Saturday, 13 May 2017

गिलगिट - बाल्टीस्तान - भाग १

Image result for gilgit baltistan



गिलगिट - बाल्टीस्तान - भाग १

ज्या गिलगिट - बाल्टीस्तान मधून सीपेकचा मार्ग जाणार आहे तो म्हणजे पकिस्तानच्या ताब्यात असलेला पाकव्याप्त काश्मिरचाच एक विभाग आहे अशी आपली समजूत असते. प्रत्यक्षात मात्र तसे नाही. १९४७ सालपर्यंत गिलगिट - बाल्टीस्तान हा जम्मू - काश्मिरचा एक हिस्सा होता. जम्मू - काश्मिर - लडाख यांच्या पेक्षा हा वेगळा असलेला भाग - त्याची ओळख वेगळी होती - म्हणून त्याला जम्मू - काश्मिरचा उत्तर प्रांत म्हटले जात होते. इथे गिलगिट - बाल्टीस्तान - दियमिर - घांची - घिझर असे पाच प्रांत होते आणि त्यांनी १९४७ मध्ये काश्मिरच्या डोग्रा राजाच्या राजवटीतून आपण स्वतंत्र झाल्याचे घोषित केले होते. १९४८ सालच्या युद्धानंतर पाकिस्तानने ह्या भागाचा कब्जा घेतला. पाकिस्तानने हा विवादित काश्मिरचाच एक भाग असल्याचे मान्य केले होते. म्हणून एप्रिल १९४९ मध्ये उर्वरित पाकव्याप्त काश्मिरात त्याची गणना होऊ नये म्हणून पाकिस्तान सरकारने पाकव्याप्त काश्मिरच्या मुझफ़्फ़राबादमधील सरकारबरोबर एक करार करून हा भाग पाकव्याप्त काश्मिरच्या ताब्यातून स्वतःकडे घेण्याचे ठरवले. त्यानुसार एक विषेष अध्यादेश काढून त्याचे नियंत्रण केंद्र सरकारकडे सोपवण्यात आले. जनरल झिया उल हक यांनी त्याचे नाव पाकिस्तानचा उत्तर विभाग केले. अशा तर्‍हेने हा काश्मिरचा एक भाग असल्याची नामोनिशाणी पुसून टाकण्यात आली. गिलगिट - बाल्टीस्तान मध्ये शिया आणि इस्माईली लोक बहुसंख्य आहेत. त्याचे क्षेत्रफळ जवळजवळ ३०००० चौ. मैल एवढे आहे. उर्वरित पाकव्याप्त काश्मिरमध्ये सुन्नी बहुसंख्य आहेत आणि त्याचे क्षेत्रफळ आहे सुमारे ४१०० चौ. मैल. पाकिस्तानने चीनबरोबर सीमा करार केला तेव्हा म्हणजे १९६३ मध्ये गिलगिट - बाल्टीस्तान मधलाच १८६३ चौ. मैल प्रदेश चीनला देऊन टाकला. ह्या करारामध्ये एक कलम असे आहे की काश्मिरच्या वादाचा अंतीम करार होईपर्यंत हा भाग चीनच्या ताब्यात राहील!!! (लक्षात घ्या इथे पाकिस्तान जणू कबूलच करत आहे की इथवर काश्मिरचा अंतीम - उभयपक्षी मान्य असलेला - करार झालेला नव्हता.) गंमत अशी आहे की मुळात मुझफ़्फ़रबादमधील पाकव्याप्त काश्मिरच्या सरकारकडे सार्वभौमत्व होतेच कुठे अशा प्रकारे आपल्या भागाचे हस्तांतरण मंजूर करण्याचे! ह्या संदर्भात पाकव्याप्त काश्मिरच्या न्यायालयामध्ये एक खटला दाखल करण्यात आला. इथे पाक सरकारनेही कबूल केले की मुळात गिलगिट - बाल्टीस्तान हा पाकव्याप्त काश्मिरचा एक भाग होता. न्यायालयाने हा भाग पुनश्च पाकव्याप्त काश्मिरच्या ताब्यात दिला जावा असा निर्णय दिला. ह्या निकालावरती इस्लामाबदमधील सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेल्या अपीलमध्ये निकाल डावलण्यात आला. त्यासाठी खटला करण्यामागे कायदेशीर नव्हे तर राजकीय कारणे आहेत असा दावा पाक सरकारने केला होता. सबब न्यायालयाने त्यात ढवळाढवळ करू नये असे सरकारचे म्हणणे होते. ते न्यायालयाने अन्य काही तांत्रिक बाबींचा आधार घेत मान्य केले. गिलगिट - बाल्टीस्तान प्रदेशाचे नियंत्रण केंद्र सरकारकडे गेल्यामुळे इथे नावापुरतीही लोकशाही नाही. पाकव्याप्त काश्मिरात लोकशाहीचा काही तरी मागमूस मिळेल पण गिलगिट - बाल्टीस्तान तसे होण्याला काही जागाच ठेवली गेली नाही. गिलगिट - बाल्टीस्तान मध्ये फ्रॉटीयर क्राईम्स रेग्युलेशन ह्या ब्रिटिशकालीन कायद्यानुसार राज्य चालवले जाते. हा कायदा म्हणजे एक प्रकारचा मार्शल लॉच आहे. त्याच्या तरतूदीनुसार प्रत्येक रहिवाश्याला महिन्यातून एकदा जवळच्या पोलिस स्टेशनवर हजेरी लावावी लागते. एका गावाहून दुसर्‍या गावी जायचे तर त्याची नोंद पोलिसांकडे करावी लागते.  प्रांतासाठी एक स्थानिक कौन्सिल आहे. पण हे काउन्सिल इस्लामाबादच्या तालाने चालते. प्रदेशाला एक ज्युडिशियल कमिशनर आहे. सर्व अधिकारी वर्ग इस्लामाबदचा आहे. त्यामध्ये स्थानिक जनतेला स्थान नाही. ज्युडिशियल कमिशनरच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी वरिष्ठ न्यायालय नाही. अशा परिस्थितीमध्ये येथील लोकांचे हाल कुत्रे खात नाही असे झाले आहे. कोणत्याही प्रकारची विकासाची कामे सरकारने येथे हाती घेतलेली नाहीत. १९९९ मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दुसर्‍या एका खटल्यामध्ये असा निकाल दिला की हा प्रांत विवादित असून केंद्र सरकारला स्वतःच्या ताब्यात ठेवता येणार नाही - तो स्थानिकांच्या हाती सहा महिन्यांच्या आत दिला जावा. ह्या निर्णयाला पाकिस्तान सरकारने केराची टोपली दाखवली आहे. प्रांताला घटनात्मक आणि कायदेशीर दर्जा नसल्यामुळे आणि त्याविषयात असे मूलभूत विवाद असल्यामुळे कोणतेही परकीय राष्ट्र तिथे गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत नाही. म्हणून येथील बाशा धरणाचे हाती घेतलेले काम आणि ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे खणण्यात येणारी सोन्याची खाण हे प्रकल्प अर्धवट सोडून दिले गेले आहेत. निसर्ग सौन्दर्याचे वरदान लाभलेल्या ह्या भागामध्ये पर्यटन व्यवसायही विकसित होऊ शकलेला नाही. नैसर्गिक संपत्तीचा र्‍हास आणि त्यासाठी येणारी मदत किंवा इथे आढळणारा पांढरा चित्ता दुर्मिळ होतो आहे त्याच्या जतनासाठी म्हणून जेवढी मदत येते तेवढीही मदत स्थानिक जनतेसाठी मिळू शकत नाही हे फारच मोठे दुर्दैव आहे.

चीनला बहाल करण्यात आलेल्या १८६३ चौ. मैलाच्या प्रदेशाचा वापर चीनने स्वतःच्या फायद्यासाठी उत्तम रीत्या करून घेतला आहे. पाकिस्तानी पंजाब प्रातांच्या हसन अब्दल शहरापासून ते गिलगिट - बाल्टीस्तानच्या खुंजरेब खिंडीपर्यंत हा रस्ता पसरला आहे. खिंड पार केल्यानंतर चीनची हद्द सुरु होते. अशा तर्‍हेने पाकिस्तानी पंजाब प्रांत - खैबर पख्तुन्वा - गिलगिट - बाल्टीस्तान हे प्रदेश चीनच्या शिन जि आंग उईघुर प्रदेशाला जोडले गेले आहेत. ह्याच रस्त्यामुळे पार चीनपर्यंत पाकिस्तान रस्त्याने जोडला गेला आहे. १५००० फूट उंचीवरून बांधण्यात आलेला हा रस्ता म्हणजे इंजिनियरिंग मार्व्हल म्हणून ओळखला जातो.

वरकरणी दाखवताना मालाची ने आण करण्यासाठी म्हणून रस्ता वापरला जाईल असे जाहिर करण्यात आले तरी चीन आणि पाकिस्तानने त्याचा वापर लश्करी कामांसाठी बेछूटपणे केल्याचे दिसते. १९९० नंतर चीनने M-9 आणि M-11 ही मिसाईल्स वाहून आणण्यासाठी ह्या रस्त्याचा वापर केला. समुद्र मार्गाने मिसाईल्स पाठवले तर अमेरिकेच्या निरीक्षणामधून ती सुटणार नाहीत असे गृहित धरून ही योजना केली गेली होती. पण इतके करून अमेरिकेने सॅटेलाईटमधून   ही वाहतूक नेमकी टिपल्याचे दिसते.

त्याकाळामध्ये रस्ता बांधून झाल्यानंतर पाकिस्तानमधील जमाते इस्लामी आणि तबलिघी जमात या कडव्या संघटनांचे सभासद पर्यटक बनून चीनच्या उईघुर प्रांतामध्ये जाऊ लागले. तिथे जाऊन ते शिन जियांग हा प्रांत चीनपासून तोडून त्याचे स्वतंत्र राष्ट्र  म्हणून घोषित करण्यासाठी तेथील मुस्लिम जनतेला जिहादमध्ये भरती करू लागले. हे लक्षात येताच चीनने पाकिस्तान्यांना व्हिसा देणेच बंद केले. ह्या उद्योगामुळे बेनझीर भुत्तो पंतप्रधानपदी असताना १९९३ ते १९९७ दरम्यान चीनने काराकोरम रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे प्रलंबित केली. पुढे १९९९ अध्ये जनरल मुशर्रफ यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर ते उत्तर कोरियाशी बोलणी करून पाकिस्तानच्या हद्दीमधल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कोरियन इंजिनियर्सनी करावे म्हणून प्रयत्नशील होते. या संदर्भात कोरियन इंजिनियर्स तिथे २००१ साली आले देखील होते. यानंतर मुशर्रफ यांनी चीनचे पंतप्रधान झु रोंगजी पाकिस्तान भेटीसाठी आले असता कोरियन मिसाईल्स व इतर युद्धसामग्री पाकिस्तानपर्यंत आणण्यासाठी चीनने परवानगी द्यावी म्हणून बोलणी केली. कोरियाची येमेन येथे समुद्रमार्गे पाठवण्यात येणारी मिसाईल्स अमेरिकन नेव्हीने अडवली होती. चीनने तशी परवानगी दिल्यानंतर ही वाहतूकही सुरु झाली आणि पाकिस्तानला येमेनसारखी अडचण आली नाही. मुख्य म्हणजे कोरियाच्या अणूप्रकल्पासाठी युरेनियम समृद्ध करण्याचे तंत्रज्ञान पाकिस्तानकडून जायचे होते. ती सामग्री पाकिस्तानने कोरियामध्ये ह्याच रस्त्याचा वापर करून पाठवली. ही बाब चीनच्या टेहळणीमधून सुटणे शक्य नाही. आपल्याला काहीच माहिती नाही असा बहाणा चीन करत असले तरी त्याच्यावर कोणाचा विश्वास नाही. २००१ च्या कारगिल युद्धप्रसंगी भारताने आपले सैन्य सीमेलगत तैनात केले तेव्हाही कोरियाने अत्यंत चपळाईने पाकिस्तानच्या मदतीसाठी आपली मिसाईल्स - त्याचे सुटे भाग आणि अन्य लश्करी सामग्री ह्याच रस्त्याचा वापरकरून पोचवली होती.

१९७९ नंतर पाकिस्तानमध्ये आलेल्या जिहादच्या लाटेचा ह्या प्रदेशावर काय परिणाम झाला ते पुढील भागामध्ये पाहू.

Friday, 12 May 2017

ओबोर सिपेक चे रहस्य भाग 4

ओबोर सिपेक चे रहस्य भाग 4

Beijing General Qamar Bajwa Meeting With Chinese Foreign Minister General

ह्याच पार्श्वभूमीवरती सिपेकच्या निमित्ताने नेमका काय करार झाला आहे आणि पाकिस्तानी सैन्याने तो गुलदस्तात ठेवण्याचे काय प्रयोजन असावे हे प्रश्न उपस्थित होतात. मला भेटलेले डावे इतके आश्वस्त का होते ह्याचे कोडे सुटायला फार वेळ लागला नाही. पाकिस्तानी सैन्याकडे लपवण्यासारखे काही आहे ह्याचाच अर्थ पाकिस्तानी जनतेच्या स्वाभिमानाला धक्का लागेल अशा अटी ह्या करारामध्ये मान्य करण्यात आल्या असाव्यात अशी शंका घेण्यास वाव उरतो. इथे एक गोष्ट स्पष्ट होत आहे की चीन दिवसेंदिवस पाकिस्तान हा जणू शिन्ज्यांग प्रमाणे आपलाच एक प्रांत असल्याप्रमाणे वर्तन करत आहे. आपले सार्वभौमत्व चीनच्या चरणी वाहण्याचे धोकादायक काम स्वतःला देशप्रेमी म्हणून डंका पिटणाऱ्या पाकिस्तानी जनरल्सनीच केले आहे हे उघड आहे. 

भारतीय उपखंडाविषयक आणि खास करून पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तान विषयक निर्णय पाकिस्तानचे देशहित बघून होताना दिसत नाहीत. ते चीनच्या काय हिताचे आहे हे बघून घेतले जात आहेत. एकविसाव्या शतकामध्ये जर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था - अंतर्गत राजकीय हालचाली - परराष्ट्र धोरण - सुरक्षा आणि संरक्षण ह्या बाबतचे निर्णय जर स्वतःच्या देशाचे हित लक्षात न घेता शेजारी देशाच्या इच्छेप्रमाणे त्याच्या सोयीने त्याच्या हिताच्या दृष्टीने घेण्यासाठी त्याच देशाचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व उतावीळ असेल तर अशा देशाने आपल्या शेजारी देशाचे मांडलिकत्व स्वीकारले असे म्हणायला हरकत नाही. असा छोटा देश हा त्या मोठ्या शेजाऱ्याची वसाहत असल्याप्रमाणे वापरला जाऊ शकतो. आणि हाच भारतीय सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका आहे. 

पाकिस्तान नेहमीच अशी शेखी मिरवत असतो की आपण एक अण्वस्त्रधारी देश आहोत - जगाच्या राजकारणामध्ये आपल्याला अनन्यसाधारण असे स्थान आहे - खास करून भारत हा आकाराने मोठा असला तरी आपले स्ट्रॅटेजिक महत्व त्याच्यापेक्षा यत्किंचितही कमी नाही किंबहुना आपण भारताच्याच इतके प्रभावशाली आहोत. सर्व जागतिक व्यासपीठांवर आपण भारताइतकेच श्रेष्ठ आहोत हे ठसवण्याचा तो सतत प्रयत्न करत असतो. आपले स्थान इतके एकमेवाद्वितीय आहे की बलाढ्य अमेरिकेलाही आपण झुकवू शकतो. ह्या वल्गनांचे चीनसमोर काय होते ते रहस्यच आहे. चीन समोर असा बलाढ्य पाकिस्तान नांगी का टाकतो हे कोडे नाही का? सर्व प्रकारची नाटके अमेरिका व पाश्चात्यांसमोर करणारा पाकिस्तान चीनसमोर मात्र नाक मुठीत धरून वागतो. इथे पाकिस्तान असे असे करतो असे म्हणण्यापेक्षा खरे तर मी असे म्हटले पाहिजे की पाकिस्तानी सैन्यावर ज्यांची जबर पकड आहे ते पंजाबी पाकिस्तानी जनरलस असे असे करतात. 

"पर्वताएव्हढी उत्तुंग आणि महासागराएव्हढी खोल" अशी आपली चीनशी दोस्ती असल्याच्या वल्गना पाकिस्तानची सेना करत असते. तिच्यामधला फोल पण दाखवून देणे अवघड नाही. किंबहुना ह्या वल्गना ह्याचसाठी केल्या जात आहेत की जेणेकरून आपल्या सैन्याच्या देशप्रेमावर जरासुद्धा शंका ना घेणारी भोळी पाकिस्तानी प्रजा अशाच गैरसमजात अखंड राहावी.  शिन जियांग प्रमाणेच पाकिस्तान हा चीन चा एक प्रांत होऊन बसला आहे हे बिंग फुटू नये ह्याची काळजी घेण्याचे काम तिथे चालू आहे. अशा प्रकारचे नियंत्रण मिळवण्यासाठी चीनने नेमक्या कोणत्या पातळीपर्यंत पाकिस्तानी सैन्यामध्ये आपले हित बघणारी मंडळी घुसवली आहेत - परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्या प्रक्रियेमधल्या कोणत्या पदांवरती त्याची पकड आहे - ही खोलात जाऊन बघण्याची बाब ठरेल. 

चीनच्या हिताची री ओढणारी ही घटनाबाह्य व्यवस्था पंजाबी पाकिस्तान्यांपुरतीच काटेकोरपणे मर्यादित का ठेवली गेली आहे हे कोडे आहे. चिन्यांचे अधिकारी येतात आणि कधी बलुची किंवा सिंधी राजकारण्यांना अथवा सैनिकी अधिकाऱ्यांना अथवा नागरी पदाधिकाऱ्यांना भेटतात असे दिसत नाही ते फक्त पंजाबी केडरलाच भेटतात. असे का बरे असावे? पाकिस्तानच्या सैन्याचे हस्तक असलेले दहशतवादी गट चीनला जवळचे का वाटतात? मौलाना मसूद अजहरला दहशतवादी ठरवण्याला चीन इतके का मुरडे घेतो? की असे इसम त्याला स्वतःचेही ऍसेट वाटतात? भारतामध्ये दहशतवादी कृत्ये घडवून आणण्यासाठी चीनलाही मसूदच्या वापर करून घ्यायचा आहे हे खरे ना?  भारताने युनोच्या सुरक्षा समितीवरती कायमस्वरूपी सभासदत्व मागितले की तसे पाकिस्तानलाही मिळाले पाहिजे असे चीन का म्हणतो? गिलगिट बाल्टिस्तान - बलुचिस्तान मध्ये जनतेचा जो छळ पाकिस्तानी सैन्य करत आहे त्यामागे चीनचे हितसंबंध जपण्याचा हेतू नाही काय? 

ही वस्तुस्थिती आपण विसरता नये की आज चीनने पाकिस्तानवरती आर्थिक - मूलभूत सोयी सुविधा - ऊर्जा - रस्तेबांधणीसारख्या क्षेत्रामध्ये आपली घट्ट पकड बसवली आहे. सिपेक ही पाकिस्तानला अंतिमरीत्या आपला मंडलिक बनवण्याची योजना असून तीच पाकिस्तानची जीवनरक्षक कशी आहे हे तेथील लोकांना 'विकण्याचे' काम तिथंही माध्यमे - फेक्युलर विद्वान करत आहेत. अशा तऱ्हेने ज्या पाकिस्तानने अमेरिकेला कधी आपला आत्मा विकला नाही तो पाकिस्तान चीनकडे आपले सर्वस्व गमावून बसला आहे हे सुस्पष्ट होत आहे. इतक्यावरच प्रकरण थांबले नसून सिपेक योजनेचे नियंत्रण नागरी आस्थापनाकडे न राहता सैन्याकडे असावे म्हणून पाकिस्तानी सैन्याचा कटाक्ष आहे. कारण सिपेकमध्ये सहभाग नसेल तर आपण पाकिस्तानमधली अंतिम शक्ती गमावून बसू हे कटू भविष्य त्याच्या डोळ्यासमोर नाचते आहे. 

ह्या परिस्थितीचा अर्थ स्पष्ट आहे. १९४७ नंतर चीनने तिबेट घशाखाली ढकलला आज तो पाकिस्तान गिळू पाहत आहे. पंजाबी नेतृत्व ऐकणारच नसेल तर पाकिस्तानचे विभाजन हे हिंदू स्वाभिमानाला सुखावणारे म्हणून नव्हे तर भारतीय उपखंडामध्ये आपल्याभोवती चीनचा विळखा अधिकच घट्ट होउ नये म्हणून करणे आता गरजेचे होत जाईल. एक तिबेट गिळंकृत केला त्याची जबर किंमत आपण आज मोजतो आहोत. चाचा नेहरूंसारखेच आजही गप्पा बसलो तर चिनी ड्रॅगन ची मगरमिठी सुटणे अधिकच अवघड होऊन बसेल. म्हणून बलुची - सिंधी - पश्तुनी जनतेच्या हिताचे आहे म्हणून नव्हे तर भारताच्याही हिताचे आहे म्हणून मोदी सरकारला काळजीपूर्वक पावले उचलायची आहेत. ते तसे उचलेल तेव्हा त्याच्या मागे जनतेची टाकत आहे हे दृश्य दिसणे गरजेचे आहे. 

