Monday 11 March 2019

बालाकोटचे पुरावे

हल्ल्यानंतर बालाकोटची नव्याने रंगरंगोटी होईपर्यंत कोणी पुरावे मागत नव्हते.

रंगरंगोटी पुरी झाल्याझाल्या पिंडीच्या भारतातल्या  पोपटांना कंठ फुटला आहे.

सैन्याकडे असलेले पुरावे जगासमोर आले तर भारतीय सैन्याची अनेक गुपिते पाकिस्तानला कळतील. हीच परिस्थिती सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी होती. पाकिस्तानने पुरावे मागून भारताला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करावा हे तर समजण्यासारखे आहे. पण जेव्हा इथले पोपट पिंडीला हवे तेच प्रश्न सरकारला विचारून सरकारची कोंडी करतात तेव्हा देशाच्या शत्रूला मदत करण्याची त्यांची सुप्त इच्छा लपून राहूच शकत नाही.

जे दावे सपशेल खोटे आहेत ते परत परत का केले जातात??

सर्जिकल स्ट्राईकच्या निमित्ताने अशीच धूळवड झाली.  आता काही वर्षांनंतर त्याबद्दल जनतेच्या मनात जराही संदेह नाही म्हटल्यावर हे आक्षेप बंद झाले आहेत.

आणखी काही महिन्यात बालाकोटबद्दलचे आक्षेप असेच हवेत विरतील.

असे आक्षेप फेक्यूलरांनी घेतल्याने भारतीय जनता सैन्यावर व पर्यायाने मोदींवर अधिकाधिक विश्वास टाकत आहे, विसंबू लागली आहे हे ही स्पष्ट असूनसुद्धा या घरभेद्यांना जाग का येत नाही असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल. पाकिस्तानच्या तालावर नाचत हे फेक्यूलर पाकिस्तानला सती का जातात हे कोणालाही कोडेच वाटेल.

त्याचे उत्तर सोपे आहे. भारतीय जनतेचा आपल्या सैन्यावर १००% भरवसा असला तरी पाकिस्तानच्या जनतेचा त्यांच्या सैन्यावर काडीइतका विश्वास उरलेला नाही.

एकीकडे पिछाडीला पडलेले सैन्य तोंडाने हवाबाण हरडे सोडते हा पाकिस्तानी जनतेचा अनुभव आहे. त्यांचा पार्श्वभाग अबटाबाद धाडीच्या वेळी उघडा पडला नव्हता काय?? आताही हीच शंका त्यांच्या मनात आहे.

तेव्हा तिकडे पाकिस्तान मध्ये तेथील सैन्याने आणि राजकीय पक्षांनी भारताच्या पराक्रमाचे दावे नाकारायचे आणि इकडे भारतात मोदींचे विरोधक देखील हे दावे जाहीररीत्या नाकारत आहेत असे चित्र आपल्या जनतेसमोर रंगवायचे अशी ही व्यूहरचना आहे. हे नाटक कसे उत्तम रीतीने वठवले जाते हे आपण पाहत आहोत. असे नाटक वठवणे ही पाकिस्तानी राजकीय पक्षांची आणि सैन्याची मजबूरी आहे.

जनता आपल्या मागे नसेल तर आपण राज्य तर करू शकणार नाहीच शिवाय आपली डरपोकगिरी बघून जनता आपल्या विरोधात बंड करून उठेल अशी भीती पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या मनात घर करून बसली आहे. अशा तऱ्हेने पाकिस्तानी जनताच त्यांच्या सैन्याविरोधात बंड करून उठणे हे आपल्या पथ्यावर पडणारी बाब आहे.

म्हणून यांचे हे कारस्थान हाणून पाडायचे तर सरकारने काय करायचे ते करायला मोदी सक्षम आहेत पण सामान्य जनतेने काय हाताची घडी घालून गप्प बसणे योग्य आहे?? आपल्याला काय करावे लागेल??

सैन्यावर शंका घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राजकीय धोबीपछाड द्या. त्यांच्या मागे जो जो उभा राहतो - मग भले तो तुमच्या माझ्या सारखा सामान्य नागरिक जरी असला तरी त्याचेही विमान जमिनीवर उतरवा.

करणार का एवढे काम तुम्ही??


1 comment: