Wednesday 18 April 2018

एका रिक्शावाल्याचे मनोगत

परवाच एका रिक्शावाल्याने मला अचंबित केले. कुठून तरी विषय आला टीव्हीवरील बातम्यांचा.

तो म्हणाला - अब तो चोरी भी मोदी करता है - खून भी मोदी करता है और बलात्कार भी मोदी ही करता है.

टीव्ही बातम्यांवरील ही खरमरीत प्रतिक्रिया ऐकून ज्याला आपण अडाणी समजतो तो अशिक्षित अल्पशिक्षित नागरिक किती चाणाक्ष आहे ते जाणवले. सर्व मिडियाने विचार करावा अशी ही टिप्पणी आहे.

"आपली विश्वासार्हताच पणाला लागली आहे" याचीच बातमी मिडियाकडे नाही!!!

रिक्शावाला इथेच थांबला नाही - तो पुढे जे बोलला ते आमच्या सुशिक्षितांनाही सांगता येत नाही.

मी रिक्शावाल्याला म्हटले - मिडियाचे जाऊ दे. पण मला सांग २०१९ ला मोदी पडणार त्याचे काय??

नाही मॅडम, भले सीट कमी होतील पण जिंकणार तोच.

तेच तर - मी म्हटले - भाजपला २३० - २४० मिळतील.

नाही नाही - भले परत ३४० मिळाल्या नाहीत तरी स्पष्ट बहुमत तर मिळणारच.

म्हटले - कसे शक्य आहे? तुमच्या उत्तर प्रदेशात थोडीच परत ७३ जागा मिळणार?? योगीजींवर तर लोक नाराज आहेत - सिटा कमी होतील.

रिक्शावाला - यूपीत मोदींच्या जागा वाढतीलच.

त्याचे निष्कर्ष तर ठाम होते.

पण त्याचा बेस काय???

मी परत चावी मारत म्हटले - अरे बाबा मुलायम मायावती सारखे चांगले नेते सोडून लोक यांना कशाला मते देतील??

तो म्हणाल्या - मॅडमजी ध्यान से सुनीये. घर में सास है दो तीन बहु आती हैं तो हर बहु समझती है मालकीन तो मैं ही हूँ. अब बोलिये - घर चलेगा कैसे??

हर कोई मालीक बनना चाहता है तो घर नहीं चल सकता.

मुलायम ममता मायावती लालू सब मालीक है. ये घर नहीं चला सकते.

मोदी घर चला सकते हैं. क्यूँ कि भाजप में एक ही मालीक बनता है.

माझे आश्चर्य संपत नव्हते.

अब देखिये इससे पहिले अटल विहारी वाजपेयी प्रधानमंत्री थे. बडे विद्वान थे. मोदी से भी बहुत बडे थे.

फिर भी वाजपेयी सरकार नहीं चला सकें.

आज मोदीजी चला रहे है.

क्यूँ?

एक आदमी निर्णय लेता है और बाकी मान जाते है. घर में मालीक एक ही चाहिये.

लेकिन इतना बोल के क्या फायदा? मोदीजी तो कुछ भी काम नहीं न कर पाये - अभी चार साल पूरे हो गये.

थोडा रुको - मोदीजी को तो पंधरह साल लगेंगे यहां काम करने!



त्या रिक्शावाल्याला नेमके काय म्हणायचे होते बरे?

एक गंभीर तत्व - राजकीय अभ्यासकांसाठी - तो सांगत होता.

मुलायम - मायावती - लालू - ममता ह्यांची नावे तो घेत होता - भ्रष्टाचाराने लिप्त म्हणून ते नेते नकोत असे तो म्हणत नव्हता - नव्हता - नव्ह्ता.

तो इतकेच म्हणत होता की हे नेते पर्यायी सरकार देऊ शकत नाहीत कारण त्यांचा एकमुखी अंमल केंद्रात येणे शक्य नाही.

आणि त्याची किमान अपेक्षा तेव्हढीच आहे. बस - निवडणूक झाली की येईल ते सरकार पाच वर्षे चालावे.

सामान्य माणसे जे आयुष्य जगतात त्यामध्ये स्थैर्य नाही. इतकी अनिश्चितता आहे की त्यामध्ये त्यांना दोलायमान सरकारच्या अनिश्चिततेची भर पडायला नको आहे. आयुष्य बेभरवशाचे आहेच पण डोक्यावरती एकच एक राजा असेल तर रोज नवे संकट पुढे येणार नाही - जी काही थोडीफार आयुष्याची घडी तो सामान्य माणूस बसवू पाहत आहे त्यात तरी त्याला अडथळा नको आहे. सत्तेवरती बसला की नेता पैसा खाणार हेही त्या बिचार्‍याने गृहित धरले आहे. कर बाबा तू भ्रष्टाचार पण निदान माझ्या कष्टाच्या कमाईमधून जे माझ्या ताटात मी कमावलेले पडले आहे ते माझ्याच पोटात पडू दे इतकी साधी अपेक्षा आहे. किती किमान अपेक्षांवरती हा समाज जगतो आहे जगू पाहतो आहे ह्याकडे लक्ष द्या.

मोठे मोठे पांडित्याचे विचार नाहीत. नेत्याने धुतल्या चारित्र्याचे असावे ही देखील अपेक्षा नाही. नीतीमत्तेचा आग्रह नाही. कोणा चोराने दरवडेखोराने बस माझ्या घरात घुसू नये एव्हढ्यावरती तो जिणे जगायला तयार् आहे - कष्ट उपसायला तयार आहे.

पण ही जेव्हा शाश्वती उरत नाही तेव्हा त्याला सरकारला पर्याय शोधावासा वाटतो.

लक्षात घ्या की ’शोधावासा’ वाटतो.

२००४ साली भाजप नेतृत्व एकमुखाने सरकार चालवू शकेल असे जनतेला पटले नाही - म्हणून पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे.

२००८ सारखा भीषण हल्ला होऊन सुद्धा २००९ साली आपण सरकार चालवू शकतो हा भरवसा भाजप जनतेला देऊ शकली नाही - कॉंग्रेसला हरवू शकली नाही.

स्थिर सरकार म्हणजे जनतेसाठी अगदी मूलभूत डाळभात आहे. त्यावरती विकास - हिंदुत्व तोंडीलावणे म्हणून मिळाले तर उत्तम ह्या मनःस्थितीमध्ये जनता जगते आहे. तिच्यासमोर कोणाला निवडावे ह्याचे निकष अगदी स्पष्ट आहेत.

1 comment:

  1. विकास , स्थिर सरकार , निर्णय क्षमता , भ्रष्टाचारावर कारवाई व सुधारणा या सामान्य माणसाला आवश्यक अशा गोष्टी आहेत .या सर्व गोष्टी जर त्याला आत्ता मिळत असतील तर तो नक्कीच मोदींना पाठिंबा देणार.
    upa सरकारने केलेला भ्रष्टाचार व मोदी सरकारने केलेल्या सुधारणा हे सर्व डोळ्यासमोर असल्यामुळे सामान्य माणूस फसविले जाणार नाही .

    ReplyDelete