यांनी सांगितले. मॅजिस्ट्रेटला केस डायरी तुम्ही दाखवली का असा प्रश्न न्यायालयाने विचारताच लेखी ह्यांनी म्हटले की पोलिस अधिकार्‍यांनी मॅजिस्ट्रेटला सर्व तथ्य ज्ञात करून दिली आहेत. पोलिस अधिकार्‍याने कोर्टाला सांगितले की मॅजिस्ट्रेटला डायरी दाखवण्यात आली नव्हती. ह्यानंतर अटक करताना पोलिसांनी साक्षीदार म्हणून कोणाला आणले होते ह्यावरही न्यायालयाने टिप्पणी केली. साक्षीदार म्हणून कुटुंबातील व्यक्ती असावी अथवा काही सन्माननीय स्थानिक नागरिक असणे जरूरीचे आहे. पण पोलिसांनी साक्षीदारही महाराष्ट्रातून आणले होते त्यांची विश्वसनीयता काय आहे असे न्यायालयाने विचारले. पोलिसांच्या अटकेमध्ये इच्छेविरोधात व्यतित करावा लागलेला प्रत्येक क्षण अटक झालेल्या व्यक्तीसाठी मोलाचा असतो असे न्यायमूर्ती म्हणाले.

इतके होईपर्यंत दिल्ली कोर्टामधून नवलखा ह्यांची केस उडवली जाणार का असे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आणि असे होण्याची कारणेही किती फुटकळ होती निदान देशातील सर्वसामान्य माणसाला सहजी पचनी पडणारी नव्हती. ह्यानंतर कोर्टाने आपली ऑर्डर जाहीर करण्यास सुरूवात केली. परंतु श्री. लेखी ह्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले की सर्वोच्च न्यायालयाने ऑर्डर्स दिल्या आहेत. ह्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ऑर्डर दिली असेल तर इथे ऑर्डर देणे उचित होणार नाही असे म्हणून कोर्टाने सुनावणी पुढील तारखेपर्यंत निलंबित ठेवली.  

खरे म्हणजे नवलखा तर दिल्ली कोर्टाच्या आदेशानुसार सुटलेच असते असे म्हणता येईल पण इथे नशीबावर विश्वास टाकावा का अशी घटना घडली. नवलखा व अन्य मान्यवर मित्रांना वाचवण्यासाठी त्यांच्याच हितचिंतक श्रीमती रोमिला थापर ह्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकलेल्या केसमुळेच नवलखा ह्यांना आज नजरकैदेमध्ये राहावे लागत आहे ते कसे ते आता पाहू. 

दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी थापर ह्यांचे वकील डॉ. सिंघवी ह्यांनी आपल्या केस उल्लेख न्यायमूर्तींसमोर केला असता त्यांनी दुपारी पावणेचारला आपण केस मेन्शन करावी असे सुचवले. त्यानुसार मेन्शन केलेल्या इतर बाबींवरती विचार झाल्यावरती कोर्ट उठता उठता संध्याकाळी ०४.४५ वाजता सिंघवी ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील पाच जणांच्या अटकेचा मामला अगदी जोरदारपणे मेन्शन केल्यामुळे तिथे सुनावणी सुरु झाली. तिथे मुख्य न्यायमूर्ती श्री दीपक मिश्रा - न्यायमूर्ती खानविलकर आणि न्यायमूर्ती चंड्रचूड ह्यांचे पीठ होते. सिंघवी म्हणाले भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी अन्य काही व्यक्तींना अटक केली होती. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या एफ आय आरमध्ये आता अटक झालेल्या पाच जणांचा नामोल्लेखही नाही. ह्या व्यक्ती घटनास्थळी उपस्थित नव्हत्या. त्या व्यक्ती कोणत्याही बैठकीमध्ये हजर नव्हत्या. ह्यामधील एक व्यक्ती अमेरिकन नागरिक होती पण ते नागरिकत्व सोडून देऊन त्या आता दिल्लीच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये प्राध्यपक म्हणून काम करत आहेत असे सिंघवी म्हणाले. घटना घडून गेल्यावरती आठ महिन्यांनंतर पोलिस ह्यांना अटक करून केवळ छळवाद करत आहेत असे सिंघवी म्हणाले. अशा प्रकारे कोणालाही अटक होऊ शकते अगदी तुम्हाला किंवा मलादेखील अटक होऊ शकते सांगतले गेले. तर ह्या अटका एकाएकी अनियोजितपणे करण्यात आल्या आहेत असे श्री राजीव धवन म्हणाले. 

ह्यावरती पोलिसांचे वकील श्री तुषार मेहता म्हणाले की अर्जदार केसशी संबंधित नाहीत त्यांना ह्या प्रकरणी न्यायालयाकडे दाद मागता येणार नाही. ह्यावरती श्री सिंघवी म्हणाले की अंतीमतः अटक झालेल्या व्यक्तींची पत्नी अथवा पती ह्यांना इथे यावेच लागेल. पाचापैकी दोघांच्या केसेस हायकोर्टासमोर आहेत तेव्हा खालच्या कोर्टाला ह्यामध्ये काय ती ऑर्डर देऊ द्यावी असे मेहता म्हणाले. ह्यावरती सिंघवी म्हणाले की सर्वोच्च न्यायालय मामला ऐकत आहे म्हणून मेहता ह्यांची तारांबळ उडाली आहे पण तसे होण्याची गरज नाही. घटनेच्या धारा २१ च्या अंतर्गत आम्ही मोठ्या व्याप्तीच्या संदर्भाने केस करत आहोत. एखाद्याचे सरकारशी पटले नाही म्हणून अशा तर्‍हेने अटक केली जावी ही गोष्ट आम्हाला बधीर करणारी आहे - ह्याची व्याप्ती केवळ ह्या व्यक्तीशः अटक करण्यात आलेल्या नागरिकांपुरती सीमित नाही म्हणून आम्ही कोर्टामध्ये आलो आहोत. आमचे सर्वच स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. यावर आपली तारांबळ उडाल्याचे मेहता ह्यांनी नाकारले. न्यायालयाने विचारले की ह्या पाच जणांना खरोखरच अटक झाली आहे का? ह्यावर सिंघवी म्हणाले की कोर्टाचा अवमान होण्याचा धोका पत्करून मी सांगतो की अटक झालेली आहे. न्यायालयाने अटकेवरती स्थगिती द्यावी असे सिंघवी म्हणाले. परंतु श्री मेहता ह्यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यांना आवाज उंचावत कडक शब्दात सुनावत "लोकशाहीमध्ये विरोधी आवाज असणे महत्वाचे असते नाही तर प्रेशर कुकरमध्ये वाफ कोंडली जाईल आणि त्याचा स्फोट होईल" असे न्यायमूर्ती श्री चंद्रचूड म्हणाले. अटकेला स्थगिती देण्यात येऊ नये म्हणून मेहता ह्यांनी बाजू लावून धरली ह्यावरती न्यायमूर्ती परस्परात विचार विनिमय करताना दिसले. पुढच्या गुरूवारपर्यंत स्वगृही नजरकैदेचा पर्याय स्वीकारायला प्रथम सिंघवी तयार नव्हते परंतु नंतर ते अंतरीम ऑर्डरसाठी तयार झाले. ह्याखेरीज केंद्र व राज्य सरकारने आपले म्हणणे ह्या मामल्यामध्ये मांडावे अशीही ऑर्डर देण्यात आली.

अशा प्रकारे नवलखा ह्यांच्या स्वगृही नजरकैदेची ऑर्डर सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे दिल्ली हायकोर्टाला ट्रान्झिट रिमांडची ऑर्डर तसेच अटकेचा मामला उडवता आला नसावा. 

एकंदरीतच टीव्हीवर जे पाहण्यात आले त्यानुसार हा खटला आपण अर्धा जिंकला असल्याचा आनंद श्री सिंघवी ह्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. कालच्या दिवसामध्ये माध्यमांनी पोलिसांकडे काय पुरावे आहेत ह्याची चुणूक दाखवली आहे. ह्याखेरीज आणखी दोन मामले कोर्टात दाखल करण्यात आले आहेत. त्यातला एक आहे तो म्हणजे नवलखा ह्यांच्यासाठी कोर्टाने हेबियस कोर्पसचा निकाल द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. शब्दशः हेबियस कोर्पस म्हणजे Produce the "body" before the court असे सांगणारा आदेश. तेव्हा वरील खटले आणि अंतरीम निकाल नवलखा ह्यांच्या विरोधात गेलेच तर ह्या हेबियस कोर्पस आदेशाला महत्व प्राप्त होईल. थापर ह्यांच्या अर्जामध्ये आपल्याला सामील करून घ्यावे असा अर्ज गड्लिंग ह्यांच्या पत्नीने जूनमध्ये अटक करण्यात आलेल्या पाचही व्यक्तींच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये केला आहे. 

ह्या सर्व घटनांवरती टिप्पणी करण्याची गरज नाही. वाचक सुज्ञ आहेत. सरकारपक्षातर्फे पोलिसांची बाजू जोरदारपणे मांडली गेली नाही अशी शंका अनेकांच्या मनामध्ये होती ती हे वाचल्यावरती दूर होऊ शकते. ह्या केसमध्ये किती दम आहे आणि ह्यांची अटक टिकेल का अशीही शंका अनेकांनी विचारली. पण त्याचे उत्तर किती अवघड आहे हेही स्पष्ट होईल. एका प्रबळ व्यवस्थेविरोधात मोदी सत्तेवर असूनसुद्धा लढाच देत नाहीत काय? सामान्य माणसे ह्या सर्व घटनाक्रमाची तुलना कर्नल पुरोहितांच्या केसशी करणार नाहीत काय? 

आपल्या देशाने आजवरती दोन पंतप्रधान हत्याप्रकरणातून गमावले आहेत. देशाच्या घटनात्मक पदी विराजमान असलेल्या पंतप्रधानाची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप असलेला मामला समोर येतो आणि न्यायमूर्ती म्हणतात की कुकरमधली कोंडलेली वाफ बाहेर पडणे गरजेचे असते नाही तर स्फोट होतो. म्हणजे आपल्या मनामधला रोष व्यक्त करण्याचे कायदात्मक साधन अशाप्रकारे कोणाचा खून करण्याचा कट रचणे आहे काय आणि अशा रोषाला कायदा मान्यता देतो काय असा प्रतिप्रश्न न्यायमूर्तींच्या ह्या प्रश्नामुळे माझ्या मनामध्ये उपस्थित झाला आहे. तो कदाचित गैरलागूही असेल किंवा माझी बुद्धी तोकडी असल्यामुळे आणि कायदेविषयक प्रक्रियेची पुरेशी कल्पना नसल्यामुळे मी तसा चुकीचा ग्रह देखील करून घेतलेला असू शकतो - जसजसा काळ जाईल तसतसे माझ्या मनातील शंका खोटीच होती असे सिद्ध झाले तर माझ्या इतका आनंद आणि कोणाला होईल? तोवरती समोरच्या केसेसमध्ये काय घडते त्याचा पाठपुरावा करणे महत्वाचे आहे.

ज्या व्यक्तींमुळे हे वादळ निर्माण झाले आहे त्यांची अगदी थोडक्यात माहिती देऊन ही मालिका पुढील भागामध्ये मी संपवणार आहे. धन्यवाद.

Thursday 30 August 2018

हिंदी: शहरी नक्षल - भाग २


Violence broke out on May 22 during protests demanding closure of the factory over pollution concerns and police opened fire, resulting in the death of 13 people.

मेरे परम मित्र श्री आनंद राजाध्यक्ष जी ने लेख का रूपांतरण कम से कम समय में हिंदी मे उपलब्ध करवाया है इस लिये में उनकी तहे दिल से आभारी हू