दुर्दैव हे आहे की भारतामधल्या डाव्या फुरोगामी फेक्युलरांची एक वेळ चीनकडे पाकिस्तानचे  सार्वभौमत्व गेले तरी चालेल अशी मानसिकता झाली आहे. पाकिस्तान विरोधात मोदी जिंकले असे चित्र उभे राहण्यापेक्षा चीनचे स्वागत करू आणि हिंदू राष्ट्राचे स्वप्न हाणून पाडू असा घातक विचार ही मंडळी करत आहेत. त्यांचा हिंदू द्वेष - मोदी द्वेष - संघ द्वेष इतका पराकोटीचा आहे की त्यासाठी भारत चीनचा मंडलिक झाला तरी त्यांना चालणार आहे.  असलेच बुद्धिवंत विचारवंत पत्रकार फुरोगामी फेक्युलर पुढच्या काही दिवसात आपल्याला सिपेकची भुलवणारी गोड गोड माहिती सांगतील - मोदी सरकार कसे हटवादी आहे आणि टांग अडवून बसले आहे हे पटवतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सर्वात उत्तम मार्ग आहे. पण त्याचबरोबर वेळ येताच हे बिंग पाकिस्तानी जनतेसमोर आणण्याचे जे प्रयत्न होतील त्याच्यामागे शक्ती उभी करावी लागेल. पाकिस्तानी सैन्याला तेथील सामान्य जनतेने डोक्यावर घेऊ नये म्हणून त्याचे खरे स्वरूप काय ते उघड झाले तरच भारत पाक नव्हे तर उपखंडाच्या परिस्थितीमध्ये आपण बाजी पालटवून दाखवू शकू. ही क्षमता आपल्यामध्ये आहे ह्याची जाणीव जरी आज ठेवली तरी पुरेल.

ओबोर-सिपेकचे रहस्य भाग ३

ओबोर-सिपेकचे रहस्य भाग ३

Image result for obor conference beijing

पुढच्या दोन दिवसात म्हणजे १४-१५ मे रोजी बीजिंग मध्ये ओबोर च्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक जंगी संमेलन होत असून त्यासाठी १०० हुन अधिक देशांचे प्रतिनिधी बीजिंग येथे पोचण्यास सुरुवात झाली आहे. ह्यामध्ये २८ देशांचे शीर्ष नेतृत्व तर अन्य अनेक देशांमधून वरिष्ठ नेतृत्व हजर राहणार आहेत. भारत मात्र ह्यासाठी पाठवलेच तर दुय्यम पातळीवरील अधिकारी वर्गास पाठवले जातील असे संकेत आहेत. ह्या परिषदेच्या निमित्ताने ओबोरवरील अनेक प्रकारच्या माहितीचा धबधबा आपल्यावर कोसळू लागेल. प्रकल्पामधले धोके - तोटे ह्यांची वाच्यता न करता त्याच्या फायद्याचे अवास्तव कौतुक करणारे लेख इथे फेक्युलर मंडळी लिहितील. भारताच्या शेजारी देशांमधले छोटे देश चीनच्या दडपणाखाली वरिष्ठ नेतृत्व परिषदेसाठी पाठवतील यात शंका नाही. त्या पार्श्वभूमीवर भारताने - चुकले - मोदीनी पाठवलेल्या दुय्यम पातळीवरील शिष्टमंडळावर यथेच्छ टीका झालेली दिसेल. किंबहुना इतर शेजारी गेले तेव्हा तुम्ही दक्षिण आशियामध्ये एकटे पडलात - तुमच्या मैत्रीपेक्षा हे शेजारी देश चीनला जास्त महत्व देतात वगैरे वगैरे चर्वित चर्वण ऐकण्यासाठी कान तयार ठेवावेत. सीपेक - ओबोर निमित्ताने भारताचे - चुकले - मोदींचे परराष्ट्र धोरण कसे चुकले आहे ह्याचे दळणही दळले जाईल.

होई ना का सिपेक - जर पाकिस्तानच्या गरीब जनतेचे त्यामध्ये कल्याण असेल तर भारताने त्यामध्ये मोडता का घालावा असा भारतीयांच्या मृदू  हृदयाला हात घालत इथले फेक्युलर प्रश्नांची सरबत्ती करतील. म्हणूनच आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे की भारत सिपेकच्या विरोधात आहे का? आणि असलाच तर त्याची पार्श्वभूमी काय? केवळ नाव बदलून वा काही अटी ढिल्या केल्या तर भारत ह्या प्रकल्पामध्ये सामील होऊ शकतो का - त्याने तसे करावे का? जर चीनने हा प्रकल्प त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला असेल तर नाहक संघर्ष टाळण्यासाठी भारताला काय करता येईल? फेक्युलरांचे सोडा  - पण आपल्या मनाच्या समजुतीसाठी ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहिती असायला हवीत. आपल्याला पटले तर दुसऱ्याला पटवणे शक्य आहे.

मध्यंतरी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून बलुचिस्तान लढ्याला आपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर माझी काही मंडळींशी भेट झाली. इथे काही डाव्या - काही उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीही होत्या. त्यामधल्या काही डाव्यांना चीन कसा प्रबळ आहे - लष्करी आणि आर्थिक दृष्ट्या - भारत कसा त्याच्या पासंगाला पुरु शकणार नाही असे सांगताना उकळ्या फुटत होत्या. सिपेक हा प्रकल्प आणि चीनची त्याविषयामधली दृढता ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब आहे असे दिसत होते. अशा प्रकारचे करार चीन करतो तेव्हा तो करारामधल्या भूमीवर सार्वभौमत्व कसा प्रस्थापित करतो आणि यजमान देशाच्या हातातील नाड्या आपल्या हाती घेतो हे सांगतानाही त्यांना कमालीचा आनंद झालेला दिसत होता. त्यांना आनंद झाला म्हणूनच मी चिंताक्रांत झाले आणि ह्या विषयामध्ये अधिकाधिक वाचन करत गेले. त्यातून काही धक्कादायक गोष्टी समजत गेल्या.

