Friday 11 June 2021

कोविद १९ - लपवले काय? मिळवले काय? भाग १

कोविद १९ - लपवले काय? मिळवले काय?

भाग १

 कोविड १९ चा उगम नेमका कुठे झाला - त्याच्या प्रादुर्भावासाठी चीन जबाबदार आहे का - माणसाकडून माणसाकडे याचा संसर्ग आणि प्रादुर्भाव होतो हे माहिती असूनही ही माहिती चीनने जगापासून लपवून ठेवली का - आपल्या देशांतर्गत लोकांना एका गावातून दुसऱ्या गावाकडे जाऊ देण्यास प्रतिबंध घालणाऱ्या चीनने आपल्या व अन्य नागरिकांच्या परदेश प्रवासावर बंदी का घातली नाही असे प्रश्न आज उपस्थित झाले आहेत. शिवाय काही मान्यवर आणि विश्वसनीय शास्त्रज्ञांनी याबाबत विशेष माहिती दिली होती तिची प्रकाशात आणली गेली नाही असे आता दिसून येत आहे. या सर्वांमध्ये पंतप्रधान मोदी यांची कामगिरी विशेष उठून दिसत आहे. त्याविषयी थोडे लिहिते आहे.

या संसर्गजन्य रोगाची लक्षणे आणि त्याचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव बघून डिसेंबर २०१९ मध्येच वुहान शहरामधील डॉक्टर्स भयचकित झाले  होते. न्यूमोनियाचा हा प्रकार त्यांनाही नवा होता. आणि येणाऱ्या रोग्यांना नेमकी काय औषध योजना करावी याच्या बुचकळ्यात ते पडले होते. साहजिकच डॉक्टर्सच्या मित्रगटांमध्ये त्याची दबक्या आवाजात का होईना चर्चा चालू होती. त्यामध्येच होते एक डॉक्टर लिन वेन लियांग. साधारणपणे २५ डिसेंबरच्या आसपास त्यांनी आपल्या डॉक्टर मित्रांना याची माहिती देऊन सावध राहण्यास सांगितले. या वेळेपर्यंत ४०-५० पेशंट दाखल होऊनही त्यावर अधिकृत खुलासा दिला गेला नव्हता. लिन यांनी वी चॅट या व्हाट्सअप सदृश चिनी ऍप वरती  हा संदेश देऊन दोन तीन दिवस झाले नसतील की तेथील पोलिसांनी त्यांना बोलावणे पाठवले. आपण हा संदेश का लिहिलात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यांनी उत्तर देऊनही पोलिसांचे समाधान झाले नाही. अखेर २८ डिसेंबर  आसपास या डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. शेवटी दिलगिरी व्यक्त केल्यावर त्यांना सोडण्यात आले. यातून अन्य डॉक्टर्सना प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आले होते. शिवाय ३० डिसेंबर रोजी प्रथमच चीन सरकारने अधिकृतरीत्या नव्या प्रकारच्या न्यूमोनियाचे रोगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत असे जाहीर केले. सोबतच ह्या रोगाचा प्रसार माणसाकडून माणसाकडे होत नसल्याचे सांगण्यात आले होते. या खुलाशामधून रोगाचे गांभीर्य कितपत आहे ते डॉक्टर्सना तसेच लोकांनाही समजणे कठीण होते.