शहरी नक्सली - भाग २ (वरिष्ठ पत्रकार- विश्लेषक Swati Torsekar जी के दूसरे लेखांक का यथाशक्ति रूपांतर)
अर्बन पर्स्पेक्टीव्ह इस दस्तावेज़ में स्पष्टता से उल्लेख किया गया है कि माओवादियों का संघर्ष ग्रामीण विभाग से शुरू होगा - वहाँ के प्रदेशों में माओवादी शासत प्रस्थापित हो जाये और संगठन के पास पर्याप्त बल उपलब्ध हो जाये फिर शहरोंपर मोर्चा खोला जाएगा। प्रचलित शासन तंत्र गांवों तक सीधा पहुँचती नहीं, और वहाँ तक अपने दूत और प्रतिनिधि - कलेक्टर – बीडीओ, पुलिस आदि ब्रष्ट होने के कारण उनसे ट्रस्ट जनता को अपने साथ करा लेना सरल होता है । इसमें सरकार से अवरोध की संभावना भी कम ही होती है । इसीलिए ग्रामीण विभागों में अपनी धाक जमाकर वहाँ कम्यून पद्धति से गाँव के कामों की पुनर्रचना करना और आते हुए सभी करों से अपनी जेबें भरना यह माओवादियों की पुरानी कार्यपद्धति है ।
शहरों में संगठन का काम करने जैसी परिस्थिति अवश्य उपलब्ध है क्योंकि गावों से स्थलांतरित हुए मजदूरों के शोषण पर शहरों का अर्थचक्र चलता है । किन्तु यहाँ शासन अत्यंत शक्तिशाली होने के कारण किसी भी विद्रोह को पाशविक बल से रौंदने की क्षमता सरकार के पास होती है और उसे इस्तेमाल भी किया जाता है । इसीलिए शहरों में संगठन को प्रबल बनाने का काम माओवादियों को क्रांति के आखरी स्तर में करना होगा ऐसे दस्तावेज़ में निर्देश हैं ।
लेकिन ऐसा होने के बावजूद यूं भी तो नहीं है कि शहर में कोई भी काम आज नहीं किया जाये, बल्कि अत्यंत महत्वपूर्ण ऐसे कई काम शहरी दलों को सौंपे जाते हैं । यहाँ एक स्पष्ट नियम बताया गया है । माओवादियों ने अपने काम के दो विभाग किए हैं जो एक दूसरे से स्वतंत्र हैं । एक विभाग लोकाभिमुख रहता है ताकि कानून के दायरे में संगठन के जो भी काम आयेन उन्हें अंजाम दे सकें । दूसरे का काम अवैध कर्मों को गुप्त रीति से करना होता है । माओवादियों का मूल उद्देश्य भारत के क़ानूनों की संरचना के अनुसार नहीं हो सकता इसलिए वह अवैध है। तब जो भी कार्यकर्ता इस मूल उद्देश्य को समर्पित काम करते हैं उनके लिए नियम बना है कि वे कभी भी लोकाभिमुख कामों में सहभागी न हों । इसका हेतु स्पष्ट है ।
अब ये नियम यदि सरल लगे तब भी इसका अर्थ समझना आवश्यक है । जिन पांचों को पुलिस ने गिरफ्तार किया है वे 'विधि की संरचना' में आनेवाले काम करते हैं। इसीलिए यही रोंआराट मचा है कि उन्होने किसी भी नियम का भंग नहीं किया है और पुलिस ने उन्हें गिरफ्तार किया है । याने वास्तव में ये लोग यही स्वीकार कर रहे हैं कि विधि की चौखट में रहकर भी माओवादियों के काम सुचारु रूप से किए जा सकते हैं ।
फिर भी यद्यपि वे इस बात के आग्रही हैं कि उनकी गतिविधियां अवैध नहीं है, उनके कथन में अनेक विसंगतियाँ भी दिखाई देती हैं । उदाहरण के लिए कोबाद घान्दी की केस देखते हैं । जहां प्रवेश पाना सामान्य व्यक्ति के लिए दुष्कर कर्म है ऐसे लंदन स्कूल ऑफ इक्नोमिक्स जैसी मान्यवर विदेशी संस्थान से पदवी प्राप्त किए कोबाद घान्दी दिल्ली में एक फर्जी नाम से रह रहे थे और कोर्ट ने उन्हें इसलिए दोषी ठहराया था। (https://indiankanoon.org/doc/169474309/) इतने पढे लिखे संभ्रांत व्यक्ति को फर्जी नाम से रहने की आवश्यकता क्यों आन पड़ी क्या ये रहस्यमय नहीं ? शायद यूपीए सत्ता के अधीन पुलिस ये सिद्ध न कर पायी होगी कि फर्जी नाम से वे क्या काम कर रहे थे ।
माओवादियों का सशस्त्र संघर्ष भले ही पहले स्तर पर ग्रामीण विभागों में लड़ना होता है और उसका मूल काम पीपल्स लिबरेशन आर्मी (जन मुक्ति सेना) को सौंप दिया हो, इस आर्मी की गतिविधियां सुचारु रूप से चले इसलिए कई काम आवश्यक होते हैं । भारतीय सेना में भी सैनिकों को लगनेवाले खाने का सामान, यूनिफ़ोर्म, असलहा खरेदी आदि हजारों काम होते हैं और ये सभी काम करनेवाले कर्मचारी भी आखिर सेना का ही काम कर रहे होते हैं । इसलिए सेना का कर्मचारी केवल वही नहीं होता जो हाथ में बंदूक लिए लड़ता है। इसी तरह माओवादियों की सेना के लिए काम करनेवाले कई दल होते हैं ।
यह सर्वविदित है कि माओवादियों के गढ़ दुर्गम पहाड़ों में हैं जहाँ कोई फ़ैक्टरियाँ तो रहने दीजिये, बिजली भी नहीं है । इसका यही मतलब होता है कि इन सब चीजों का उत्पादन शहरों में ही होता है और माओवादियों को भी शहरों से ही उन्हें ख़रीदारी करनी आवश्यक है । माओवादी अपने कुछ शस्त्र खुद ही बनाते हैं लेकिन इस काम में आवश्यक कुछ पुर्जों का निर्माण शहरों में ही होता है । और यह काम बहुतही सफाई से किया जाता है । RAW के भूतपूर्व स्पेशल सेक्रेटरी श्री अमर भूषण कहते हैं कि असलहा जुटाना आसान नहीं । हालांकि कई बार माओवादी पुलिस के ही हथिर लूट जाते हैं यह सच है, लेकिन विदेशों से भी हथियार उपलब्धि के राजमार्ग बन गए हैं । इन खेपों को ग्रामीण माओवादियों तक पहुँचाने का काम शहरी माओवादी दल करते हैं ।
जिस ग्रामीण विभाग पर वे अपनी पकड़ जमा लेते हैं वहाँ भी अपनी सत्ता चलाने के लिए उन्हें कई चीजों की आवश्यकता होती है जो शहरों से ही जुटाई जाती हैं । शहरों का एकौर उपयोग होता है वो है कि यहाँ से पूर्णकालिक कार्यकर्ता उपलब्ध होते हैं । इस काम में माओवादियों को महारत होती है । फिर इन्हीं कार्यकर्ताओं को ग्रामीण विभाग्की तरफ मोड दिया जाता है । चीज़ें एक जगह से दूसरी जगह ले जाने के लिए शहरों से गुजरना होता है। ऐसे समय उन कार्यकर्ताओं के लिए उन शहरों में रहने की व्यवस्था करनी होती है । इसलिए Safe Houses के व्यवस्था करनी होती है । क्योंकि अपनी जान जोखिम में डालकर चलनेवाले कार्यकर्ता पुलिस के हाथों न लगे यह देखना होता है । ये महत्व की ज़िम्मेदारी शहरी माओवादी संभालते हैं ।
माओवादियों को शहरों में अधिक रस होने का एक कारण और भी है। देश के लिए जो अत्यावश्यक चीजें बनाने के कारखाने शहरों में होते हैं उनके क्रियाकलाप में अवरोध उत्पन्न कर उन्हें ठप्प कर देने की इनकी रणनीति होती है । ताजा उदाहरण तमिलनाडु की स्टरलाइट। देश के लिए जरूरी तांबा बनेवाली यह कंपनी ठप्प करवाने के बाद अब मुँहमाँगे चढ़े दामों पर महत्वपूर्ण विदेशी चलन दे कर तांबा खरीदने का विकल्प नहीं बचा। स्वाभाविक है कि देशहित को चोट पहुंचानेवाली यह कार्यप्रणाली को चलाने के लिए पर्यावरण से मानवाधिकार तक किसी भी कारण की ढाल आगे की जाती है, यह अनुभवित है।
शहरी माओवादी यहीं काम आते हैं ।
विदेशों से आती आर्थिक सहायता के उपयोग से देश को जलता रखना और उसके विखंडन का कार्य अनवरत जारी रखना यह भी शहरी माओवादियों का जिम्मा होता है ऐसे श्री अमर भूषण का कहना है (https://www.oneindia.com/…/urban-naxals-provide-the-pipelin…)
अगर माओवादियों के शत्रु का याने शासन का प्रबल केंद्र शहर में है तो ऐसे केंद्रस्थान में रहकर अधिकाधिक जानकारी इकट्ठा करना तथा नज़र रक्खे रहने का काम भी शहर में रहनेवाले शहरी माओवादी ही करते हैं । इसके लिए कभी प्रशासन के उच्चपदस्थ लोगों में घुलमिलकर रहना होता है । इनमें सरकार के सुरक्षा दल, सेना, राजनेता, वरिष्ठ सरकारी अधिकारी आदि सभी आते हैं । ऐसे लोगों में सहज होकर रहना और उनके मानों में अपने लिए यह विश्वास पैदा करना कि आप उनके हितैषी हैं, यह काम शहरी माओवादी बड़ी ही सफाई से निभाते हैं । उनकी यह धारणा है कि इसी तरह से सरकारी यंत्रणा को खोखली की जाये ये आवश्यक है ।
आज के सायबर युद्ध का महत्व माओवादी अच्छे से समझते हैं, इसीलिए इस क्षेत्र के एक्सपर्ट्स उन्होने अपने खेमे में खींच लिए हैं । इसलिए "ग्रामीण विभाग में हाथ में बंदूक लेकर लड़नेवाले माओवादी को आप एकबार गोली चलकर खत्म कर सकते हैं लेकिन यह शहरी माओवादी गोलियों से खत्म नहीं किया जा सकता । जबतक वो जिंदा है, अगले कार्यकर्ता बनाते जाता है । इसीलिए शहरी माओवादी अधिक भयंकर होते हैं "ऐसे श्री अमर भूषण का कहना है ।
इस पोस्ट में इतनी जानकारी के बाद, अगली पोस्ट में जो पकड़े गए हैं उनकी बैक्ग्राउण्ड का अभ्यास करेंगे ।
जारी......

जमाते पुरोगामींची कवायती फौज


Image result for romila thapar grover bhushan




दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी देशभरातून पाच वरिष्ठ माओवादी नेत्यांना ताब्यात घेतले. - ह्या घटनेनंतर तमाम जमाते पुरोगामी युद्धाच्या मैदानात उतरले असून आपले सामर्थ्य किती आहे ह्याची चुणूक त्यांनी अगदी थोडक्या अवधीमध्ये दाखवून दिली आहे.

ज्या गतीने श्रीमती रोमिला थापर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी दाखल झाल्या - सोबत १५ ख्यातनाम वकिलांची फौज दिमतीला घेऊन - दिल्ली उच्च न्यायालयामध्ये श्री गौतम नवलखा ह्यांच्य अटकेवरती त्यांच्या वकिलांनी अवघ्या काही तासाच्या तयारीने घेतलेल्या आक्षेपांना पुणे पोलिसांना न्यायालयाचे समाधान करणारी उत्तरे देता आली नाहीत - इथे पुणे कोर्टामध्ये हेच नाट्य रंगले - सर्वोच्च न्यायालयाने एकंदर प्रकरणावरती घेतलेला रोख - हे सर्व होत असतानाच माध्यमांनी माओवाद्यांच्या समर्थनासाठी घेतलेली सर्वंकष उडी - मुंबई येथे तब्बल ३७ स्वयंसेवी संघटनांनी घेतलेली वार्ताहर परिषद - मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्र सरकारला नोटिस - आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून भाजप सरकारवरती टीका - सरकार मागल्या दाराने आणिबाणी लागू करत असल्याचा आरोप - पकडले गेलेले माओवादी निखालसपणे केवळ असल्याचे ठाम प्रतिपादन! बाबा माझ्या!

एक गोष्ट निर्विवादपणे मान्य केली पाहिजे की जमाते पुरोगाम्यांकडे "कवायती" सैन्य आहे. आणि ते प्रत्येक क्षणी सज्जच आहे. त्याविरुद्ध भाजप सरकार व पक्षाची टीम तोकडी पडली असे दिसते. कल्पना करा की ह्याच प्रकारे यूपीएने भाजपशी संलग्न असलेल्या पाच जणांना असेच आरोप करत उचलले असते तर आज काय वातावरण असते?

उचललेल्या लोकांना देशातील सर्वोत्तम वकिल मिळण्याची शक्यता शून्य. माध्यमांना आपले म्हणणे कळवण्याचे तोकडे प्रयत्न. आंतरराष्ट्रीय माध्यमे तर सोडूनच द्या. ह्यांच्या कडे ३७ स्वयंसेवी संघटना ही नसाव्यात. असल्याच तर त्या एकत्र येऊन अशा वार्ताहर परिषदेमध्ये एका सुरात बोलण्याचे भाग्य वेगळे. पक्ष म्हणून केंद्र आणि राज्य पक्षात ताळमेळ राहिला असताच असे नाही. आपल्यावरील आरोपांना उत्तर काय द्यावे कसे द्यावे लोकांना पटेल अशा भाषेत ते कसे शेवटपर्यंत पोचवावे ह्याविषयी पूर्ण काळॊख.

ही विषम परिस्थिती का बरे येते?

आपण सगळे इतिहास शिकलो. पण त्यातून काही शिकलो नाही. असे म्हणतात की ब्रिटिशांकडे कवायती सैन्य होते म्हणून एतद्देशीय राजे त्यांच्याशी युद्ध करताना कमी पडले. तर इथल्या राजांचे सैन्य कसे होते? इथल्या राजांचे सैनिक शांततेच्या काळामध्ये आपापल्या घरी असायचे. आपापल्या उद्योगामध्ये - शेतीमध्ये मग्न! ह्या काळाचा पगार मिळत नसे. युद्धाची चाहूल लागली की राजा प्रथम आपल्या वतनदारांना आपापले सैन्य घेऊन या म्हणून निरोप दे ई - वतनदारांना राजाकडून पैसा मिळाला की तो सैनिक घेऊन हजर होई. ह्या विरुद्ध ब्रिटिशांचे सैन्य कवायती होते. ते फुल टाईम सैनिक होते. ते केवळ लढाईचाच विचार करत आणि त्यासाठी अखंड अविरत तयारी करत. त्यामुळे युद्ध आले म्हटले की त्यांना पूर्वतयारीची गरज नसे.

आज जमाते पुरोगामींकडे अशी कवयती फौज आहे!! गेल्या दोन दिवसामध्ये ते आपल्याला स्पष्टपणे दिसले आहे. कवायती सैन्याकडून चुका होत नाहीत - झाल्या तरी गंभीर चुका होत नाहीत. कारण त्यांना युद्धाचा वेगळा सराव करावा लागत नाही.

हा अनुभव नवा नाही. मोदी शहा दुकलीला तर अजिबात नाही. २००२ पासून आजपर्यंत त्यांना ह्याच परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे ना? मग निदान आता तरी ह्यावरती परिणामकारक योजना हवी असे वाटायला हवे ना?


इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर देखील परिवाराने ह्यातून धडे घेतलेले नाहीत. इथून पुढे घेतले जातील ह्याची शक्यता नाही. प्रश्न माओवादाचा होता आणि असे एकही केंद्र भाजपकडे उपलब्ध नाही जिथे माहिती उपलब्ध असेल आणि माध्यमांसमोर त्यातले काय बोलावे ह्याची गाईडलाईनही उपलब्ध नाही.

साहजिक आहे अशी टीम "फ्लुक" ने जिंकू शकते. पण एखाद्या कारखान्यामधल्या रिफाएन केलेल्या उत्पादनाची गुणवत्ता त्यांच्यामध्ये येऊ शकत नाही.

जाणवले ते लिहिले. बाकी - ईश्वराच्या हाती ठेवायचे की ह्यामध्ये बदल करायचा? ठरवा काय ते. धन्यवाद.

शहरी नक्षल - भाग २


Violence broke out on May 22 during protests demanding closure of the factory over pollution concerns and police opened fire, resulting in the death of 13 people.




अर्बन पर्स्पेक्टीव्ह ह्या दस्तावेजामध्ये असा स्पष्ट उल्लेख केला आहे की माओवाद्यांचा लढा हा ग्रामीण भागापासून सुरू होईल - तेथील प्रदेशामध्ये माओवाद्यांची "सत्ता प्रस्थापित" झाली आणि संघटनेकडे पुरेसे पाठबळ तयार झाले की मोर्चा शहरांकडे वळवला जाईल. ग्रामीण विभागापर्यंत प्रचलित शासनव्यवस्था पोचू शकत नाही आणि तिथपर्यंत पोचणार्‍या सरकारी व्यवस्थेचे दूत - कलेक्टर मामलेदार पोलिस आदि - भ्रष्ट असल्यामुळे त्रस्त जनतेला आपल्या मागे ओढणे सोपे आहे आणि ह्या आपल्या कामामध्ये सरकारकडून अडथळा येण्याची शक्यता कमी आहे. म्हणून ग्रामीण विभागावरती वचक बसवून तिथे कम्यून पद्धतीने गावातील कामांची फेररचना करणे आणि तेथील सर्व करसंपत्ती स्वतःच्या खिशात घालणे ही माओवाद्यांची कार्यपद्धती आहे. शहरामध्ये संघटनेचे काम उभारण्यासारखी परिस्थिती जरूर उपलब्ध आहे कारण खेड्यांकडून स्थलांतरित झालेल्या मजूरांच्या शोषणावरती तेथील आर्थिक चक्र चालवले जाते. परंतु इथेच शासनव्यवस्था अतिशय प्रबळ असल्यामुळे कोणतेही बंड पाशवी बलाचा वापर करून चिरडण्याची क्षमता सरकारकडे असते व ती वापरली जाते. म्हणून शहरांमध्ये प्रबळ संघटन बांधण्याचे काम माओवादी क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये करतील असे दस्तावेजामध्ये म्हटले आहे.

असे असले तरीही शहरामध्ये कोणतेच काम आजच्या मितीला करण्यासारखे नाही असा निष्कर्ष त्यांनी अर्थातच आढलेला नाही. उलटपक्षी अत्यंत महत्वपूर्ण अशी अनेक कामे शहरी तुकड्यांवरती सोपवण्यात येत असतात. ह्याबाबतीत एक स्पष्ट नियम सांगण्यात आला आहे. माओवाद्यांनी आपल्या कामाचे दोन स्वतंत्र भाग केलेले आहेत. एक म्हणजे लोकाभिमुख राहून उघड माथ्याने संघटनेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी करावयाची कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारी कामे. दुसरे म्हणजे भूमिगत राहून कायद्याच्या चौकटीमध्ये न बसणारी छुप्यारीतीने करावयाची कामे. माओवाद्यांचे मूळ काम हे आजच्या घटनेच्या चौकटीमध्ये बसू शकत नाही म्हणजेच ते बेकायदेशीर म्हणावे लागते. मग जे कार्यकर्ते ह्या मूळ कामामध्ये रुजू होतात त्यांनी लोकाभिमुख कामामध्ये कधीही सहभाग घेऊ नये असा दंडक बनवण्यात आलेला आहे. आणि त्याचा हेतू स्पष्ट आहे.