सिपेक प्रकल्प पाकव्याप्त काश्मिरातून जात आहे. हा प्रदेश भारताचा असून पाकिस्तानने अनधिकृतरीत्या त्यावर कब्जा केला आहे. म्हणजेच भारताच्या प्रदेशामधून भारताच्या अनुमतीशिवाय पाकव्याप्त काश्मिरातून हा प्रकल्प हाती घेणे हे पाकिस्तान आणि चीनने  भारताच्या सार्वभौमत्वाला दिले आव्हान आहे असे भारत सरकार समजते हे सत्य आहे. हाच प्रकल्प पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतांमधून उभारला जाणार असून ग्वादार बंदराला जोडणारा असेल. ह्या प्रकल्पाला बलुची लोकांनी विरोध दर्शवला असून ते अनेकदा प्रकल्पाच्या कामावरती हल्ले चढवत असतात. चिन्यांनी आपल्या प्रांतांमधून गाशा गुंडाळावा अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नव्हता. पाकिस्तानने तिथे सैन्य पाठवून तो काबीज केला हा इतिहास आहे. गिळंकृत केलेल्या ह्या प्रांतातील लोकांवर पंजाबी पाकिस्तान्यांनी अनन्वित अत्याचार केले असून तिथे कायद्याचे राज्यही नाही आणि तिथे पाकिस्तानी सैन्याद्वारे मानवाधिकारांची सतत पायमल्ली केली जाते.  ह्याच पार्श्वभूमीमुळे मोदी सरकारने बलुचिनच्या स्वातंत्र्यलढ्याला आपली सहानुभूती असल्याचे विधान लाल किल्ल्यावरील भाषणांमधून केले होते. पाकव्याप्त काश्मिरातून जाणारा प्रकल्प आणि बलुच लढ्याला पाठिंबा ह्या दोन कारणांवरून भारत सिपेक ला विरोध करत आहे असे चित्र आजवर आपल्यासमोर उभे आहे. पण खरोखरच हीच दोन कारणे आहेत का ज्यामुळे सिपेकच्या बाबतीत भारत सरकार चिंतित आहे - अन्य कारणे आहेत का आणि ती नेमकी काय आहेत ह्याचा शोध महत्वाचा ठरतो.

पाकिस्तानमध्ये परराष्ट्र धोरण त्याचे सैन्य ठरवते - तेथील नागरी राजकीय नेतृत्वाला त्यामध्ये काही स्थान नाही हे आपण अनेक वर्षे वाचत आलो आहोत. पाकिस्तानचे सैनिकी नेतृत्व बिलंदर आहे - स्मार्ट अमेरिकेनाना ते हातोहात उल्लू बनवतात - त्यांच्याकडून पैसे तर उकळतात पण कबूल केलेल्या कुठल्याच गोष्टी पूर्णत्वाला नेत नाहीत - आणि इतके करूनही अमेरिकेच्या नाराजीतून रोषातून आपली सहीसलामत सुटका करून घेतात हा आपला अनुभव आहे. असे हे बिलंदर सैन्य कोणालाच जुमानत नाही आणि त्याने देशाच्या महत्वाच्या निर्णयांच्या किल्ल्या आपल्या हाती राखून ठेवल्या आहेत असाच माझाही तुमच्यासारखा समज होता. सिपेक संदर्भाने जितके वाचत गेले तेव्हा लक्षात आले की वस्तुस्थिती आता बदलली आहे आणि त्याची फारशी दाखल भारतीय माध्यमांनी घेतलेली नाही.

भारतीय उपखंडापुरता विचार केला तर असे दिसते की पाकिस्तानचे सर्व निर्णय चिनी नेतृत्व घेत आहे. आणीबाणीची परिस्थिती आलीच तर पाकिस्तानी नेतृत्व प्रथम चीनला पळते आणि त्यांचे विचार काय आहेत हे जाणूनच पुढचे पाऊल टाकते. ही परिस्थिती काही आजची नाही. तुम्हाला आठवत असेल की कारगिल युद्धाच्या आधी आपण हल्ला करणार ही बाब पाकिस्तानी सैन्याने चीनशी चर्चा करून ठरवली होती. लाल मशिदीमध्ये ठाण मांडून बसलेल्या मुल्लाने जेव्हा चिनी इंजीनियर्सवर हल्ले केले तेव्हा चीनने दमात घेतल्यावर लाल मशिदीवर पाकिस्तानी सैन्याने कारवाई केली आणि संबंधित मुल्लाला ताब्यात घेतले. पाकिस्तानचा अणूकार्यक्रम सर्वस्वी चीनवर अवलंबून आहे. पाकिस्तानी लष्कराकडे जी हत्यारे - शस्त्रे अस्त्रे आहेत त्यातली अधिकाधिक चिनी बनावटीची आहेत. आज एखाद्या पाकिस्तानी जनरलने चीनकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या देशातून शस्त्रास्त्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर चीन पाकिस्तानी भांडारात असलेला शस्त्रसाठा निकामीही करू शकतो. अशा तऱ्हेने पाकिस्तानी सैन्याचे हात पिरगळणे चीनला अजिबात कठीण नाही. चिनी ड्रॅगनच्या जबड्यात स्वेच्छेने पाकिस्तानने आपली मान दिली आहे आणि चीन त्याची पुरती किंमत वसूल करणार यात शंका नाही.

म्हणूनच ह्या गोष्टीचा भेदक विचार पुढच्या भागामध्ये करू.

Thursday, 11 May 2017

ओबॉर - सीपेकचे रहस्य भाग 2

ओबॉर - सीपेकचे रहस्य भाग 2

सूचना - हा विषय प्रवाही आहे. इथे दिलेल्या परिस्थितीमध्ये कधीही कोणत्याही पक्षाकडून लहान मोठा बदल होउ शकतो. कृपा करून नेट वर उपलब्ध असलेल्या एखादा दुसऱ्या लेखाच्या अनुषंगाने मतप्रदर्शन होउ नये. मोदी सरकार निष्क्रिय आणि नालायक - षंढ असल्याचा निर्णय आधी मनाशी घेऊन त्याला साजेसे युक्तिवाद इथे केले जाऊ नयेत. त्यासाठी भरभक्कम आधार दिला जावा. फेक्युलर विचारवंतांची साक्ष न काढता निःपक्षपाती तज्ज्ञांचा आधार केव्हाही चांगला. धन्यवाद. 

सीपेक हा प्रकल्प असा आहे की जणू पाकिस्तानातल्या घराघरावर सोन्याची कौले चढतील अशी वर्णने पाकिस्तानच्या सोशल मीडिया मध्ये वाचायला मिळतात आणि पाकिस्तानी वर्तमानपत्रेही अशीच रसभारित वर्णने छापत आहेत. एक प्रकारे हे पाकिस्तानच्या राजकारण्यांच्या आणि सैन्याच्या धोरणाला अनुकूल असल्यामुळे ते देखील हा समज दृढ होण्याला हातभार लावत आहेत. पण काही विचारवंत पत्रकार उद्योगपती मात्र असे हुरळून जाणारे नाहीत.  अशा लोकानी सीपेकवर खोलवर प्रश्न विचारायला सुरूवात केली आहे. 