याच दरम्यान म्हणजे चीन सरकारने ३० डिसेंबर रोजी खुलासा केल्यानंतर  १ जानेवारी रोजी हॉंगकॉंगमध्ये याच विषयावर काम करणाऱ्या डॉक्टर ली मेंग यानना त्यांच्या वरिष्ठांनी बोलावून घेतले व ह्यामध्ये काय माहिती मिळते ते तपासून बघ असे सांगितले. ली मेंग यान यांनी शास्त्रीय पद्धतीने आपला शोध चालू ठेवला. ते करत असताना आपल्या डॉक्टर सहकाऱ्यांशी खास करून वुहान संस्थेमध्ये काम करणाऱ्या परिचितांशीही त्या बोलत होत्या, तेव्हा त्यांच्या अनेक गोष्टी ध्यानात येत गेल्या. अखेर गुणसूत्रांचा अभ्यास केल्यावर १६ जानेवारी रोजी त्यांनी हे अनुमान काढले की हा व्हायरस नैसर्गिक नाही - तो कोणत्याही प्राण्याच्या संपर्कात आल्यामुळे माणसाला झालेला नाही - हा व्हायरस प्रयोग शाळेत "बनवला" गेला आहे. त्याच्या एकूण सुमारे ३०००० पैकी ३००० गुणसूत्रांमध्ये बदल केला गेला आहे ज्या बदलामुळे त्याची दाहकता वाढली आहे असे त्यांच्या लक्षात आले होते.  ह्या बाबीचा त्यांनी अधिक कसून तपास केला. अखेर आपल्या वरिष्ठांकडे हा विषय त्यांनी काढला. १९ जानेवारी रोजी वरिष्ठांनी त्यांना हा विषय बाजूला ठेव व अमुक अमुक विषयावर लक्ष केंद्रित कर म्हणून सांगितले. एक प्रकारे ली मेंग यान याना त्या तपासातून बाहेर काढण्याचा विचार वरिष्ठ करत होते असा त्यांचा समज झाला होता.

ली मेंग यान यांचे हे काम चालू होते तोवर जगामध्ये अन्य पावले उचलली जात होतीच. एकीकडे चीन सरकारने नव्या न्यूमोनियाच्या रोग्यांची भरती झाल्याची कबुली दिली होती तर दुसरीकडे वुहान प्रयोगशाळेची सूत्रे हाती घेण्यासाठी एका चिनी लष्करी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आले. ही बाब धक्कादायक होती. एका वैद्यकीय संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेच्या सर्वोच्च पदावर लष्करी अधिकारी नेमण्याचे प्रयोजन काय होते? की ही प्रयोगशाळा चिनी लष्करासाठी जैविक हत्यारे बनवण्याचे काम करत असल्यामुळे या संकटसमयी तिची सूत्रे सांभाळण्यासाठी आणि नको ती गुपिते बाहेर पडू नयेत म्हणून कडक शिस्त अमलात आणण्यासाठी एका कठोर लष्करी अधिकाऱ्याला तिथे आणावे लागले होते? एकंदरीत व्यवसायाने केवळ डॉक्टर असलेली मंडळी इथून पुढे संस्थेचा कारभार हाकण्यात कमी पडतील अशा अंदाजाने हे पाऊल उचलले गेले असावे.

५ जानेवारी रोजी पहिल्यांदाच ट्विटर वरती गार्बो गुरुंग नामक व्यक्तीने कोविड १९ च्या संदर्भातले एक ट्विट टाकले.

"18 years ago, #China killed nearly 300 #HongKongers by unreporting #SARS cases, letting Chinese tourists travel around the world, to Asia specifically to spread the virus with bad intention. Today the evil regime strikes again with a new virus.

"१८ वर्षांपूर्वी चीनने सार्स रोगाविषयी माहिती दडपून ठेवून दुष्ट हेतूने आपल्या नागरिकांना जगभर फिरू दिले त्यातून  ३०० हॉंगकॉंगवासी जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता एका नव्या व्हायरसचा हल्ला ह्या सत्तेने आपल्यावर केला आहे" अशा अर्थाचे हे ट्विट होते. त्यामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले. कारण या वेळपर्यंत रोगाच्या भीषण स्वरूपाची कोणालाच कल्पना आली नव्हती. २३ जानेवारी रोजी प्रथमच डेली मेल या वृत्तपत्राने एक लेख छापला होता.  वुहान सदृश प्रयोगशाळेमधून एखादा भीषण व्हायरस निसटू शकतो असा इशारा शास्त्रज्ञांनी २०१७ साली दिला होता असे या लेखामध्ये म्हटले होते. २६ जानेवरीच्या वाशिंग्टन टाइम्सच्या अंकामध्ये वुहान येथील प्रयोग शाळेमधून कोविड १९ व्हायरसचा प्रसार झाला असण्याची शंका व्यक्त केली गेली होती. याच दिवशी लॅन्सेट या प्रतिष्ठित सायन्स मासिकामध्ये सुमारे ४० ख्यातनाम शास्त्रज्ञांनी व्हायरसचा उगम वुहानच्या मच्छी बाजारात झाला नसल्याचे म्हटले होते.