आता हा नियम जरी सोपा वाटला तरीही त्याचा अर्थ समजून घ्यावा. आज ज्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतले आहे ते असे संघटनेची "कायद्याच्या चौकटीमध्ये" बसणारी कामे करतात सबब त्यांनी कोणताही कायदा मोडला नसूनही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे रड चालू आहे ना? म्हणजेच कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनही माओवाद्यांचे काम प्रभावीपणे करता येते ह्याची कबूली ही मंडळी देत आहेत. अर्थात वरील मंडळींनी आपली सर्व कामे कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच केली आहेत असे आग्रहाने ते प्रतिपादन करत असले तरी त्यामध्ये अनेक विसंगती असतातच. उदा. कोबाड गाअंधी ह्यांची केस तुम्हाला आठवत असेल. जिथे साधा प्रवेश मिळवणेही अशक्यप्राय धरले जाते त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ह्या प्रतिष्ठित परदेशी संस्थेमधून पदवी घेतलेले कोबाड गांधी प्रत्यक्षात दिल्ली शहरामध्ये एका खोट्या नावाने वावरत होते आणि त्यासाठी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. (https://indiankanoon.org/doc/169474309/) इतका शिकला सवरलेला माणूस पण त्याला खोट्या नावाने का वावरावे लागत होते हे गूढ नाही का? असे खोटे नाव परिधान करून ते नेमके कोणते काम करत होते हे यूपी ए राज्यातील पोलिस बहुधा सिद्ध करू शकले नसावेत.

माओवाद्यांचा सशस्त्र लढा प्रथमच्या टप्प्यामध्ये ग्रामीण विभागामध्ये लढायचा असला आणि त्याचे मूळ काम पीपल्स लिबरेशन आर्मीवरती सोपवण्यात आलेले असले तरीही ह्या आर्मीचे काम सुरळीत चालावे म्हणून इतर अन्य कामे असतात. अगदी भारतीय सैन्यामध्येही सनिकांना लागणार्‍या शिधा - गणवेषापासून ते हत्यारे खरेदीपर्यंत अनंत कामे असतात आणि ती करणारे कर्मचारीदेखील अंतीमतः सैन्याचेच काम करत असतात. तेव्हा हाती बंदूक घेऊन लधले म्हणजे जसा भारतीय सैन्यातील माणूस असे म्हणता येत नाही तसेच माओवाद्यांच्या सैन्यासाठी लागणारे अनेक कामे करणारी दले असतात. माओवाद्यांचे बालेकिल्ले ज्या दुर्गम पर्वतराजीमध्ये आहेत - ग्रामीण भागामध्ये आहेत तिथे कारखानदारी नाही - तिथे मुळात वीज सुद्धा नाही हे आपल्याला माहिती आहे. मग अशा वस्तूंचे अर्थातच शहरामध्ये उत्पादन होत असते आणि माओवाद्यांनाही त्या तिथूनच विकत घ्याव्या लागतात. माओवादी आपली काही हत्यारे स्वतःच बनवतात. त्यासाठी लागणारे सुटे भाग शहरामधून बनवून घ्यावे लागतात. हे काम सोळभोकपणे केले जात असते. श्री अमर भूषण - "रॉ"चे माजी स्पेशल सेक्रेटरी म्हणतात की "हत्यारे शस्त्रास्त्रे मिळवणे हे सोपे काम नाही. अनेकदा माओवादी पोलिसांचीच शस्त्रास्त्रे लुटून नेतात हे खरे असले तरी परदेशामधून शस्त्रास्त्रे मिळवण्याचे राजमार्ग तयार झाले आहेत. ही सामग्री ग्रामीण माओवाद्यांपर्यंत पोचवण्याचे महत्वाचे काम शहरी माओवादी करतात."

ज्या ग्रामीण विभागावरती ते आपली पकड निर्माण करतात त्या "शासनासाठी" देखील त्यांना अनेक गोष्टींची गरज असते आणि त्याही शहरातून मिळवल्या जातात. शहरांचा एक मोठा उपयोग म्हणजे इथून पूर्णवेळ कामासाठी कार्यकर्ते मिळवणे. हे काम प्रभावीपणे केले जाते. मग हेच कार्यकर्ते ग्रामीण विभागाकडे वळवले जातात. एका ठिकाणच्या "वस्तू" दुसर्‍या विभागामध्ये नेण्यासाठी अनेकदा शहरामधून प्रवास करावा लागतो. अशा वेळी कार्यकर्त्यांची शहरामध्ये राहण्याची व्यवस्था असावी लागते. त्यासाठी Safe House ची सोय करावी लागते. कारण ही जोखीम घेणारे कार्यकर्ते पोलिसांच्या हाती लागणार नाहीत हे बघावे लागते. हे महत्वाचे काम शहरी माओवादी करत असतात.

शहरांमध्ये माओवाद्यांना एका महत्वाच्या बाबीमध्ये रस असतो. देशासाठी जे अत्यावश्यक सामग्री बनवणारे कारखाने असतात त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करून ते बंद पाडण्याची रणनीती असते. ह्याचे अगदी ताजे उदाहरण द्यायचे तर तामिळनाडूमधील स्टरलाईट कंपनीकडे बोट दाखवता येईल. देशासाठी आवश्यक तांबे बनवणारी ही कांपनी बंद पाडल्यामुळे अव्वाच्या सव्वा किंमत आणि अतिशय महत्वाचे परकीय चलन वापरून ते आयात करणे हाच एक पर्याय उरतो. साहजिकच देशाच्या हितावरती आघात करणारी ही कार्यपद्धती राबवण्यासाठी पर्यावरणापासून ते मानवाधिकारापर्यंत कोणतीही ढाल पुढे केली जाते हा आपला अनुभव आहे. ही कामे अर्थातच शहरी माओवादी करू शकतात. परदेशामधून येणारी आर्थिक मदत वापरून त्याच्या मदतीने देश पेटता ठेवण्याचे काम आणि त्याचे विघटन सोपे करण्याचे काम शहरी माओवादी करतात असे श्री अमर भूषण म्हणतात. (https://www.oneindia.com/india/urban-naxals-provide-the-pipeline-for-arms-money-to-reach-jungles-ex-spl-secy-raw-2765206.html?utm_sourcearticle)

जर माओवाद्यांच्या शत्रूचे म्हणजे शासनाचे प्रबळ केंद्र शहरात असेल तर अशा केंद्रस्थानी राहून जास्तीतजास्त माहिती गोळा करण्याचे रेकी करण्याचे टेहळणी करण्याचे अशी कामे शहरामध्ये राहून करावी लागतात. ही कामे शहरी माओवादी करू शकतात. इतकेच नव्हे तर अशी टेहळणी अथवा माहिती गोळा करण्याचे काम सरकारमधील उच्चपदस्थ अधिकार्‍यांमध्ये मिसळून करावे लागते. ह्यामध्ये सरकारची सुरक्षा दले, लष्कर - राजकीय नेतृत्व - वरिष्ठ सरकारी अधिकारी वर्ग आदि येतात. अशा लोकांमध्ये सहजपणे मिसळून वावरण्याचे आणि आपण तुमचे हितचिंतक आहोत असे दाखवण्याचे काम शहरी माओवादी बेमालूमपणे करू शकतात. अशा तर्‍हेने सरकारी सुरक्षाव्यवस्था पोखरण्यात यश मिळाले तरच शहरामध्ये आपले बस्तान बसू शकेल अशी त्यांची धारणा आहे.

आजच्या युगामध्ये नव्याने अवतरलेल्या सायबर युद्धाचे महत्व जाणून त्या क्षेत्रामधले तज्ञ माओवाद्यांनी आपलेसे केलेले आहेत. म्हणून "ग्रामीण भागातील हातामध्ये शस्त्र घेऊन लढणार्‍या माओवाद्याला एकदा गोळ्या घालून एक वेळ तुम्ही संपवाल पण शहरामधला हा माओवादी गोळ्या घालून संपवता येत नाही. तो जीवंत असतो तोवर पुढचे कार्यकर्ते तयार करतच असतो. ह्या दृष्टीने पाहता शहरी माओवादी अधिक भयंकर आहेत" असे श्री अमर भूषण ह्यांनी म्हटले आहे.

एव्हढी माहिती घेतल्यानंतर आता जे पकडले गेले आहेत त्यांच्या पूर्वपीठिकेबाबत माहिती पुढील भागामध्ये घेऊ.

Wednesday 29 August 2018

Urban Naxals - Part 1

Poet Varavara Rao after his arrest in Hyderabad

Poet Varavara Rao arrested in case relating to conspiracy to assassinate PM Modi - 28th Aug 2018



Unfolding the tangled knuckles of ‘Urban Naxals’

Unfolding many pages of a secret conspiracy and convicting those responsible for the Bhima Koregaon violence case, the Pune police conducted raids at the residences of five so-called activists across the country for their strong Maoist links. With the arrest of the so-called activists coming into the limelight, the media witnessed a blowing debate in the country between the people who supported and opposed these ‘Urban Naxals’.

Debating over the concept of Urban Naxals, there are many unsaid facts and factors that have been kept hidden in the bouquet will now be clarified from this article.

To understand this concept, let us understand what exactly ‘Urban Naxalism’ is. So, ‘Urban Naxals’ are basically the "Arm Chair Politicians" who are the so-called activists whom we see on television speaking on politics, write about it. These are those who represent themselves as supporters of poor people living in the interiors talking about the injustice encumbered on them through newspapers, television, and social media. They have created an image of being ‘urban Naxals’ before the people.


To understand the demonic face of the Urban Naxals, we need to go in depth to comprehend these people. To begin with, first of all, let us first understand the significance of urban areas in terms of Naxalism. In the year 2001, the Maoists Polit Bureau had published a document called "Urban Perspective". The document illustrates in detail the role played by the Naxalites which helped the police to track down the arrest of the city of Naxalites.

Let us first look at what is known in this document. The statements are given below completely from this document published as ‘Urban Perspective’.

1. Although urban areas are considered to be at the last phase, we still feel the presence of important places in the urban areas. As urban areas are often active, the group will easily get accustomed to active members for conducting movements. The work of the organization in the urban areas is essential for the continuation of the public welfare in rural areas and the Maoist organization to "liberate" the government from exodus. In the urban area, "enemy" is the most powerful. Building a strong organization in urban areas is an integral step to counter this.

2. According to the 2001 census, almost 27% of the population comprising of 28 crores lived in urban areas. In 1951, 56% of the country's income was brought in from the rural area and now the share from this area only amount to 25%. There are a total of 35 centres in the urban division, with a large part of it being in Delhi, Mumbai, Calcutta, and Chennai. These centres are standing for the hard work done by the migrant labourers. The exploited class is not concentrated because these labourers are politically provoked by provincial or religious divisions.

3. The Mao comrade says, "The final objective of the revolution is the capture of the cities, the enemy’s main bases, and this objective cannot be achieved without adequate work in the cities." (Mao, Selected Works, Vol. II, Pg. 317) "Those organizations, which openly propagate Party politics, should generally function secretly. Those organizations functioning openly and legally, generally cannot openly identify with the Party, and should work under some cover with a limited programme." It further states that the organizations which are run legally should undertake limited programs and these organizations should not expose their relationship to the Maoist party. The organizations which are directly working in the party should secretly organize the organization.

4. Correctly coordinating between illegal and legal structures, we should have an approach of step by step raising the forms of struggle and preparing the masses to stand up against the might of the state.

5. The police force, military and other government departments have a strong hold on suppressing the rise of Naxalism in urban areas which suppresses the voice of the revolution. This suppresses the struggle of the workers. Work should be done in the city in such a way that it should be responded to in time.

6. While the main military tasks are performed by the PGA and PLA in the countryside, the urban movement to performs tasks complementary to the rural armed struggle. These involve the sending of cadre to the countryside, infiltration of enemy ranks, organizing in key industries, sabotage actions in coordination with the rural armed struggle, logistical support, etc.

7. The objectives of our intelligence work should be to learn about and study the tactics and plans of the enemy forces in the area, to study the activities of informers, to prevent infiltration into the organization.

8. The document cites, “Infiltration into the Enemy Camp. It is very important to penetrate into the military, para-military forces, police, and higher levels of the administrative machinery of the state. The cities are the strongholds of the enemy and have a large concentration of enemy forces. It is therefore from the cities that attention must be given to this task."

9. Supplies or contacts for supplies of certain types are only available in the urban areas. Examples of such supplies are arms and ammunition, spare parts, certain types of medical supplies, etc. Helping the People’s Army to establish the supply lines in this regard is a task that the urban organization can perform.

10. Logistical networks should be established in absolute secrecy over a period of time. Separate comrades should be allocated for such work and once they are so allocated they should be released from other work and delinked completely from the mass work.

11. The urban cadres of the Naxal groups are given the responsibility of fighting the cyber war with the military.

As we entangled the clutches of the tangled concept of Urban Naxals, a part of the document also focuses on the ‘Hindu Fascists’ group and what can be done against them in the city.

Note: The documents STIR and Urban Perspective are available on internet. Before publishing my book on Maoism in 2013, I did inquire with some police officers about the authenticity of the same. While I did not receive a reply to my query, I find that the maoists are indeed following the modus operendi described in the document for organising their outfits in urban areas. The article is based on such observations.