10 मार्च 2017 रोजी एशिया टाईम्स मध्ये लिहिलेल्या लेखात पाकिस्तानी पत्रकार सलमान रफी म्हणतात - "सीपेकचे गूढ वाढत चालले आहे.  त्यामध्ये पाकिस्तानचे हित कुठे दिसत नाही. पाकिस्तानसाठी "बाजी पालटणारा" प्रकल्प म्हणून याची गणना होत होती पण त्याला पुरावा काहीच नाही. ह्या प्रकल्पामुळे इथे चीनचे वर्चस्व मात्र वाजवीपेक्षा जास्त वाढेल याची चिन्हे आहेत." मुख्य म्हणजे जनतेच्या शंकाना उत्तरे देणारे कोणी नाही. गेल्या वर्षी पाकिस्तानचे नियोजन आणि विकास मंत्री एहसान इकबाल यानी सिनेटला  सांगितले की कराराची प्रत सिनेट अध्यक्ष यांच्याकडे ठेवली आहे. ज्याना ती बघायची असेल त्यानी अध्यक्षांच्या चेंबरमध्ये ती पाहावी. जी प्रत ठेवली आहे ती देखील कच्चा मसुदा आहे. त्यामध्ये बदल केले जातील. म्हणजेच नेमका काय करार केला जात आहे ह्याची माहिती सिनेटच्या सभासदानाही नाही. मग इतरांची काय कथा? प्रश्न असा मनात येतो की पाकिस्तानचे नंदनवन करायची क्षमता असलेल्या ह्या प्रकल्पाची साधी प्रत सिनेट सभासदाना का उपलब्ध असू नये? गुप्ततेच्या वातावरणामुळे लोकांना  प्रकल्प गूढ तर वाटणारच. शिवाय त्या संदर्भात केले जाणारे दावे कितपत खरे आहेत असेही वाटणे स्वाभाविक आहे. म्हणजेच हा प्रकल्प केवळ आर्थिक प्रगतीशी निगडीत असता तर ते दृश्य दिसलेच नसते - प्रकल्पाच्या साऱ्या बाबी सार्वजनिक जीवनात खुल्या झाल्या असत्या.  प्रत्यक्षात मात्र तसे नसून त्यामागे अन्य बाबी असाव्यात आणि त्याची वाच्यता बाहेर होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची भावना आहे.  जर हा प्रकल्प केवळ आर्थिक क्षेत्रामधला असता तर आपल्या कराचा पैसा कुठे कसा खर्च होतो ते जाणण्याचा अधिकार पाकिस्तानी जनतेला आहे पण ह्याविषयी काहीही माहिती मिळणे दूरापास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये चिनी सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य संगनमत करून आपल्या माथी हा करार मारत आहेत असा सर्वसाधारण समज होत चालला आहे. अर्थातच ही बाब लोकांच्या हिताची नसावी.

सिपेकसाठी आपण 46०० कोटी डॉलर्स खर्च करणार आहोत असे चीन सांगतो. हा खर्च आता ५६०० कोटी डॉलर्स झाला आहे. या खेरीज पाकिस्तानने देखील आपला काही खर्चाचा वाटा उचलायचा आहे. रस्त्याला संरक्षण देणे ही पाकिस्तानची जबाबदारी असेल. म्हणून पाकिस्तानने नवे १५००० सुरक्षा सैनिक भरती करण्याचा निर्णय घेतला. ह्याचा खर्च देण्याचे चीनने नाकारले आहे. संरक्षण ही तुमची जबाबदारी आहे असे सांगून ह्या खर्चामधला हिस्सा देण्यास चीनने नकार दिला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोडण्यात येणाऱ्या जमिनीच्या पट्ट्यांमध्ये केवळ चिनी कंपन्या काम करू शकतील - इतराना तिचे प्रवेश नाही अशी अट आहे. ह्या कंपन्यांमध्ये लागणारे बव्हंशी कामगार चीन स्वतःच्या देशामधून आणणार आहे. ती संधी पाकिस्तानी नागरिकांना मिळणार नाही असा स्पष्ट उल्लेख करारामध्ये केला गेला आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही संदिग्धता नाही. कंपन्यांना लागणारी यंत्रसामग्री फक्त चीन मधून आयात केली जाईल. कारखान्यांसाठी लागणारी वीज स्वतः चिनी कंपन्या बनवतील. त्यामधली शिल्लक वीज पाकिस्तानी जनतेला देण्यात येईल परंतु ह्या विजेचे भाव आजच्यापॆक्षा जास्त असतील. नेमके किती ते मात्र कोणीच सांगत नाही. 

कॉरिडॉरसाठी रेल्वे चीन स्वतः बांधेल. ग्वादर बंदर आणि ही रेल्वे यांच्या देखभालीसाठी ज्या चिनी कंपन्या पाकिस्तान मध्ये येतील त्यांना २३ वर्षांसाठी करामधून सूट देण्यात येणार आहे. अर्थातच पाकिस्तानचा होणारा खर्च भरून निघण्याच्या फारशा वाटा नाहीत त्यामुळे पाकिस्तानी सरकारने १% सरचार्ज घरगुती वीज ग्राहकांवर लावला असून त्यामधून हा खर्च उभारला जाईल असे दिसते. अन्य खर्चासाठी चीन आपल्याच बॅंकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देते. पण चिनी बँकांच्या कर्जाचे व्याजदर आय एम एफ यांच्या दरांपेक्षा चढ्या भावाचे असतील. ते तसे परवडणारे नाहीत. ह्यालाच DEBT TRAP किंवा कर्जाचा सापळा म्हणतात. म्हणजे व्याजाची रक्कमच इतकी जास्त होत जाते की मूळ भांडवल आणि व्याज दोन्ही फेडणे कठीण होऊन जाते. सरते शेवटी कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढत गेला की चीन सांगेल त्या अटीवर - अगदी जमिनीच्या सार्वभौमत्वावरही मंडलिक देशांनाही समाधान मानून घ्यावे लागेल कारण त्यावेळी त्या सापळ्यामधून सोडवायला कोणी पुढे येऊ शकणार नाही. (पहा उदाहरण ग्रीस अथवा स्पेनचे - घेतलेले कर्ज फेडता येत नाही आणि युरोपियन युनियनच्या अटी मानायच्या  तर देशात हाःहाःकार उडतो आहे. पण त्या विनाशकारक अटी पाळण्यावाचून गत्यंतर नाही.) अशी भीषण परिस्थिती जेव्हा येते तेव्हा कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याची जमीन कब्जा करणारा सावकार आणि अवाच्या सव्वा दराने कर्ज देणारा चीन यांच्यामध्ये काही फरक राहणार नाही. 

ह्या प्रकल्पामधून पाकिस्तानमध्ये कोणतेही परकीय भांडवल येणार नाही. उलट पुढील ३० वर्षात मिळून पाकिस्तानलाच चीनचे ९००० (5600 च्या बदल्यात) कोटी डॉलर्स परत करावे लागणार आहेत. दर वर्षी ३७० कोटी डॉलर्सची परतफेड अंगावर पडणार आहे. पाकिस्तानच्या खजिन्यात परकीय गंगाजळीचा खडखडाट आहे. तेव्हा कर्जफेड होणार कुठून असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीमध्ये चीन सरकारकडे कॉरिडॉरच्या जमिनीचे सार्वभौमत्वच जाणार हे उघड आहे. शिवाय ग्वादर बंदराचा वापर चीन हळूहळू स्वतःचा तळ म्हणून करू लागणार आहे हे उघड आहे. आणि चीनसाठी ज्या वस्तू महत्वाच्या आहेत त्या वस्तूंच्या आयात निर्यातीसाठी  ते बंदर वापरले जाऊ लागेल आणि त्याला पाकिस्तान हरकतही घेऊ शकणार नाही. 

इतक्या महत्वाचा हा प्रकल्प असल्यामुळे चीन भारताच्या भूमिकेमुळे अस्वस्थ आहे. भारत बाजूला राहिला तर हा प्रकल्प खऱ्या अर्थाने उभा राहणार नाही हे चीनला कळते म्हणून आपणही भारत पाकिस्तानात काश्मीर ह्या विषयावर मध्यस्थी करायला तयार आहोत असे तो मधूनच म्हणतो. पण हा व्दिपक्षी मामला असून त्यामध्ये भारताने अन्य कोणत्याही पार्टी ला आजवर चंचू प्रवेश करू दिलेला नाही आणि यापुढेही करू देणार नाही हे निश्चित.