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती भारत सरकार काय करत होते हे पहिले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

२७ जानेवारी रोजी केरळच्या त्रिसूर गावामध्ये एक २० वर्षीय युवती सुका खोकला व घसा दुखत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेली. तिला ताप आलेला नव्हता तसेच श्वास पण लागलेला नव्हता. पण २३ जानेवारी रोजी तिने  वुहान शहर ते  कुमिनटांग शहर असा प्रवास ट्रेनने केला होता. आणि प्रवासामध्ये तिला स्टेशनवर आणि ट्रेन मध्ये अनेक प्रवासी खोकल्यामुळे बेजार झालेले दिसले होते. २६ तारखेपर्यंत तिला कोणताही त्रास नव्हता. ती कोणत्याही कोविड रोग्याच्या संपर्कात आल्याचे तिला आठवत नव्हते. तसेच ती वुहानच्या (भविष्यात प्रकाशझोतात आलेल्या) मच्छी बाजारातही गेली नव्हती.

ही बातमी येण्याच्या एक दिवस आधी बिझिनेस स्टॅंडर्ड या वृत्तपत्राने बातमी छापली होती की  वुहान शहरामध्ये सुमारे २५० भारतीय अडकले असून भारत सरकार त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी चीन सरकारच्या संपर्कात आहे. या तारखेपर्यंत चीनमध्ये मृतांची संख्या ५६ झाली होती आणि २००० हुन अधिक व्यक्तीना रोगाची लागण झाली होती, त्यामध्ये सुमारे २३ जण परदेशी नागरिक होते. २६ जानेवारी रोजी भारतीय दूतावासाने तिसरी हॉट लाईन चालू केली होती त्यावर सुमारे ६०० कॉल्स येऊन गेले होते. वुहान शहरामध्ये लॉक डाउन  २३ जानेवारी पासून लागू झाला  होता. चीनच्या अन्य १२ शहरांमध्ये हे हीच दक्षता घेतली जात होती त्यामुळे या शहरांमधूनही भारतीय नागरिक अडकले होते. साधारणपणे जानेवारी शेवटचा आठवडा व फेब्रुवारी पहिल्या आठवड्यामध्ये चीनमध्ये चिनी नव्या वर्षाचा सोहळा धुमधडाक्यामध्ये साजरा केला जातो त्या निमित्ताने मिळालेली सुट्टी पकडून अनेक भारतीय  विद्यार्थी दोन आठवड्यापूर्वीच मायदेशी परतले होते. २३ जानेवारी पासून लागू झालेल्या लॉक डाउनच्या कचाट्यातून ते सुटले होते तरी काही विद्यार्थी मागे  रेंगाळले होते. ते आता मायदेशी परतण्यास अधीर झाले होते. साथीच्या रोगाचे नियंत्रण करणाऱ्या चिनी संस्थेच्या डॉक्टर्सनी सांगितले होते की हे विद्यार्थी भारतात परतले की त्यांना हॉस्पिटल  मध्ये ठेवण्याची गरज नाही, नुसते घराबाहेर न पडण्याचे बंधन पुरेसे ठरेल. त्यांना रोगाची काही लक्षणे दिसली तरच हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवावे.  हा सल्ला तरी कितपत बरोबर होता - खरे तर दिशाभूल करणारा होता हे भविष्यात दिसून आले.

भाग २ पुढे चालू

No comments:

Post a Comment