P.S. I thank NEWSBHARATI for translating my Marathi blog into English within hours and publishing on their website today. The link to the article is given here. Do visit and share with your friends.

http://www.newsbharati.com/Encyc/2018/8/29/Urban-Naxals-in-India-.html

Tuesday 28 August 2018

हिंदी आवृत्ती - शहरी नक्षल भाग १

Poet Varavara Rao after his arrest in Hyderabad

Poet Varavara Rao arrested in case relating to conspiracy to assassinate PM Modi - 28th Aug 2018

मेरे परम मित्र श्री आनंद राजाध्यक्ष जी ने लेख का रूपांतरण कम से कम समय में हिंदी मे उपलब्ध करवाया है इस लिये में उनकी तहे दिल से आभारी हू


जब से कल देशभर से शहरी नक्सलियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है, खलबली मचनी ही थी। उनके समर्थक एवं विरोधी दोनों ही विविध माध्यमों से अपने अपने मत विशेष आग्रह के साथ रखते दिख रहे हैं । किन्तु सभी जगह अनेक तथ्य गायब ही दिख रहे हैं, इसीलिए यह लेखमाला लिखी जा रही है ।

यह दिख रहा है  कि आम तौर पर शहरी नक्सलियों पर जोरदार हमला करनेवाले  भी पुलिस / सरकार की इस कार्रवाई का ठीक से समर्थन नहीं कर पा रहे हैं । कारण यह है कि शहरी नक्सलियों की जो प्रतिमा बनाई गयी है वह है महज "Arm Chair Politicians" की है याने एसी में आराम से बैठकर राजनीति की चर्चा करनेवाले जिनका वास्तव से कोई लेना देना नहीं, उसपर लिखानेवाले, भाषण देनेवाले विद्वान - पूँजीपतियों द्वारा शोषित देश की पददलित जनता का दम घोंट दिये जाने के विरोध में टीवी, अखबार तथा सोशल आदि हर मीडिया में आवाज उठानेवाले - ग्रामीण भारत में सशस्त्र संघर्ष करनेवाले गरीब आदिवासी नक्सली माओवादियों की बात रखनेवाले और इसलिए उनपर होते अन्याय को पूरी ताकत से वाचा देनेवाले बुद्धिजीवी याने शहरी नक्षली होते हैं  -ऐसी प्रतिमा बनाई गयी है ।

वस्तुस्थिति दूसरे ध्रुव की है ।

आप को मेरी बात कितनी भी तर्क से हटकर लगे, जब तक गहराई में जाकर इसकी जानकारी नहीं पा लेते, इन शहरी नक्सलियों की असलियत की पहचान हो पाना कठिन है इतना समझ लीजिये ।

 इसकी शुरुआत करनी होगी ये समझकर कि नक्सलियों की नज़र में शहरों का क्या महत्व होता है । माओवादियों के पॉलिट ब्यूरो ने 2001 में एक दस्तावेज़ प्रसिद्ध किया था जिसका नाम है Urban Perspective। इस दस्तावेज़ में नक्सलियों ने अपनी भूमिका विस्तार से रखी है और हमारे लिए यह जरूरी हो जाता है कि हम इसे जान ले। क्योंकि तब ही हम यह समझ सकेंगे ।


आइये पहले देखते हैं इस दास्तावेज में क्या लिखा है। सीधा वहीं से -

1.  देश के शहरी प्रदेश की विमुक्ति भले ही अपने संघर्ष के आखिरी चरण में करनी हो, लेकिन शहरों का इस संघर्ष में कितना महत्व है यह हमें शुरू से ही पता है । आंदोलन के लिए नेतृत्व तथा असंख्य कार्यकर्ता यहीं से उपलब्ध होते हैं । ग्रामीण भागों में अपना जनसंघर्ष जारी रखने के लिए और माओवादी संगठनने सरकारी कब्जे से 'मुक्त' किए हुए प्रदेश का व्यवस्थापन करने के लिए यह अत्यावश्यक है कि संगठन का कार्य शहरी विभागों में भी हो। हमारा शत्रुपक्ष शेरॉन में सब से अधिक प्रबल है,  अत: उसके मुक़ाबले में शहरी विभाग में प्रबल संगठन का निर्माण हो यह अनिवार्य है ।

2.  2001 के जनगणना के अनुसार देश की 27% जनता याने लगभग 28 करोड़ लोग शहरों में रहते हैं। 1971 में देश की अर्थव्यवस्था का 56% हिस्सा ग्रामीण भागों से आता था, अब यह केवल 25% रह गया है । शहरी विभागों में 35 केंद्र हैं, और इनका बड़ा हिस्सा दिल्ली, मुंबई, कोलकाता और चेन्नई इन महानगरों के पास है और ये महानगर बाहरी मजदूरों की मेहनत पर खड़े हैं । इन मजदूरों में भाषा,प्रांत और धर्म के आधार पर फूट डालकर राजनीति की जाती है इसलिए यह शोषित वर्ग में एकजूट नहीं पायी जाती ।

3.  काम्रेड माओ कहते हैं - "the final objective of the revolution is the capture of the cities, the enemy’s main bases, and this objective cannot be achieved without adequate work in the cities." (Mao, Selected Works, Vol. II, Pg. 317).  भूमिगत कार्यकर्ताओं का नेटवर्क सक्रिय रखना, संगठन को मजबूत रखना तथा क्रांति के समय की प्रतीक्षा करना;  इस तरह से शहरी विभाग में संगठन का काम होना चाहिए । एक ओर से कानूनी मंचों से काम हो तो दूसरे छोर से गुप्त संगठन खड़ा करना ये दोनों काम शहरी विभागों में करने हैं ।  "Those organisations, which openly propagate Party politics, should generally function secretly. Those organisations functioning openly and legally, generally cannot openly identify with the Party, and should work under some cover with a limited programme." जो भी संस्थान कानूनी ढंग से चलाये जाएंगे उन्हें सीमित कार्यक्रम हाथ लेकर उनके आड़ में अपना काम करना चाहिए। ऐसे संस्थानों को चाहिए कि वे माओवादी संगठनों से अपने सम्बन्धों को उजागर न होने दें । लेकिन जो संस्थान सीधा पक्षकार्य कर रहे हैं उन्हें चाहिए कि वे गुप्त तरीकों से संगठन चलाएं ।

4.  Correctly coordinating between illegal and legal structures,we should have an approach of step by step raising the forms of struggle and preparing the masses to stand up against the might of the state.  इस तरह से कानूनी और गैर कानूनी संगठन - संस्थाओं को एक दूसरे से तालमेल से जनता को सरकार के राक्षसी ताकत के विरोध में लड़ने को तैयार किया जाये ।

5.  शहरों में हमारे शत्रु के हाथ में प्रचंड शक्ति होती है। पुलिस- सेना - शासन के अन्य विभाग तथा क्रांति का दम घोंटने के लिए जो आवश्यक होती  हैं वे सभी दमन की यंत्रणाएँ एकत्रित हैं । उनके उपयोग से श्रमजीवियों के संघर्ष को कुचला जाता है । हमें चाहिए कि जब समय आयेगा तो इसे प्रत्युत्तर देने के लिए हम सक्षम हों इस तरह से हम काम करें ।

6.  शहरी दलों पर महत्व की ज़िम्मेदारी है - Military Tasks .  अर्बन पर्सपेक्टीव इस दस्तावेज़ में कहा गया है कि "While the main military tasks are performed by the PGA and PLA in the countryside, the urban movement too performs tasks complementary to the rural armed struggle. These involve the sending of cadre to the countryside, infiltration of enemy ranks, organising in key industries, sabotage actions in coordination with the rural armed struggle, logistical support, etc..…" हमारे संघर्ष का प्रमुख काम माओवादी सेना गांवों में कर रही है; शहरों में उसके पूरक काम किया जाये । जैसे कि शहरों से गांवों में कार्यकर्ता भेजना, शत्रु के गुट में पैठ बनाना, प्रमुख औद्योगिक क्षेत्रों में संगठन खड़े करना और भीतरघाती काम ये सभी पूरक कामों को शहरों में अंजाम दिया जाये ।

 7.  शहरों में जासूसी सर्वेक्षण करना महत्व का काम है जिसे शहरी नक्सलियों के दल संभालते हैं । he objectives of our intelligence work should be to learn about and study the tactics and plans of the enemy forces in the area, to study the activities of informers, to prevent infiltration into the organisation


8.  यह दस्तावेज़ कहता है - "Infiltration into the Enemy Camp. It is very important to penetrate into the military, para-military forces, police, and higher levels of the administrative machinery of the state. The cities are the strongholds of the enemy and have a large concentration of enemy forces. It is therefore from the cities that attention must be given to this task."  शत्रु की सेना,  अन्य सशस्त्र बल , पुलिस तथा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वर्ग इस ढांचे के सहारे उनकी सत्ता चलायी जाती है । इसलिए यह आवश्यक है कि शहरी दलों को इन संस्थानों में घुसपैठ करनी होगी तथा उनको भीतर से खोखला करने के प्रयास करने होंगे । उनके साथ अपने संबंध बनाने होंगे।

9.  Supplies or contacts for supplies of certain types are only available in the urban areas. Examples of such supplies are arms and ammunitions, spare parts, certain types of medical supplies, etc. Helping the People’s Army to establish the supply lines in this regard is a task that the urban organisation can perform. ग्रामीण विभागों में संघर्ष के लिए अनेक प्रकार का आवश्यक सामान केवल शहरों में ही उपलब्ध होने के कारण उसे खरीदने में शहरी दलों की सहभागिता अनिवार्य है । जैसे कि शस्त्र और उनके पुर्जे, विस्फोटक, दवाइयाँ,  डॉक्टर तथा अन्य संबन्धित सेवाएँ शहरों से ही जुटाये जा सकते हैं । इनके खरीद का ढांचा नक्सलियोंके शहरी दल बनाते हैं और उसपर अमल करने की ज़िम्मेदारी उनके ग्रामीण विभागों को सौंपी जाती है । इसमें उनके सेना के गणवेश भी आते हैं, शहरों से खरीदे जाते हैं । टेक्नोलोजी में नक्सली माहिर होते हैं और अनेक प्रकार के शस्त्र खुद ही बना लेते हैं । इसके लिए लगनेवाले मशीनों के पुर्जे भी शहरों में से बनवाए जाते हैं, और अक्सर उन कारखानों को यह पता भी नहीं होता कि वे जो बना रहे हैं वो किसके क्या काम आयेगा। 

10. Logistical networks should be established in absolute secrecy over a period of time. Separate comrades should be allocated for such work and once they are so allocated they should be released from other work and delinked completely from the mass work. ये सभी कामों में गुप्तता अनिवार्य है । इसलिए यह जरूरी है कि ये काम करनेवाले कार्यकर्ता जनता में घुल मिल कर करनेवाले कामों से दूर रखे जाएँ ।
11 . आंदोलन के सामरिक लक्ष्यों के लिए सायबर युद्ध लड़ने की ज़िम्मेदारी शहरी दलों को सौंपी गयी है । 

११आंदोलन के लष्करी लक्ष्य को पाने के लिये सायबर युद्ध लडने का काम शहरी शाखा ओ को दिया गया है 

दस्तावेज़ में "हिन्दू फासिस्ट" गुटों की चर्चा है और शहरों में उनके विरोध में क्या काम किया जा सकता है इसका भी विवरण है।

जारी......

सूचना - पुस्तक प्रकाशित करने से पहिले मैने एक पुलिस अफसर से यह पूछा था कि क्या यह  दस्तावेज तथ्य पूर्ण  है. लेकिन इसक कोई जबाब मिल नही. इस लिये दस्तावेज सही है या नही इस पर मै टिप्पणी नही कर सकती हू लेकिन इतना जरूर कह सकती हू  कि शहरी इलाखो में माओवादीओ का संघटन इसी रस्ते से चलते हुए किया जा रहा है. इसी आधार पर यह लेख लिखा गया है.


शहरी नक्षल - भाग १


Poet Varavara Rao after his arrest in Hyderabad


Poet Varavara Rao arrested in case relating to conspiracy to assassinate PM Modi - 28th Aug 2018

काल देशभरामधल्या "शहरी नक्षलींना" पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली असून त्यांना समर्थन देणारे अणि विरोध करणारे दोन्ही गट माध्यमांमधून त्याविषयी आपापली मते आग्रहाने मांडताना दिसत आहेत. परंतु त्यामध्ये अनेक तथ्ये गुलदस्तात राहिल्यामुळे हा लेख लिहिण्याचे ठरवले आहे. शहरी नक्षलींवरती जोरदार हल्ला चढवणार्‍यांनाही पोलिसांच्या आणि पर्यायाने ह्या सरकारच्या कृतीचे समर्थन योग्य प्रकारे करता आलीले नाही असे दिसले आहे. शहरी नक्षल म्हणजे "Arm Chair Politicians" - आरामखुर्चीमध्ये बसून अलिप्तपणे राजकारणाची चर्चा करणारे - त्यावरती लिखाण करणारे - भाषणे देणारे विद्वान - देशामधल्या "पददलित जनतेच्या" भांडवलशहांकडून होणार्‍या गळचेपीविरोधात वर्तमानपत्रातून - लेखातून - टीव्हीवरून वा सोशल माध्यमांमधून आवाज उठवणारे - ग्रामीण भागामध्ये शस्त्रे हाती घेऊन लढा देणार्‍या गरीब आदिवासी नक्षली माओवादी सैनिकांची बाजू मांडणारे आणि त्यासाठी हिरिरीने समाजामध्ये त्यांच्यावरील अन्यायाला तोंड फोडणारे बुद्धिवंत म्हणजे शहरी नक्षली अशी प्रतिमा उभी करण्यात आली आहे. वस्तुस्थिती अर्थातच उलटी म्हणजे दुसर्‍या टोकाची आहे. हे माझे लिहिणे तुम्हाला कितीही तर्कविसंगत वाटले तरीही जोवरती आपण खोलात जाऊन ह्याविषयी माहिती करून घेत नाही तोवरती शहरी नक्षलींच्या राक्षसी चेहर्‍याची पुसटशी ओळखही आपल्याला होऊ शकणार नाही हे घ्यानात घ्यावे.

त्याची सुरूवात अर्थातच प्रथम नक्षलींच्या दृष्टीने शहरी प्रदेशाचे काय महत्व आहे ते समजून घेण्यापासून करू. २००१ साली माओवाद्यांच्या पॉलिट ब्यूरोने एक दस्तावेज प्रसिद्ध केला आहे त्याचे नाव आहे "Urban Perspective". ह्या दस्तावेजामध्ये नक्षलींनी आपली भूमिका सविस्तर मांडली असून तिची किमान तोंड ओळख करून घेणे गरजेचे आहे. कारण तसे केले तरच ह्या शहरी नक्षलींच्या अटकेपर्यंत पोलिसांना का जावे लागले त्याचा मागोवा घेता येईल. 

ह्या दस्तावेजामध्ये काय मांडले आहे ते आता प्रथम पाहू. खाली दिलेली विधाने लेखिकेची नसून ती ह्या दस्तावेजामधून घेण्यात आली आहेत. 

१. देशातील शहरी भागाची विमुक्ती आपल्या लढ्याच्या सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये करायची असली तरीही प्रथमपासूनच शहरी विभागाचे लढ्यामधले महत्वाचे स्थान आपण जाणतो. ह्याच विभागामधून चळवळीकरिता नेतृत्व आणि असंख्य कार्यकर्ते मिळत असतात. ग्रामीण भागातील आपले लोकयुद्ध चालू ठेवण्यासाठी आणि माओवादी संघटनेने सरकारी कबजातून "मुक्त" केलेल्या प्रदेशाचे व्यवस्थापन करण्यासाठी शहरी भागामध्ये संघटनेचे काम अत्यावश्यक आहे. शहरी विभागामध्ये "शत्रूपक्ष" सर्वात जास्त प्रबळ आहे.   त्याचा मुकाबला करण्यासाठी शहरी भागामध्ये प्रबळ संघटना बांधणे हा अटळ टप्पा आहे. 

२. २००१ च्या शिरगणती नुसार देशातील २७% जनता म्हणजे सुमारे २८ कोटी लोक शहरामध्ये राहतात. १९५१ मध्ये देशाच्ता उत्पन्नाचा ५६% हिस्सा ग्रामीण विभागाकडे होता तर आता हा हिस्सा केवळ २५% उरला आहे. शहरी विभागामध्येही एकूण ३५ केंद्रे असून त्यातील मोठा हिस्सा दिल्ली मुंबई कलकत्ता आणि चेन्नई ह्या शहरांकडे असून ही केन्द्रे स्थलांतरित मजूरांच्या मेहनतीवरती उभी आहेत. ह्या मजूरांमध्ये भाषिक प्रांतिक वा धार्मिक फूट पाडून राजकारण केले जात असल्यामुळे हा शोषित वर्ग एकवटलेला नाही. 

३. कॉम्रेड माओ म्हणतात की ""the final objective of the revolution is the capture of the cities, the enemy’s main bases, and this objective cannot be achieved without adequate work in the cities." (Mao, Selected Works, Vol. II, Pg. 317). भूमिगत कार्यकर्त्यांचे जाळे सक्रिय ठेवणे - संघटन मजबूत करणे आणि उठावाची वेळ येईपर्यंत वाट पाहणे अशा प्रकारे शहरी भागामध्ये संघटनेचे काम चालले पाहिजे. एका बाजूने कायदेशीर व्यासपीठांद्वारे काम करणे तर दुसर्‍या बाजूला गुप्त संघटन उभारणे ही दोन्ही कामे शहरी भागामध्ये हाती घेतली पाहिजेत. "Those organisations, which openly propagate Party politics, should generally function secretly. Those organisations functioning openly and legally, generally cannot openly identify with the Party, and should work under some cover with a limited programme." ज्या (समांतर) संस्था कायदेशीर रीत्या चालवल्या जातील त्यांनी मर्यादित कार्यक्रम हाती घेऊन त्याच्या पडद्याआड राहून काम करावे. अशा संस्थांनी माओवादी पक्षाशी आपले संबंध उघड होऊ देऊ नयेत. ज्या संस्था थेट पक्षाचे काम करत आहेत त्यांनी मात्र गुप्तरीतीने संघटन चालवावे. 