थोडक्यात काय तर परिस्थिती अशी आहे की OBOR ह्या प्रकल्पाच्या यशामागे शी जीन पिंग यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आणि सिपेक म्हणजे प्रकल्पाचा शिरोमणी आहे. तेव्हा सिपेक शिवाय अधुरे आहे आणि शिवाय शी जीन पिंग यांनी जीव जरी ओतला तरी प्रकल्पाची एकंदर अवस्था बघता खुद्द चीनमधल्या बँकाच यामध्ये राजकीय तोडगा निघेपर्यंत त्यामध्ये जास्त गुंतवणूक करू नये असे मत बोलून दाखवत आहेत. चीनमध्ये अन्य चिन्हेही आर्थिक संकटाची नांदी देत असल्यामुळे आर्थिक कारणासाठी हा प्रकल्प सोडावा लागला असे दिसणे म्हणजे चीनच्या प्रतिमेला तडा जाण्यासारखे होईल 

दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की चीन अशी नामुशकी टाळायचा प्रयत्न करेल. त्याचे विस्तारवादाचे धोरण यशस्वी करायचे तर सर्व आशा ह्याच प्रकल्पाशी निगडित आहेत म्हणून चीन टोकाची भूमिका यावर घेऊ शकतो. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मिरातून जाणाऱ्या रस्त्याला भारत कधीच सहमती देऊ शकणार नाही. रशिया जरी चीनच्या बाजूने उभा राहू म्हणाला तरी अमेरिकेला सुद्धा इथे दोर ढील सोडता येणार नाही. म्हणूनच मला वाटते की युद्धाचे बीज इथे पेरले गेले आहे आणि अशी युद्धसमान परिस्थिती आपल्या परसदारात निर्माण झाली आहे. जिथे एकाच महासत्तेचे लक्ष वळते तिथे युद्ध सुरु होते इथे तर तीन तीन महासत्ता आपला डाव साधण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत. म्हणून हाती काय आहे ह्याचा विचार करून प्रत्येक पाऊल उचलणे गरजेचे आहे आणि सध्याचे  सरकार ते करत आहे ही बाब चांगली आहे. भारतानेही ह्या प्रकल्पामध्ये सामील व्हावे आणि आपला विकास साधावा असा शहाजोगपणाचा सल्ला देणारे विद्वान आपल्याला लवकरच बघायला मिळतील. प्रकल्पाचे नाव CPEC असे न करता आम्ही CIABEK असे करायला तयार आहोत असे चीनचे प्रतिनिधी मंडळ सांगते. पण ह्या विषयामधला अंतिम निर्णय सूज्ञ मोदी सरकारवर सोडणे उत्तम. 


Wednesday, 10 May 2017

ओबॉर - सीपेकचे रहस्य भाग १

Image result for cpec



ओबॉर - सीपेकचे रहस्य भाग १

आजपर्यंत हे दोन शब्द आपण अनेकदा ऐकले आहेत. त्याबद्दलचे संदर्भ वाचनामध्ये येतात. आणि आपण जितके वाचत जातो तितके अधिकाधिक प्रश्न मनामध्ये येत राहतात. ओबॉर म्हणजे काय - सीपेक आणि ओबॉर वेगळे आहेत काय - चीनला ह्या दोन प्रकल्पांमध्ये इतका रस का आहे - १००००० कोटी डॉलर्स एव्हढी अवाढव्य रक्कम चीन ह्या पर्कल्पामध्ये का ओतू पाहत आहे - ओऑर वा सीपेक जर का आर्थिक उन्नतीसाठी असेल तर भारत मात्र त्याला विरोध का करतो - भारत एकच देश आहे का जो ह्या संकल्पनांच्या विरोधात आहे असे विविध प्रश्न समोर येत राहतात. म्हणून प्रथम एका दृष्टिक्षेपामध्ये हा प्रकल्प काय आहे त्याची कल्पन यावी म्हणून काही माहिती बघू या. 

इतिहास काळामध्ये चीन देशामध्ये तयार होणार्‍या रेशीम आणि तत्सम वस्तूंचा व्यापार जगामधल्या अनेक भागांपर्यंत पोहोचला होता. चिनी वस्तूंना मागणी होती. ह्या व्यापारामधून चीनला भरभराटीचे दिवस बघायला मिळाले होते. ज्या मार्गाने मालाची ने आण त्या काळामध्ये केली जात असे त्याला सिल्क रूट असे नाव रूढ झाले. मराठी मुलांना हाच खुष्कीचा मार्ग म्हणून माहिती आहे. इतिहासामध्ये खुष्कीचा मार्ग केवळ चिनी वस्तूंच्या व्यापारासाठी वापरला जात नव्हता तर भारतीय वस्तूंची बाजारपेठही ह्याच मार्गाचा वापर करून मोठी झाली होती. वस्तूंच्या व्यापाराबरोबरच सांस्कृतिक देवाण घेवाण होत होती. आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या मार्गावरती लुटारूंनी माल लुटून नेऊ नये आणि व्यापार्‍यांना निर्वेधपणे व्यापार करता यावा म्हणून तत्कालीन राजे महाराजे संरक्षण उपलब्ध करून देत असत. गेल्या काही वर्षांमध्ये नेत्रदीपक आर्थिक प्रगती करणार्‍या चीनला आता पुनश्च हा मार्ग पुनरुज्जीवित करण्याचा ध्यास लागला आहे. बदलत्या काळानुसार आज हा मार्ग केवळ व्यापारासाठी वापरण्याचे मनसुबे चीन करत नसून त्याच्या योगाने प्रत्यक्षामध्ये मार्ग ज्या ज्या देशांमधून जाईल तिथे तिथे चीनचे केवळ आर्थिक नव्हे तर राजकीय साम्राज्य असावे - हे देश म्हणजे एक प्रकारे चीनच्या ’वसाहती’ व्हाव्यात अशा पद्धतीची विचारसरणी राबवायची योजना आखली जात आहे. 

ओबॉर म्हणजे चीनच्या पूर्वेकडील प्रांतांपासून ते युरोपापर्यंत बांधण्यात येणारा जमिनीवरून जाणारा मार्ग - रेल्वे. ओबॉरचा एक फाटा म्हणजे सीपेक - चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्यामध्ये चीनच्या पश्चिम सीमेनजिकचे शहर काशगर पासून ग्वदर बंदरापर्यंत बांधण्यात येणारा २७०० किमी लांबीचा रस्ता. ओबॉर आणि सीपेक मिळून चीनची भूमी युरोप - मध्य पूर्व आणि आफ्रिकेपर्यंत जोडण्याची ही महत्वाकांक्षी योजना आज जन्मली नाही. १९९० पासून क्रमाक्रमाने त्याच्यामध्ये प्रगती होत राहिली. शी जिन् पिंग २०१३ मध्ये सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी त्याला स्पष्ट आणि मूर्त रूप देण्यामागे आपली राजकीय शक्ती उभी केली आहे. 