४. Correctly coordinating between illegal and legal structures,we should have an approach of step by step raising the forms of struggle and preparing the masses to stand up against the might of the state. अशा तर्‍हेने कायदेशीर रीत्या चालणार्‍या आणि बेकायदेशीर संघटनांचे एकमेकांशी मेळ घालून जनतेला शासनाच्या राक्षसी ताकदीविरोधात लढा देण्यासाठी तयार करावे. 

५. शहरांमध्ये शत्रूच्या हाती प्रचंड पोलिस यंत्रणा - सैन्य - शासनाचे अन्य विभाग आणि क्रांतीचा आवाज दडपण्यासाठी आवश्यक असलेले इतर दमनशाहीच्या यंत्रणा एकवटलेल्या आहेत. त्यांचा वापर करून श्रमिकांचा लढा चिरडण्यात येतो. ह्याला वेळ ये ईल तेव्हा प्रत्युत्तर देता यावे अशा तर्‍हेने शहरामध्ये काम उभारले पाहिजे. 

६. शहरी तुकड्यांवरती टाकण्यात आलेली महत्वाची जबाबदारी म्हणजे - Military Tasks. अर्बन परस्पेक्टीव्ह ह्या दस्तावेजामध्ये म्हटले आहे की "While the main military tasks are performed by the PGA and PLA in the countryside, the urban movement too performs tasks complementary to the rural armed struggle. These involve the sending of cadre to the countryside, infiltration of enemy ranks, organising in key industries, sabotage actions in coordination with the rural armed struggle, logistical support, etc....." लढ्यामधले मुख्य काम माओवादी सैन्य ग्रामीण विभागामध्ये करत असून शहरामधून त्याला पूरक असे काम केले गेले पाहिजे. उदा. शहरातून ग्रामीण विभागाकडे कार्यकर्ते पाठवणे - शत्रूच्या गोटामध्ये घुसखोरी करून प्रवेश मिळवणे - प्रमुख औद्योगिक क्षेत्रामध्ये संघटन उभारणे आणि घातपाती कारवाया ही पूरक कामे शहरामधून व्हायला हवीत. 

७. शहरी भागामधील टेहळणीचे महत्वाचे काम शहरी नक्षल तुकड्या करत असतात. The objectives of our intelligence work should be to learn about and study the tactics and plans of the enemy forces in the area, to study the activities of informers, to prevent infiltration into the organisation

८. दस्तावेज म्हणतो की "Infiltration into the Enemy Camp. It is very important to penetrate into the military, para-military forces, police, and higher levels of the administrative machinery of the state. The cities are the strongholds of the enemy and have a large concentration of enemy forces. It is therefore from the cities that attention must be given to this task." शत्रूचे सैन्य निमलष्करी दले पोलिस दल वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वर्ग ह्या यंत्रणेवरती त्यांचे राज्य शहरामधून चालवले जाते. म्हणून शहरी तुकड्यांना ह्या संस्थांमध्ये घुसखोरी करून त्या पोखरून आपले लागेबांधे तयार करण्याचे काम करावे लागेल. 

९. Supplies or contacts for supplies of certain types are only available in the urban areas. Examples of such supplies are arms and ammunitions, spare parts, certain types of medical supplies, etc. Helping the People’s Army to establish the supply lines in this regard is a task that the urban organisation can perform. ग्रामीण भागामध्ये उभारण्यात आलेल्या लढ्यासाठी आवश्यक असलेली अनेक प्रकारची सामग्री केवळ शहरांमध्येच उपलब्ध असल्यामुळे अशा सामग्रीच्या खरेदी व्यवहारामध्ये शहरी तुकड्यांचा सहभाग अटळ आहे. उदा. शस्त्रास्त्रे व त्यांचे सुटे भाग - स्फोटके - औषधे - वैद्यकीय सेवा - डॉक्टर्स आदि सामग्री शहरामधून खरेदी करावी लागते. तिच्या खरेदीव्यवहाराचा ढाचा शहरी विभागाने बनवून प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रामीण विभागाकडे सोपवण्याची पद्धती नक्षली वापरतात. (ह्यामध्ये त्यांचे सैन्य वापरत असलेले युनिफॉर्म्स सुद्ध शहरी भागामधून खरेदी केले जातात. नक्षली तंत्रज्ञानामध्ये पारंगत असून अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे स्वतः बनवतात. त्यासाठी लागणार्‍या मशिन्सचे सुटे भाग शहरामधून बनवून घेतले जातात. अनेकदा अशा कारखान्याला माहितीसुद्ध नसते आपण नेमके कोणासाठी काय बनवत आहोत.

१०. Logistical networks should be established in absolute secrecy over a period of time. Separate comrades should be allocated for such work and once they are so allocated they should be released from other work and delinked completely from the mass work. अशा तर्‍हेने ग्रामीण संघटनेला आवश्यक मालाच्या उपलब्धतेसाठी होणारे काम गुप्त रीतीने करणे गरजेचे असते. म्हणून ज्या कार्यकर्त्यांवरती हे काम सोपवले जाईल त्यांना जनतेमध्ये मिसळून करण्याच्या कामापासून दूर ठेवले जावे.

११. चळवळीच्या लष्करी उद्दिष्टांसाठी सायबर युद्ध लढण्याचे काम शहरी तुकड्यांवर सोपवण्यात आले आहे.

दस्तावेजामध्ये "हिंदू फॅसिस्ट" गटांची चर्चा असून शहरामध्ये त्यांच्याविरोधात काय काम करता येईल ह्याचे विवरण आहे. 


आता दुसर्‍या भागामध्ये शहरी नक्षल नेमके काय काम करताना आढळतात ह्याची माहिती घेऊ.

तळटीप - STIR & Urban Perspectiveहे दस्तावेज इंटरनेट वरती उपलब्ध आहेत. त्यांच्या वैधतेविषयी मी एका पोलीस अधिकाऱ्याकडे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी माहिती विचारली होती. परंतु त्यावरती कोणतेच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे हे दस्तावेज वैध आहेत की नाही ह्यावर मी काही भाष्य करू शकत नाही. परंतु शहरी भागामध्ये माओवाद्यांनी संघटन उभारली आहे त्याची तत्वे तंतोतंतय दस्तावेजांमध्ये दिसत असल्यामुळे त्याच्या आधाराने हा लेख लिहिला आहे. 

Tuesday 21 August 2018

दिल जित कर आओ - अटलजी


Image result for cricket pakistan 2004 atal


सप्टेंबर २००१ नंतर अमेरिकेच्या अफगाणिस्तान मोहिमेमध्ये काहीशा अनिच्छेने पाकिस्तानला सामील व्हावे लागले होते. त्यांनीच जन्माला घातलेल्या दहशत वाद्यांचा पाडाव आता त्यांनाच करायचा होत. १९७९ मध्ये अफगाणिस्तान मधील जिहाद सुरु झाला तेव्हा सोयीचे म्हणून पाकिस्तान सरकारनेच पद्धतशीर पणे प्रचार करून जनतेला जिहादच्या मानसिकतेमध्ये लोटले होते. आता त्याच मुजाहिदीन विरोधात आपलेच सरकार कारवाई करते दिसले तर जनता बिथरली असती. म्हणून ह्या कारवाया होत असताना आपण अमेरिकेला शरण गेलो नाही हे जनतेला दाखवून देण्यासाठी पाकिस्तान भारतावर हल्ले करत होते. त्यामधूनच संसदेवरील हल्ल्यासारखे प्रसंग ओढवले होते. ह्या हल्ल्यांनंतर भारतामधले वातावरणही तापलेले होते. केंद्रात असलेले वाजपेयींचे सरकार कठोर पावले उचलणार अशी भारतीय जनतेची अपेक्षा होती. 

पण सरकारने मात्र या अगोदर बंद ठेवण्यात आलेल्या क्रिकेट मॅचेस सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय अवघड होता. क्रिकेटर्स सुद्धा घाबरलेलेच होते. पाकिस्तानात जाऊन मॅच खेळणे असेही अवघड असते. तिथला जमाव त्याकडे खेळासारखे बघत नाही तर युद्धभूमीवर भारताला हरवायची खुमखुमी क्रिकेटच्या मैदानात पूर्ण करण्याची मनीषा बाळगून वेळ आली तर आपल्या संघातील खेळाडूंना मारपीट करण्याच्या मानसिकतेमध्ये असतो. मग एरव्ही देखील जिथे असे वातावरण असते तिथे सप्टेंबर ११ नंतर काय वातावरण असेल याची कल्पना आपण करू शकतो. म्हणूनच हा निर्णय घेणे अवघड होते पण सर्व तयारीनिशी सरकारने त्याला संमती दिली होती.

पाकिस्तान मध्ये रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ पंतप्रधानांच्या भेटीला गेला. सर्वाना शुभेच्छा देत वाजपेयींनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली - केवळ सामना जिंकू नका - "पाकिस्तान में दिल जीत कर आओ" असा अलौकिक संदेश देऊन वाजपेयींनी भारतीय संघाला तिथे पाठवले. 

हे जे "दिल जित कर आओ" चे सूत्र आहे ना ते त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे मूळ सूत्र असावे. म्हणूनच तीन चार महिने रुसवा धरलेल्या अडवाणींना जवळ करायचे तर त्यांनी एक दिवस थेट त्यांच्या पत्नीला फोन करून सांगितले आज दुपारी जेवायला मी तुमच्या घरी येत आहे. वाजपेयी जेवायला येणार म्हटल्यावर अडवाणींना देखील घरी यावे लागले आणि बोलाचाल झाली. 

त्यांच्या वेळचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री ब्रजेश मिश्रा एकदा म्हणाले - कोणाशी संघर्षाची वेळ आलीच तर ते त्या व्यक्तीला बोलावून घेत आणि चाल काय बरे आहे तुझे म्हणणे असे म्हणून त्याला बोलते करत. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. राजदीप सरदेसाई ह्यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये तर त्यांच्या स्वभावाचे किती पैलू दिसतात त्यावर स्वतंत्र लेखच होऊ शकेल. 

वाजपेयींच्या मतदार संघामध्ये चाळीस रुपयाच्या साडीकरिता महिलांची झुंबड उडावी आणि तिथे एक दुर्घटना घडावी ही घटना खेदजनक होती. ह्यावरती चिमटा घेणारा प्रश्न राजदीपने केला असता ही चूक वाजपेयी किती निर्मळ मनाने कबूल करतात हे पाहून आपण थक्क होतो. एकीकडे हे दृश्य असताना इंडिया शायनिंग म्हणणे बरोबर आहे का असा दुसरा टोकदार प्रश्न येताच वाजपेयी म्हणाले भारतामध्ये दोन टोकाच्या स्थितीमधले लोक जगात आहेत. एक घटक येणारे चांगले दिवस पाहू शकत आहे तर दुसऱ्या समाज घटकाला ते दिवस जवळ आल्याचे जाणवत नाही हे उत्तरही असेच थक्क करणारे आहे. 

एकीकडे विरोधक इंडिया शायनिंग वरती बेछूट आरोप करत होते पण ते पूर्णपणे असत्य नाही ते फार तर एक अर्धसत्य आहे हे सुनावण्याची संधीही त्यांनी घेतली. तुम्ही तीन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतलीत आणि चौथ्यांदाही घ्याल - हे तर नेहरूंनाही जमले नव्हते अशी मखलाशी करणाऱ्या राजदीपला तीन वेळा शपथविधीच्या दाखल्यामधला फोलपणा ते कसे दाखवतात बघण्यासारखे आहे. तीन वेळा शपथ घेतली पण तीन वेळा मला काही पाच वर्षांचा कालावधी मिळाला नाही असे सुनावत उगाच स्तुती करणाऱ्या (हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या) राजदीपला ते थांबवतात कसे हेही विशेष आहे. 

एका बाजूला अणुस्फोटाचा कठोर निर्णय घेणारे वाजपेयी पाकिस्तानमध्ये "दिल जीत कर आओ" असे का म्हणाले असतील बरे? पाकिस्तानने अणुयुद्धही लादलेच  तर त्याचा सामना करण्याची मानसिक तयारी त्यांनी ठेवली होती पण लाहोर बस असो कि क्रिकेट डिप्लोमसी आपण समझौत्याचे प्रयत्न केले नाहीत असे काही दृश्य त्यांनी उभे होऊ दिले नाही. देशामध्ये पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार पाच वर्षे कालावधी पूर्ण करणार होते. हेही सरकार बोलणी करायला तयार असल्याचे दृश्य जगासमोर तर उभे राहिलेच पण पाकिस्तानी जनतेसमोर सुद्धा.

वाजपेयींच्या ह्या वागण्याचा जो सूक्ष्म परिणाम तेथील  लोकांवर झाला आहे. त्याचा फायदा आजच्या सरकारलाही मिळत आहे. शरीफ ह्यांनी निवडणूक भारताशी संबंध सुधारण्याची घोषणा करत का जिंकली  ह्याचे उत्तर वाजपेयींच्या ह्या वर्तनामध्ये दिसते. भले तेथील लष्कर भारताशी आडमुठे धोरण राबवून सतत रक्तबंबाळ करण्याचे तंत्र अवलंबत असले तरीही जनतेचा भ्रमनिरास होत चालला आहे. जेव्हा केव्हा लष्कर विरूद्ध जनता असा संघर्ष उभा राहील तेव्हा "दिल जित कर आओ" संदेशाची किंमत काय होती ते आपल्याला कळू शकेल.

समाजाला रुचेल असे बोलणारे नेते असतात पण त्याला न दुखावता हळूहळू आपल्या विचाराशी जोडून घेणे ही कला असते. ह्याबाबत मला काही उदाहरणे द्यायची आहेत. २००२ च्या दंगलींनंतर मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भाजप मधला एक गट फारच उत्सुक होता. गोवा अधिवेशनामध्ये ह्याचा सोक्ष मोक्ष लावला गेला पाहिजे असे काही जण धरून बसले होते. पंत प्रधान गोव्याला निघाले तेव्हा त्यांच्या विमानामध्ये त्यांच्या सोबत काही केंद्रीय मंत्री देखील होते. मोदी प्रश्नाबाबत वाजपेयींना त्यांनी गळ घातली. त्यांच्या मनात काय आहे जाणून घ्यायचा प्रयत्न चालला होता. अधिवेशनामध्ये पोचले तेव्हा मोदी जाणार म्हणून ह्या मंत्री गणाची अगदी खात्री पटलेली होती. अधिवेशनामध्ये मोदी जरा उशिरा पोचले. त्यांनी सभागृहामध्ये प्रवेश केला आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला. सभागृह दणाणून गेले. मोदींचे हे स्वागत पाहताच वाजपेयींनी त्यांच्या हाकल पट्टीचा प्रश्न उपस्थित होऊ दिलाच नाही. म्हटले तर आपल्याला जे पाहिजे ते त्यांना कार्यकर्त्यांच्या गळी उतरवणे कठीण होते काय? अजिबात नाही. म्हटलेच तर तसे झालेही असते. पण त्यांनी मन आवरले. आपला मुद्दा पुढे रेटला नाही. आणि कार्यकर्त्याच्या इच्छेपुढे मान तुकवली. जनमनाचा असा ठावा असलेले नेते क्वचित बघायला मिळतात. 


ह्याच प्रश्नावरती निर्णय घेण्यापूर्वी श्री बाळासाहेब ठाकऱ्यांचे मत काय आहे ह्याचीही चाचपणी झाली होती. मोदी गया तो गुजरात गया अशी जगजाहीर टिप्पणी बाळासाहेब ह्यांनी तेव्हा केली होती. वाजपेयींसारख्या जनमताचा पडसाद अचूक ऐकणाऱ्या आणि पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीला आपल्या पक्षाबाहेरील बाळासाहेबांचे मन ह्या विषयावरती जाणून घेण्याची खरे तर काय बरे गरज होती? १९९६ च्या निवडणुकीपूर्वी "हिंदू मन आज प्रक्षुब्ध है" असे जाहीर मुलाखतीमध्ये सांगणाऱ्या वाजपेयींना जनता काय विचार करते हे नक्की कळत होते. पण तरीही बाळासाहेबांचे ह्यावरचे मत जाणून घेण्याची ऋजुता त्यांनी दाखवली. ह्यामध्ये यांनी दोन गोष्टी साध्य केल्या. वाजपेयींच्या अनेक निर्णयांवर अगदी परराष्ट्र धोरणावरही बाळासाहेब जाहीर टीका करत. त्याचा त्यांनी कधी राग मानला नाही. कारण बाळासाहेबांना सुद्धा हिंदू जनमताची नाडी कळते ह्याचे त्यांना भान होते. आपण जे करत आहोत ते जनतेला चटकन रुचणारे नाही तेव्हा तिचा राग कोंडून त्याची संहारक वाफ होण्यापेक्षा बाळासाहेबांच्या टीकेमधून आपल्या मतांचीही कदर कुठे तरी होते आहे असे जनतेला वाटू देण्याचे आणि जनतेच्या रोषाला वाट मोकळी करून देण्याची संधी न अडवण्याचे त्यांचे कसब त्यांची राजकीय परिपक्वता दाखवते. मोदींच्या बाबतही भाजपने मोदींना पदावरून दूर केले आणि बाळासाहेबांनी त्यावर टीका केली तर जनमताचे काय होईल ह्याचा सूक्ष्म विचार ते करत असावेत. मी आयुष्यभर काय जपले असेल तर माझी  विश्वासार्हता असे ते म्हणत. तेव्हा कोणत्याही कसोटीच्या क्षणी ती विश्वासार्हता भाजपमधल्या कार्यकर्त्यांची असो व संपूर्ण जनतेची असो आपण गमावून बसणार नाही ह्याची काळजी घ्यावी असे त्यांना वाटत होते हे विशेष. 

क्रिकेटच्या विश्वामध्ये आज देखील भारतीय जनता सुनील गावस्कराला विसरू शकलेली नाही. संपूर्ण संघाला विजयाप्रत नेण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. गावस्कर बाद झाला तर संघ आपले अवसान हरवून बसत असे. म्हणून गावस्करने आपल्या बॅट ला खिळे ठोकून ती जड केली होती असे सांगितले जाते. जेणेकरून फटकेबाजीचा मोह टाळण्याचा आणि सहजी विकेट जाऊ न देण्याचा तो एक प्रयत्न होता असे म्हणतात. गावस्कर प्रमाणेच अटलजींनाही आयुष्यभरच आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये आपल्या सोबत पक्षाचे काय होईल ह्याचा आधी विचार करण्याची सवयच लागली होती असे दिसते. त्या हितासाठी आपल्या मनाला मुरड ते आनंदाने घालत होते. समाजमनाची बूज अशी राखण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते - समाज घडवण्याची आणि जनमत उभारण्याची समाजाला आपल्या विचाराकडे हळूहळू बदलत नेण्याची आपली जबाबदारी त्यांनी प्रामाणिक पणे स्वीकारली होती म्हणून "काल के कपाल पर लिखता मिटाता  हूँ " असे ते सहजपणे लिहू शकले. 

समुद्राच्या किनाऱ्यावर उभे राहून त्याच्या लाटांचा खेळ बघताना महासागराच्या गतिविधींमुळे कधी कधी चकित व्हायला होते. त्याच्या अक्राळ विक्राळ लाटा जसजशा किनाऱ्यावर आपटत राहतात तसतसा किनाऱ्यावरचा खडक भंग पावत राहतो आणि हळूहळू त्याची वाळू होत जाते. पण ह्याच्या अगदी उलटी क्रिया सुद्धा महासागर त्याच वेळी घडवत असतो. त्याच्या पाण्याच्या दाबाने खालच्या मातीवर दाब पडून नवे खडक बनत असतात. किनाऱ्यावरचा खडक फुटून त्याची वाळू बनायला जसा कित्येक वर्षांचा अवधी जातो तसेच नवे खडक बनण्याची प्रक्रिया देखील हळूहळू घडत असते. एका बाजूला किनाऱ्यावरील खडकाची वाळू करणारा महासागर दुसऱ्या बाजूला नवे खडक जन्माला घालत असतो. महापुरुषांच्या जीवनकथेचेही हेच सार असते. 

वाजपेयींसारखा नेता त्या महासागरासारखा समाजमनावरती घण घालत असतो. एकाच वेळी किनाऱ्यावरील खडकाची वाळू करतो तर आतल्या मातीचे खडक बनवतो. राजकय प्रक्रियादेखील अशीच असावी लागते. संघर्षाच्या कामासोबत विधायक काम देखील बरोबरीने व्हावे लागते. तेव्हा माणसे संतत्वाला पोचतात.  "दिल जित कर आओ" हे त्यांचे सूत्र एकेकाळी साध्य होते ते केव्हा साधन बनून गेले ते कोणालाच कळलेही  नाही 

Wednesday 15 August 2018

माओवाद भाग ७ - बंगालचे सत्य



REACHING OUT: Mamata Banerjee and Swami Agnivesh at a rally in Lalgarh on Monday


"If we do not have 100% guarantee of victory, we should not  fight a battle for it is not worthwhile to kill 1000 of the enemy and loose 800 of ours." Mao Zhe Dong


पूर्वाश्रमीचे बंगाली नक्षल नेते चळवळीचे उद्गाते म्हणून आणि तिची विचारधारा ठरवणारे दिशा देणारे म्हणून ओळखले जातात. माओवाद्यांच्या आजच्या चळवळीच्या दृष्टीनेदेखील प. बंगालला अनन्यसाधारण पण वेगळे महत्व आहे. ईशान्येकडील राज्ये आणि इथल्या सशस्त्र आणि विघटनवादी शक्तींना जोडणारा आणि स्फोटके व शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्याचा राजरस्ता म्हणजे प. बंगाल अशी त्याची ओळख आहे. हलीहल्ली पर्यंत माओवाद्यांच्या ३० जणांपैकी सात पूर्ण वेळ केंद्रीय समितीचे सभासद प. बंगालचे आहेत. एका बाजूला दुतोंडी आणि मूर्ख राजकारणी आणि दुसर्‍या बाजूला धूर्त माओवादी अशी ही लढाई आहे. हे मूर्ख राजकारणी दुसर्याच्या अनुभवातून शिकणे झिडकारतात आणि परत परत नव्याने आगीमध्ये हात टाकून भाजून घेताना दिसतात. पण याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे माओवादी जेव्हा राजकारण्यांशी हातमिळवणी करतात तेव्हा परिस्थिती कशी फिरते आणि देशाच्या हिताच्या विरोधात जाते हे पाहायचे असेल तर प. बंगालचा आजचा इतिहास नजरेआड करता येत नाही.

सुरुवातीला सीपीएम सरकारनेही माओवाद्यांविरोधात मवाळ धोरण अवलंबले होते. पोलिसांना न पाठवता आपल्या पक्षाच्या कार्यकर्तांना त्यांच्या कडे पाठवण्याचा प्रयत्न झाला. पण पीसीपीए त्यांना पुरून उरली. रोजच्या रोज निर्घृण खून, रोजच्या रोज प्रेतांचे प्रदर्शन, योजनाबद्ध रीतीने विरोधकांना धमक्या देणे अथवा त्यांना जीवे मारणे, मार्क्सिस्ट नेत्यांची घरे पाडणे, त्यांची कार्यालये उद्ध्वस्त करणे, काही ना काही बेकायदेशीर कृत्य करून त्यातून आपण सहज तरतो हे दाखवून देणे या गोष्टी खास करून माध्यमांच्या नजरेसमोर करून दाखवण्याचा बेधडक उद्योग पीसीपीए करत होती. अशा परिस्थितीमध्ये माओवाद्यांनी लालगडमध्ये विजय मिळवला असे म्हणण्यापेक्षा राजकारण्यांनी  लालगडच्या जनतेला वार्‍यावर सोडले हेच खरे. प. बंगालमध्ये माओवाद्यांना हाताशी धरून राजकारण करणार्‍यात आजच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांचा उल्लेख टाळता येत नाही. सिंगूर, नंदीग्राम आणि लालगड येथील आंदोलन खरे तर छेडले ममताजींनी. या आंदोलनाची पुरेपूर माहिती माध्यमांमधून आल्यामुळे त्याचे सविस्तर वर्णन येथे देत नाही. लालगड नजिकच्या सालबोनी येथे उभारला जाणारा ३५००० कोटी रुपयांचा जिंदाल स्टील प्रकल्प देखील असाच वादग्रस्त ठरला होता. सालबोनी येथे सरकारी ताब्यातील ४५०० एकर जमीन (एके काळी हीच जमीन सरकारने आदिवासी जनतेला देउ असे जाहीर केले होते असे आंदोलक सांगतात.) जिंदाल स्टील यांना द्‍यायचे ठरले होते. शिवाय कंपनीने आणखी ५०० एकर जमीन खाजगी मालकांकडून घेतली होती. ह्या ठिकाणच्या स्थानिक जनतेचे प्रश्न घेउन तृणमूल कॉंग्रेस उभी होती. पहिल्यापासूनच ममताजी खाजगीकरणाविरुद्ध भूमिका घेत आल्या आहेत. प. बंगालचे तत्कालीन सरकार तर कम्युनिस्ट. पण तरीही भांडवल राज्यात यावे म्हणून मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य प्रयत्न करत होते. नवे उद्योग राज्यात यावेत याला एकवेळ विरोध झाला नसता पण ज्यांची जमीन जाते त्यांना त्याप्रमाणात मोबदला मिळाला असे जोवर वाटत नाही तोवर असंतोषाची बीजे रुजणे रुजवणे सोपे असते. त्यातून एकूण सहा वेळा सत्तारूढ झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्टांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी ममताजी उत्सुक होत्या. त्यासाठी त्यांनी कधी बीजेपी बरोबर जाउन पाहिले तर नंतर कधी कॉंग्रेसबरोबर जाउन. २००८ नंतर मात्र ममताजी प. बंगालमध्ये धोकादायक राजकीय हालचाली करताना दिसू लागल्या.

ज्या उद्योग धंद्यांच्या विरोधात ममताजींना लढायचे होते त्यांच्या विरोधात लढण्याचा - एसईझेडला विरोध करण्याचा आणि विस्थापितांचे प्रश्न घेउन लढण्याचा ठाम निर्णय २००७ साली माओवाद्यांच्या नवव्या कॉंग्रेसमध्ये झाला होता. यासंदर्भात जे अनेक गट काम करत होते त्यामध्येच भूमी उच्छेद प्रतिरोध समितीही होती तसेच भारत जकात माझी मारवा संस्थाही होती. सप्टेंबर २००८ मध्ये सरकारकडे आलेल्या गुप्तखात्याच्या अहवालानुसार सिंगूर परिसरात माओवादी नेते संचार करत असून टाटा कंपनीच्या नॅनो गाडीच्या कारखान्याविरुद्ध हिंसक आंदोलन छेडण्याच्या तयारीत ही मंडळी आहेत तसेच सामाजिक कार्यकर्त्याची वरपांगी भूमिका घेउन ते काम करत आहेत अशी स्पष्ट सूचना मिळाली होती.  प. मिदनापूर, बांकुरा, पुरुलिया आदि भागामध्ये सुमारे १०० माओवादी कार्यकर्ते घुसले आहेत शिवाय जादवपूर युनिव्हर्सिटीचे काही विद्यार्थी देखील त्यांच्यासोबत काम करत आहेत अशी बातमी होती. सुरुवातीला या संघटनांनी लालगडमध्ये बहिष्काराचे अस्त्र उगारले होते. पुढे २ नोव्हेंबर २००८ रोजी मुख्यमंत्री बुद्धदेव आणि केंद्रीय पोलाद मंत्री राम विलास पास्वान सालबोनी येथील जिंदाल स्टील कारखान्याच्या पायभरणी समारंभ संपवून परत येत असताना कलाईचंडी येथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ल चढवण्यात आला. त्यातून ते नशीबानेच दोघेही वाचले. अशा तर्‍हेने ममताजींचे आंदोलन माओवाद्यांच्या हाती गेले होते. त्यासाठी मूळच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरच हल्ले चढवून ते त्यांना पळवून लावत. अशाच घटनांमधून पीसीपीए (पीपल्स कमिटी अगेन्स्ट पोलिस अट्रॉसिटीज ) या संघटनेची सुरुवात झाली. त्याचे नेतृत्व छ्त्रधर महातो या तरूणाकडे होते. (हा शशधर महातो या माओवादी नेत्याचा भाउ - शशधरने सालबोनी सकट अनेक हल्ल्यामध्ये भाग घेतला होता व तो पुढे २०११ मध्ये पोलिस कारवाईत ठार झाला. त्याची पत्नी सुचित्रा महातो देखील माओवादी चळवळीशी निगडित होती.) महत्वाची गोष्ट ही की छ्त्रधर हा त्या काळी तृणमूलचा कार्यकर्ता होता असे सांगितले जाते. तृणमूल मात्र या बाबीचा इन्कार करते. नोव्हेंबर २००८ मध्ये तत्कालीन सीपीएम सरकारने पीचीपीएच्या मागणीवरून १३ चौक्यांमधून पोलिस दल काढून घेतले. यानंतर पीसीपीएने त्या विभागामध्ये समांतर सरकार स्थापन करून बेलपहारी, बिनपूर, लालगड, जांबोनी, सालबोनी आणि गोलतोर गावमध्ये पोलिस दल अथवा अन्य सशस्त्र दले येणार नाहीत अशी व्यवस्था केली. यानंतर सरकारने पोलिस अत्याचाराच्या घटनांची चौकशी करायचे अश्वासन दिले. या सुमाराला बीजेएमएम व आणखी एका आदिवासी संघटनेच्या सुधीर मंडल नेत्याने बेलपहारीच्या भुलाभेडा विभागामध्ये सुमारे १०००० आदिवासींची सभा घेउन माओवाद्यांच्या हिंसक कृत्यांचा निषेध केला. यानंतर दोनच दिवसात मिदनापूरच्या जोरदंगा मध्ये सुधीरचा खून करण्यात आला. खुनानंतर पीसीपीएच्या विरोधात उभे राहण्याची आदिवासींची हिंमत संपुष्टात आली.

छत्रधरने  मूळच्या मागण्या बाजूला ठेवून अशा मागण्या पुढे केल्या की कोणत्याही सरकारला त्या मान्य करणे कठिण व्हावे. गेल्या दहा वर्षात अटक केलेल्या सर्व आदिवासींची तुरुंगातून सुटका, विभागातील सर्व पोलिस तुकड्या मागे घेणे, प. मिदनापूरच्या पोलिस सुपरिंटेंडेंटने छत्रधरची माफी मागावी आणि पोलिसांनी लालगड ते छोटोपलिआ गावापर्यंत रांगत जावे अशा ह्या मागण्या होत्या. २००९ मध्ये माओवादी नेता किशनजी याने दिलेल्या मुलाखतीनुसार २००० साली भाजप - तृणमूल आघाडीविरोधात लढण्यासाठी आपल्याला सीपीएमने शस्त्रे पुरवली तर मार्च २००७ मध्ये नंदीग्रामच्या लढ्यासाठी तृणमूलने आपल्याला शस्त्रे पुरवली असे म्हटले होते. आपापल्या राजकीय स्वार्थासाठी राजकीय पक्ष कशी हातमिळवणी करतील हे सांगणे अवघड झाले आहे. या काळामध्ये माओवाद्यांनी स्थानिक जनतेच्या मनात पोलिसांविरुद्ध विष ओतायचे काम तर केलेच पण सीपीएमच्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ठार मारायच्या कारवायाही केल्या.

ऑगस्ट २००९ मध्ये लालगडमध्ये माओवादी शिबिरे घेउन वैद्यकीय सुविधा देत होते - शाळा चालवत होते - पिण्याच्या पाण्याची सोय लावत होते आणि सामाजिक कार्य करत होते. अशा तर्‍हेने त्यांनी स्वतःचा जम बसवला होता. याच सुमारास लालगडजवळ घातलेल्या छाप्यामध्ये पोलिसांच्या हाती महत्वाची माओवादी कागदपत्रे लागली. त्यानुसार नादिया, बरद्वान, मुर्शिदाबाद, हुगळी आणि बिरभूम या जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांनी पक्षसंघटना उभारली होती. तेथे गावकर्‍यांना खास प्रशिक्षण दिले जात होते. २०११च्या निवडणुकांपूर्वी कोलकतामध्ये सशस्त्र लढा छेडला जाईल असे किशनजी उघडपणे सांगू लागले. अखेर सप्टेंबर २००९ मध्ये पोलिसांनी छत्रधरला अटक केली. माओवाद्यांच्या हिंसक आंदोलनाला काही बुद्धीवंत मनःपूर्वक पाठिंबा देत होते. (त्यातीलच कोलकता मध्ये एनजीओ (लालगड संहती मंच) मध्ये काम करणार्‍या दोन बुद्धीवंत राजा सरखेल आणि प्रसून चॅटर्जी ह्यांना पोलिसांनी ऑक्टोबर २००९ मध्ये अटक केली होती.) ममता आणि माओवादी यांच्यामध्ये सहकार्याचे एक पर्व एव्हाना सुरु झाले होते. ४ ऑक्टोबर २००९ रोजी किशनजी यांनी ममताजी या आमच्या पसंतीच्या मुख्यमंत्री असतील असे जाहीर केल्याचे वृत्त आनंदबझार पत्रिका या वर्तमानपत्राने छापले. सीपीमचा पाडाव हाच आपला कार्यक्रम असल्याचे माओवादी सांगत होते. (अशाच तर्‍हेने त्यांनी २००४ मध्ये आंध्रच्या राजकारनामध्ये तेलुगु देसम पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यावर तेलुगु देसम निवडणूक हरला होता.) ममताजींनी डिसेंबर २००९ मध्ये किशनजी या माओवादी नेत्याने गोरखालॅंडच्या धर्तीवर बांकुरा, पुरुलिया आणि प. मिदनापूर या जिल्ह्यांनाही स्वायत्तता द्या अशी मागणी केली. केंद्रामध्ये मंत्रीपदी बसलेल्या ममताजींशी "सहकार्य" करायची भूमिका घेणार्‍या किशनजींनी या तीन जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जे माफ केल्याचा "आदेश" काढला. केंद्रातील युपीए सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा या अटीवर माओवाद्यांनी त्यांना प. बंगालमध्ये पाठिंबा द्यायचे ठरवल्याच्या बातम्या येत होत्या. किशनजींच्या सहाय्याला मणिपूरमधील ५० कडवे कार्यकर्ते मिदनापूरमध्ये दाखल झाल्याची बातमी गुप्तखात्याकडे होती. मणिपूरचे कार्यकर्ते राजकीय पक्षांच्या सहाय्यानेच तेथेपर्यंत पोहोचल्याचे म्हटले जात होते. समुद्रमार्गाने शस्त्रास्त्रांची तसकरी करण्याचे प्रयत्न चालू होते. श्रीलंकेमध्ये पराभूत झालेल्या एलटीटीईच्या कार्यकर्त्यांना माओवादी नेते बंगालच्या किनार्‍याच्या आश्रयाने मदत करत होते. (किशनजींच्या जोडीने नारायण हा वरिष्ठ माओवादी नेता हालदीया - मिदनापूर मध्ये सक्रिय होता व त्याने नंदीग्राम येथे देखील महत्वाची भूमिका निभावली होती असे वृत्त होते.) या काळात किशनजींच्या हालचाली पोलिसांच्या नजरेतून लपल्या होत्या असे नाही पण त्यांच्या अटकेला राजकीय नेतृत्वाने परवानगी दिली नसावी. ऑक्टोबर २००९ मध्ये किशनजींनी ममताजी याच आमच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील असे जाहीर केले. माओवाद्यांशी हातमिळवणी करण्याचे काय परिणाम होतील हे काही लपवण्यासारखे नव्हते. उदा. पंचायत निवडणुकांमध्ये माओवाद्यांच्या खांद्यालाखांदा लावून लढलेल्या तॄणमूलच्या पंचायत अध्यक्ष निशिकांत मोंडल याला माओवाद्यांनी ठार मारले. निवडणूक संपताच निशिकांत माओवाद्यांपासून अंतर राखून होता. पुढे मागे माओवाद्यांच्या पाठिंब्यावर ममताजी राज्यावर आरूढ झाल्याच तर काय हो उ शकते याची ही झलक होती.
 
सतत सहा वेळा राज्यातील सत्तेवर आरूढ असलेल्या सीपीएमविरुद्ध राज्यात असंतोषाचे वातावरण होते. त्यांच्याविरोधात ठामपणे उभ्या राहिलेल्या ममताजींच्या मागे जनतेची सहानुभूती होती. अशा ममताजी आपल्या मागे उभ्या आहेत या जाणीवेने व त्यांच्या राजकीय प्रभावामुळे माओवाद्यांचा आत्मविश्वास भलताच वाढला होता. "बांकुरा, पुरुलिया आणि जंगल महालमध्ये माओवादी नाहीत. या भागामधील अशांततेचे जनक सीपीएमचे कार्यकर्तेच आहेत. ते दिवसाउजेडी सीपीएमचे कार्यकर्ते म्हणून मिरवतात आणि रात्र पडली की तेच माओवादी म्हणून वावरतात" असे स्फोटक विधान ममताजी करत होत्या. याच दरम्यान म्हणजे २० ऑक्टोबर २००९ रोजी संकरेल पोलिस स्टेशनवर माओवाद्यांनी एक भीषण हल्ला चढवला. हल्ला करण्यासाठी माओवादी दोन वेगवेगळ्या गटातून मोटरसायकल घेउन आले होते. त्यात दोन पोलिसांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. स्टेशनचे प्रमुख पोलिस अधिकारी अतींद्रनाथ दत्त तसेच दुसरे अधिकारी स्वपन रॉय यांना माओवाद्यांनी अपहृत केले. जवळच्या स्टेट बॅंकेच्या शाखेवर डल्ला मारून माओवाद्यांनी सव्वा नऊ लाख रुपये लांबवले. रॉय यांचे प्रेत जवळच्या दलदलीत मिळाले. छत्रधर महातो यांची सुटका करण्याची मागणी करणारी पत्रके त्यांनी घटनास्थळी टाकल्याचे दिसून आले. या घटनेची जबाबदारी अधिकृतरीत्या स्वीकारत किशनजी यांनी माओवाद्यांनी प. बंगाल सरकार विरोधात आपण ऑपरेशन व्हीनस सुरु केल्याची घोषणा केली. इतके हो उनही ममताजींनी माओवाद्यांपासून आपले अंतर राखले नाही. संकरेलवरील हल्ला हा प. बंगालच्या माओवादी इतिहासातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो कारण येथूनच माओवाद्यांनी पोलिसांविरुद्ध संरक्षणात्मक नव्हे तर आक्रमक रोख अवलंबल्याचे उघड झाले होते. मार्च २०१० मध्ये प. बंगालचे मंत्रालय आपण कधीही उडवून देउ शकतो असे विधान किशनजी यांनी केले. तर मे २०१० मध्ये झारग्रामजवळ हावडा कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये माओवाद्यांनी भीषण अपघात घडवला त्यात सुमारे १४८ लोकांचा बळी गेला. ह्या घटनेला आलेल्या प्रतिक्रिया बघता माओवाद्यांनी "तो मी नव्हेच" असा पवित्रा घेत या घातपातामध्ये आपण नव्हतो असे जाहीर केले. परिस्थिती झपाट्याने बदलत होती. याच वेळी चेरुकुरी राजकुमार उर्फ आझाद या माओवादी नेत्याला पोलिसांनी चकमकीत ठार केले. ममताजींनी लगेचच या घटनेचा निषेध केला.

ऑगस्ट २०१० मध्ये ममताजींच्या नंदीग्राम आंदोलनामध्ये आपले कार्यकर्ते भाग घेतील असे माओवाद्यांनी जाहीर केले. ९ ऑगस्ट रोजी लालगडमध्ये "संत्रस बिरोधी मंच" नामक संघटनेतर्फे आयोजित केलेल्या सभेमध्ये ममताजींनी नुसतीच हजेरी लावली असे नाही तर तेथे जोरदार भाषणही केले. ही सभा तृणमूलच्या झेंड्याखाली आयोजित केलेली नव्हती. तिला मेधा पाटकर, स्वामी अग्निवेश व अन्य सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. त्याच बरोबर हिंसक हल्ले चढवणारे पीसीपीएचे कार्यकर्तेही सभेमध्ये हजर होते. सभास्थानी तृणमूलच्या झेंड्यांपेक्षा पीसीपीएच्या झेंड्यांची संख्या अधिक असल्याचे दृश्य दिसत होते. असे असूनही ह्या सभेमध्ये ममताजी गेल्या आणि त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला याबद्दल लोकसभेमध्ये गदारोळ झाला. सभेमध्ये मेधा पाटकर आणि स्वामी अग्निवेश यांनी सीपीमला पादा आणि ममताजींना निवडण्याचे आवाहन लोकांना केले. सभेमध्ये ममताजींनी चेरुकुरी राजकुमार उर्फ आझाद ह्याला खोट्या चकमकीत ठार मारण्यात आल्याचा अरोप करून त्याची सीबीआयतर्फे चौकशी करण्याची मागणी केली. प. बंगालमधील सीपीएम खासदारांनी लोकसभेमध्ये दुटप्पी भूमिकेचा निषेध केला आणि ममताजींचा हा चेहरा जनतेसमोर आणायचा प्रयत्न केला. परंतु सत्तारूढ कॉंग्रेसने त्यासंदर्भात अवाक्षरही काढले नाही. त्यापाठोपाठ ममताजींनी या विभागामधून पोलिस व अन्य सुरक्षा दळे काढून घ्यावीत अशी मागणी केली.  तर दुसरीकडे माओवादी जाहिरपणे सांगत होते की आम्ही युद्धविराम मान्य केला असला तरीही त्याचा अर्थ असा नाही की भ्रष्ट सीपीएम नेत्यांना आम्ही सुके सोडू. सीपीएमला जंगलमहालमधून हाकलून देण्याची आमची मोहिम तशीच सुरु राहील.  सुशांत घोष, दीपक सरकार, अनुज पांडे आदि आमच्या यादीवर आहेत. ममताजींनी त्यांच्यावर कारवाई सुरु करावी अशी आमची मागणी आहे. २६ ऑगस्ट २०१० रोजी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसवरील हल्यातील एक प्रमुख आरोपी उमाकांत महातो याने मिदनापूरच्या झारग्रामजवळील कालाबानी गावामध्ये एक "लोकन्यायालय" चालवून सीपीमच्या तीन समर्थकांना पोलिसांचे खबरे म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा फर्मावली. ही शिक्षा लगेचच अंमलात आणली गेली. (यानंतर लगेचच उमाकांत सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत मारला गेला.)

माओवाद्यांनी आपली सर्व भिस्त ममताजींवर ठेवली होती असे नाही. ममताजींच्या विरोधात त्यांना आपले ऐकणारा राजकीय चेहरा हवा होता. त्यासाठी पीसीपीएला पुढे करणे सोपे होते. हळूहळू पीसीपीएवरती टीका करून ते आपल्यामधले नाहीत असे चित्र माओवादी उभारत होते. त्यातून पीसीपीए ही हिंसक संघटना नाही असे चित्र उभे करायचे होते. एका बाजूला ममताजींना मदत करायची पण आपल्या अधिक विश्वासातील पीसीपीएलाही निेवडणूकीमध्ये उभे करण्याचा डाव माओवादी खेळू पाहत होते. १० ऑगस्ट २०१० रोजी पीसीपीएचे प्रवक्ते मनोज महातो म्हणाले की आमचा भारतीय राज्यघटनेवर विश्वास आहे. आम्ही केव्हाही निवडणूका लढवू शकतो. खरे तर हा प्रश्न २००९च्या अधीपासून आमच्या नजरेसमोर होता. पण तेव्हा आम्ही संघटना मजबूत व्हावी याकडे लक्ष देत होतो. मिदनापूर आणि बांकुरामध्ये स्वबळावर आपण तीन जागा जिंकू अशी पीसीपीएच्या नेत्यांना खात्री होती. आपल्या प्रभावक्षेत्रामध्ये तृणमूलचा चंचुप्रवेशही त्यांना नको होता. अशा तर्‍हेने माओवादी आपले पाय पसरतच होते. फ़ेब्रुवारी २०११ मध्ये गोरखालॅंड जनमुक्ती मोर्चा या आंदोलनामध्येही माओवादी घुसल्याचे वृत्त गुप्तखात्याकडे होते. ही चिंतेची बाब होती.

निवडणुका जवळ येत होत्या. एप्रिल २०११ मध्ये प. बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी जाहीर पत्रके लावली. त्यामध्ये निवडणुकांवर बहिष्कार टाका म्हणून जनतेला आवाहन केले होते. सत्तेसाठी हपापलेल्या आणि खोटी आश्वासमे देउन लोकांना झुलवणार्‍या राजकीय पक्षांना आणि खास करून "फॅसिस्ट" सीपीएमचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन केले गेले होते. निवडणुकीमध्ये दोनच महत्वाच्या बाजू होत्या. त्यातील सीपीएमला हरवा म्हणजेच ममताजींना निवडा असे माओवादी सुचवत होते. सरकारने जंगल महाल मधील ऑपरेशन ग्रीन ह्ंट ताबडतोब थांबवावे असा इशारा देण्यात येत होता. भोळ्या भाबड्या जनतेचा छळ ताबडतोब थांबवण्याची मागणीही ते करत होते. आपण निष्पक्षपाती असल्याचे दिसावे म्हणून माओवादी ममताजींनाही इशारे देत होते. ममताजींनी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी आमचे "राजकीय" कैदी तुरुंगातून सोडावेत आणि प. बंगालमधील संयुक्त कारवाई बंद करावी अशी जाहीर मागणी माओवादी करत होते. ह्यामधील "राजकीय" कैदी सोडण्याची मागणी आश्चर्यकारक होती. माओवाद्यांना कोणत्या अर्थाने राजकीय कैदी म्हणावे हा प्रश्नच होता. लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍या आंदोलकांना आपल्याकडे राजकीय कैदी असा दर्जा दिला जातो व म्हणून अनेक फायदे त्यांना आपल्या तुरुंगात दिले जातात. जे माओवादी निरपराधांची निर्घृण हत्या करत होते आणि कायदा धाब्यावर बसवत होते त्यांना राजकीय कैदी म्हणून वागवायचे? आणि अशी मागणी ममताजींनी मान्य केली होती हेही नवलच नाही का? संपूर्ण प्रचारादरम्यान माओवादी सीपीएमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले चढवत होते त्यात कित्येकांचा बळीही गेला. ह्या हल्ल्यांची जबाबदारी उघडपणे माओवादी स्वीकारत होते. इतके हो उनही ममताजींनी त्यांचा साधा निषेधही केला नाही. केंद्रीय गृहमंत्री श्री चिदंबरम माओवाद्यांवर कडक कारवाईच्या घोषणा करत होते पण कॉंग्रेस पक्ष म्हणून आणि ममताजींचा निवडणुकीतील आणि केंद्रीय सत्तेतील भागीदार म्हणून त्यांच्या आणि माओवाद्यांच्या चुंबाचुंबीचा उल्लेखही करत नव्हते. सगळ्यांनाच प. बंगालमधील सत्तापालटाचे स्वप्न इतके हवेहवेसे होते की असल्या राजकीय दृष्ट्या गैरसोयीच्या बाबींवर पांघरूण टाकले जात होते.

अखेर मे २०११ मध्ये ममताजी प. बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या. लगेचच म्हणजे १९ मे रोजी माओवाद्यांचा छुपा पाठिंबा असलेल्या पीसीपीएने ममता सरकारशी वाटाघाटींसाठी बसण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर २८ मे रोजी माओवाद्यांनीही ममताजींनी जंगलमहालबद्दलचे आपले धोरण जाहीर करावे मग आम्ही बोलणी करायला तयार आहोत असे जाहीर केले. शपथविधीनंतर ममताजींनी जंगलमहालचा प्रश्न सोडवू असे म्हटले होतेच पण त्याबद्दल कोणतेही तपशील सांगितले नव्हते. मुख्यमंत्र्यांनी माओवाद्यांविरुद्धची मोहीम जवळपास थांबवली होती. किंबहुना माओवाद्यांनी सुरक्षा यंत्रणेवरील हल्ले थांबवले होते त्याचा परिपाक म्हणून पोलिस कारवाईही धीमी झाल्यासारखे वाटत होते. परंतु माओवादी सजग होते. त्यांनी गावागावातून काम करणार्‍या तृणमूलच्या कार्यकर्त्यांना गाठून त्यांनी पक्ष सोडावा म्हणून मोहिमच सुरु केली होती. इतकेच नाही तर तृणमूलने निवडणुकीदरम्यान जी आश्वासने दिली ती पाळावीत अन्यथा आम्ही जंगल महालमधून तृणमूलचे उच्चाटन करू अशी जाहीर धमकी पीसीपीए देउ लागली होती. २ जून २०११ रोजी धेरुआ गावातील स्थानिक तृणमूल नेत्याने सांगितले की रात्रीच्या वेळी पीसीपीएचा नेता माझ्याक्डे येतो आणि मला सांगतो की "आता आम्ही सीपीएमचा पाडाव केला आहे. आम्हाला दुसरा कोणता राजकीय पक्ष येथे वाढायला नको आहे. सबब तू आता तृणमूल पक्ष सोड. सीपीएम सत्तेवर होती म्हणून आमचे आणि त्यांचे भांडण होते. आता तृणमूल सत्तारुढ झाली आहे तेव्हा आता तेच आमचे वैरी आहेत". अखेर मे २०११ मध्ये तुरुंगातून सोडून देण्यात आलेल्या मनोज महातो या पीसीपीएच्या नेत्याला २ जुलै रोजी लालगड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बिरकार गावी पोलिसांनी पुन्हा अटक केली. आश्चर्य म्हणजे मनोजवर सीपीएमचे कार्यकर्ते व नेते जितेन महातो यांचे अपहरण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्या होत्या. महातो यांच्या अटकेचे पडसाद मिदनपूर, बांकुरा आणि पुरुलिया या सर्व जिल्ह्यामध्ये उमटले.

७ जुलै रोजी ममता सरकारने सहा जणांची एक समिती स्थापन केली. त्यामध्ये सुजातो भद्र हे मानवाधिकारवादी कार्यकर्ते, पत्रकार देबाशीश भट्टाचार्य, नद्यांविषयक तज्ञ कल्याण रुद्र, फिजिक्स विषयाचे प्रमुख अशोकेंदु सेनगुप्त, बंदी मुक्ती समितीचे सरचिटणीस छोटोन दास आणी कविवर्य प्रसून भौमिक हे त्याचे सभासद होते. बोलणी चालू करण्यासाठी सरकारतर्फे कोणत्याही अटी घालण्यात आल्या नाहीत. दुसर्‍या दिवशी सरकार  "राजकीय हिंसाचाराचे आरोप असलेल्या" ४६ कैद्यांना सोडून देइल असे ममताजींनी जाहीर करत वातवरण निर्मिती केली. (यामध्ये दोन कैदी सोडू नयेत असा आक्षेप केंद्राने घेतला होता पण ममताजींनी त्याकडे दुर्लक्ष केले.) तसेच माओवाद्यांनी बोलण्यांसाठी पुढे यावे आणि हत्यारे खाली ठेवावीत असे आवाहनही त्यांनी केले. परंतु पाचच दिवसात १३ जुलैला विकासाच्या बदल्यात हत्यारे खाली ठेवण्याचा ममताजींचा प्रस्ताव नाकारल्याचे माओवाद्यांनी जाहीर केले. इतकेच नाही तर पोलिसांचे खबरे म्हणून जे कार्यकर्ते काम करायचे थांबवतील ते सोडून इतरांवरील हल्ले चालू ठेवण्याचे माओवाद्यांनी जाहीर केले. जंगल महालमध्ये प्रशिक्षण केंद्र जोरात सुरु असल्याचा इशारा केंद्राने दिला पण कैदी सोडण्याची तयारी सुरुच होती. समितीने लालगडमध्ये अनेक खेटा घातल्या. पण वरिष्ठ माओवादी नेत्यांशी त्यांची गाठही पडली नाही. सरकारवरील दडपण वाढवण्यासाठी कोलकताच्या कॉलेज स्क्वेअरमध्ये सिंगूर नंदीग्राम आणि जंगल महालमधील "हुतात्म्यांचे" स्मारक म्हणून स्मृतीस्तंभ बांधण्याचा उद्योग काही माओवाद्यांनी केला असता पोलिस व निदर्शकांमध्ये चकमकी झाल्या. ममताजींच्या मनामध्ये काय आहे याची चाचपणी देखील माओवादी एका बाजूने करत होते. त्यांनीच नेमलेल्या मध्यस्थांशी संपर्क साधला जात होता. माओवादी इतके बेधडक काम करत होते की खुद्द किशनजी जंगल महालमध्ये वावरताना दिसू लागले. तर आकाश आणि बिकाश गारबेटमध्ये दिसत असत. माओवादी आणि तृणमूलच्या जवळीकीचा सर्वात जास्त फायदा घेतला तो सुरक्षा व्यवस्थेने. त्या दरम्यान माओवाद्यांचे जाळे त्यांनी भेदले होते. जागोजागी खबरे बसवण्यात आले होते. माओवाद्यांचे इरादे काही वेगळेच होते ह्याचे प्रत्यंतर यायला फार काळ जावा लागला नाही. ११ ऑगस्ट २०११ रोजी मिदनापूरच्या लक्ष्मणपूर जंगलामध्ये माओवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला चढवून तिघांना ठार मारले. तृणमूलच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना धमकावण्याचे सत्र सुरु झाले, पक्षाच्या सभांना हजर राहू नये, पक्षाचा झेंडाही फडकवू नये म्हणून सक्ती केली जात होती. तृणमूलच्या नेत्यांकडून खंडणीसाठी माओवादी तगादा लावू लागले. अशा परिस्थितीमध्ये तृणमूलच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना परिसरात फिरणेही मुश्कील झाले. नॅशनल वॉलंटीयर फोर्स अशा दलाची स्थापना करून त्यामध्ये १०००० तरुणांना भरती करायची योजना होती परंतु माओवाद्यांनी धमक्या देउन दलमध्ये भरती हौ नका असा इशारा लोकांना दिला.

२५ सप्टेंबर रोजी माओवाद्यांच्या विरोधात आंदोलन छेडणार्‍या लालमोहन महातो या तृणमूलच्या कार्यकर्त्याला त्यांनी ठार मारले. अखेर २६ सप्टेंबर रोजी ममताजींनी माओवाद्यांना इशारा दिला की जंगल महालच्या या माफिया गुंडांनी दुटप्पी व्यवहार थांबवावा - एकीकडे ते लोकांना ठार मारत आहेत आणी दुसरीकडे तेच पोलिस अत्याचार आणि मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या नावाने बोंब मारत आहेत. हे लोकांना ठार मारण्याचे सत्र आणि बोलणी हातात हात घालून चालवता येणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. मी त्यांना तीन चार महिन्यांचा अवधी दिला आणि ते मुख्य राष्ट्रीय प्रवाहात यावेत म्हणून प्रयत्नही केले पण माझी चूक मला समजते आहे. मला ती चूक पुन्हा करायची इच्छा नाही असेही त्या म्हणाल्या. जादवपूर व कोलकता तसेच प्रेसिडेंसी विद्यापीठाच्या काही विद्वानांवर देखील त्यांनी ताशेरे झाडले. आश्चर्य म्हणजे निवडणूकीपूर्वी याच विद्वानांबरोबर हातात हात घालून तृणमूल वाटचाल करत होती. राज्य सरकारने पोलिसांच्या भरतीमध्ये माओवादी त्रस्त भागातील तरुणांना अग्रक्रम देण्याचे तसेच शरण येतील त्यांना अन्य आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यातून माओवाद्यांकडे आकर्षित झालेला तरूण मागे वळेल अशी आशा होती. आता माओवद्यांनीही पवित्रा बदलला होता. सरकारने जंगल महाल मधील संयुक्त कारवाई थांबवावी अन्यथा बोलणी होणार नाहीत असे त्यांनी जाहीर केले. ऑक्टोबरच्या मध्यावर ममताजींनी माओवाद्यांना सात दिवसांचा अंतीम इशारा दिला. त्याच आठवड्यात ममताजींच्या घराजवळ एका माओवाद्याला संशयावरून पोलिसांनी अटक केली. परिस्थिती अचानक वळणे घेत होती. एका बाजूला माओवाद्यांनी आपल्या घातपाती कारवाया मोठ्या प्रमाणावर सुरु केल्या तसेच तृणमूलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले सुरु केले. पोलिसांनीही आपल्या कारवाया पुढे रेटल्या.

तृणमूलच्या पुढाकाराने माओवाद्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी भैरव वाहिनी वा जनजागरण मंच आदि व्यासपीठे स्थापण्यात आली होती. त्याला माओवादी गुंडाच्या संघटना म्हणू लागले. ४ नोव्हेंबर रोजी पुरुलिया मधील बलरामपूरनजिक जितू सिंग सरदार या तृणमूलच्या नेत्याची माओवाद्यांनी हत्या केली. जितूने जंगलमहाल उन्नयनबिरोधी  प्रतिरोध समिती स्थापन करून माओवाद्यांशी लढा आरंभला होता. तर १४ नोव्हेंबर रोजी अजित सिंग सरदार आणि त्याचा पुत्र बाकू यांची हत्या करण्यात आली. राजन सिंग सरदार हा नेता आदिवासी मूलवासी पीपल्स समिती ह्या माओवाद्यांशी संलग्न संस्थेतून बाहेर पडला होता. त्याची शिक्षा म्हणून त्याचे वडिल अजित सिंग आणि भाउ बाकू यांना ठार मारण्यात आले होते. हळूहळू जंगलमहालमध्ये खरोखरच माओवादी आहेत असे ममताजी मान्य करू लागल्या. इतकेच नव्हे तर आता तृणमूलचे कार्यकर्ते आणि नेते यांचीही गणना त्यांनी "वर्गशत्रू" म्हणून केल्याचे उघड होत होते. जीवंत राहयचे असेल तर तृणमूल सोड आणि आमच्यात सामिल हो असा इशारा मिळत असल्याचे सुमारे २० गावामधल्या तृणमूलच्या नेत्यांनी म्हटले होते. ह्या हत्या म्हणजे उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली. किशनजींवर कारवाई करण्याचा निर्णय अशा हत्यांनंतर केला गेला असे म्हटले जाते. अखेर २४ नोव्हेंबर रोजी प्रमुख माओवादी नेते मल्लजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत प. बंगाल आणि झारखंडच्या हदीवरील मिदनापूर जिल्ह्यातील झारग्राम जवळील कुशबोनी जंगलात मारला गेला. ही चकमक दोन तास चालू होती. वरिष्ठ आंध्र नेते श्री. वरवरराव यांनी किशनजी यांचे प्रेत ओळखले आणि त्यांना त्यांच्या करीमनगर जिल्ह्यातील ब्राह्मणविधी - पेडपल्ली गावी आणण्यात आले. किशनजींचा मृत्यू ही माओवाद्यांच्या चळवळीला कलाटणी देणारी घटना ठरली. २००७ साली जे जे नेते म्हणून माओवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरोवर काम करत होते त्यांच्यापैकी केवळ सात जण म्हणजे अर्धेच आता जीवंत राहिले होते. तर माओवाद्यांच्या केंद्रीय समिती मधले ३९ पैकी १८ जण मारले गेले होते. २९ मे २०१० रोजी लाखनपूरच्या जंगलातील चकमकीमध्ये किशनजी बालंबाल वाचले होते. एक नेता मारला गेला म्हणून चळवळ संपणार नाही असा इशारा प. बंगालचे राज्यपाल व भूतपूर्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम केलेले श्री. नारायणन यांनी दिला.

माओवाद्यांशी राजकीय चुंबाचुंबी करणार्‍या ममताजींना अखेर माओवाद्यांनी काय प्रतिसाद दिला हे उघड आहे. या सर्व खटाटोपामध्ये ममताजींपेक्षा माओवाद्यांनी अधिक राजकीय फायदा उठवला. आजही अनेक माओवादी तृणमूलचे कार्यकर्ते बनून वावरत आहेत. ह्या उदाहरणामधून अन्य राजकीय नेते काही शिकले आहेत असे दिसत नाहीत. आज माओवादी चळवळ जेथे जेथे पसरली आहे तिथे तिथे स्वतःला "सेक्यूलर" म्हणून मिरवणारे नेते सत्तेमध्ये असल्याचे दिसून येइल. ओरिसामधील श्री. नवीन पटनायक, बिहारमध्ये श्री. नीतिश कुमार हेही अशाच प्रकारची विचारसरणी जवळ करत असतात. तिथे त्यांना ममताजींपेक्षा वेगळा अनुभव येणे शक्य नाही हे सांगायला नको. कॉंग्रेसचेही दहशतवादाविरोधातील धोरण पळपुटेच आहे.  माओवाद्यांची उद्दिष्ट काय ह्याबद्दल अभ्यास करणारे आणि स्पष्टोक्ती करणारे श्री. चिदंबरम तशाच प्रकारची स्पष्टोक्ती जिहादी दहशतवाद्यांविरोधात करत नाहीत. जिथे राजकीय स्वार्थ देशहितापुढे मोठा ठरतो त्यांच्या धोरणाविषयी टिप्पणी करण्याचीही गरज नाही. आपण नेपाळच्या इतिहासाची ओळख करून घेतली आहेच. इथल्या माओवाद्यांची तशीच पावले इथे पडताना पाहून आणि राजकारण्याचा स्वार्थ बघून इथेही नेपाळची पुनरावृत्ती घडेल का अशी पाल देशभक्त नागरिकाच्या मनात चुकचुकेल.