सीपेक ह्या नावामध्येच स्पष्ट होते की चीनच्या दृष्टीने हा चीन आणि पाकिस्तानला जोडणारा रस्ता आहे. हा मार्ग ज्या भूमीवरून जायचा आहे तो पाकव्याप्त काश्मिर हा अवैधपणे पाकिस्तानने आपल्या ताब्यामध्ये घेतला असून भारताने ह्या पाकिस्तानी कृत्याच्या वैधतेवर कधीही शिकामोर्तब केलेले नाही. पाकव्याप्त काश्मिरामधली जनता पाकिस्तानी राजवटीला कंटाळली आहे. शिवाय पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामधून हा मार्ग जायचा असून तेथील जनतेने तर स्वातंत्र्याचे बंडच पुकारले आहे. बलुची स्वातंत्र्य योद्धे आजही ह्या प्रकल्पाच्या कामावरील चिन्यांवर सशस्त्र हल्ले चढवत असतात. १५००० सैनिकांची फ़ौज उभी करून सुद्धा पाकिस्तान ह्या मार्गाला सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती तोंडाने मान्य केली नाही तरी मनाने चीनने ते सत्य स्वीकारले आहे. भारत ह्या प्रकल्पामध्ये सहभागी झाल्याशिवाय त्याच्या स्थैर्यावरती कायमचे प्रश्नचिन्ह राहील आणि ज्या प्रमाणामध्ये गुंतवणून करायची आहे त्या प्रमाणामध्ये त्यावर हाती काय लागणार हे स्पष्ट होत नाही. म्हणूनच हवे तर त्याचे नाव आपण बदलू पण तुम्ही मात्र सामिल व्हा ह्यामध्ये असा लकडा चीनने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून म्हणजे गोव्यामधील ब्रिक्स भेटीनंतर लावला आहे. ह्या विषयावर भारत चीन यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या असून चीनने त्याकरिता शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. 

चीनच्या विषयी मी माझ्या आधीच्या लेखांमध्ये सविस्तर लिहिले आहे. ज्या बेजाबाबदारपणे चीन आजवर वागत आला आहे ते पाहता त्याच्या प्रामाणिकपणावरती कायम प्रश्नचिन्हच उठत राहणार हे स्पष्ट आहे. साहजिकच पाकिस्तानी आय एस आयने असे चित्र आज उभे केले आहे की पाकिस्तानच्या आर्थिक उन्नतीसाठी चीन ४६०० कोटी डॉलर्स एव्हढी प्रचंड रक्कम खर्च करायला तयार आहे - ह्यामधून आधुनिक पाकिस्तानच्या उदयाला प्रारंभ होऊ शकतो आणि ह्या स्वर्णिम स्वप्नामध्ये मोडता घालायचे काम भारत करत असून त्याला पाकिस्तानची भरभराट बघवत नाही. म्हणूनच आय एस आयने उभे केलेले हे चित्र आणि वस्तुस्थिती यामधले अंतर काय आहे त्याचा भाग २ मध्ये विचार करू या. 

Saturday, 6 May 2017

माकडाची शेपूट पाचरीत - भाग २

File:Iran Ethnic.jpg


माकडाची शेपूट पाचरीत - भाग २

शिया सुन्नी वाद - शिया आपली भूमी हिरावून घेतील ही सुन्नी राज्यकर्त्यांना असलेली भीती ह्याच केवळ दोन गोष्टी सौदी - इराण वैराच्या मागे आहेत का? ह्याचे उत्तर अर्थातच नाही असे द्यावे लागते. जसे कुवेट सद्दामच्या हाती गेले तर जगामधला सर्वाधिक पेट्रोल साठ्यावर सद्दामचा कब्जा असेल आपला नव्हे हीही रास्त भीती सौदी अरेबियाच्या राजाच्या मनामध्ये होती हे सत्य आहे. म्हणजे एक तर राजकीय सत्ताच सद्दामच्या हाती जाईल आणि तसे नाहीच करता आले तर सर्वाधिक पेट्रोलच्या साठ्याचा कब्जेदार म्हणून सद्दाम सौदीला आणि पर्यायाने अमेरिकेलाही शह देऊ शकला असता. म्हणूनच त्याची नांगी मोडण्यात आली. 

आज इराणही अशाच परिस्थितीमध्ये दिसतो. आणि त्याचे मुख्य कारण आहे ते चाबहार बंदर. चाबहार बंदर बांधण्यासाठी इराणने भारताला कंत्राट दिले आहे. ह्या बंदराचे महत्व अनन्यसाधारण आहे. एक तर ते आखाताच्या मुखावरती बसले आहे. इथे बसून आखातामधून होणार्‍या मालाच्या ने-आणीवरती टेहळणी करणे अगदीच सोपे होऊन जाते. आखाताच्या मुखावरती समुद्र अगदीच चिंचोळा आहे. कधी काळी संघर्ष झालाच तर इराण इथून जाणार्‍या कोणत्याही जहाजाला सहज अटकाव करू शकेल. इराणसारख्या शत्रूच्या हातामध्ये आपला तेल व्यापार आहे ही बाब सौदीच्या राजाला खटकत असेल उघड आहे. तेल व्यापारावरती आपले नियंत्रण नाही म्हणजे शत्रूच्या हातामध्ये देशाच्या नाड्या देण्यासारखे आहे असे कोणालाही वाटेल. चाबहार बंदर झाले तर भारत इराणकडून अधिक पेट्रोल घेईल आणि आपला हिस्सा कमी होईल हीही भीती आहे. मालाच्या वाहतूकीची उत्तम व्यवस्था असेल तर इराणमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भांडवलदार पुढे येतील ही अशीच एक मोठी भीती. मागे मी सौदी अरेबियावर लिहिलेल्या लेखामध्ये म्हटले होते की केवळ पेट्रोलवर अवलंबून न राहता अन्य मार्गाने उत्पन्न वाढवण्यासाठी सौदी प्रयत्न करत आहे. परकीय भांडवलाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वीज - पाणी - रस्ते वाहतूक - रेल्वे - पोलाद - सिमेंट असे इन्फ्रास्ट्रक्चर् उभे करावे लागते. सौदी त्या कामी आज लागला आहे. अशा वेळी त्याच भूभागामध्ये अधिक चांगल्या सुखसोयी इराण देऊ शकला तर भांडवलदार त्याच्याकडे झुकतील् आणि आपण मागे पडू हे सौदीला कळते. व्यापर उदीम वाढला तर सरकारचे उत्पन्न देखील वाढते. अशा प्रकारे आखाती देशांमध्ये इराण ही एक दुर्लक्ष न करण्यासारखी महाशक्ती बनेल ह्या भीतीने सौदीला ग्रासले आहे. 

ह्या बेचैनीवरती सौदी अरेबियामधले काही थिंक टॅंक विचारपूर्वक योजना बनवत असतात. अरेबियन गल्फ सेंटर फ़ॉर इरानियन स्टडीज ही अशीच एक थिंक टॅंक आहे. ह्या संस्थेसाठी इराणविषयक राजकीय बाबींवर संशोधन करणारे विश्लेषक महम्मद हसन हुसेनबूर यांनी एक शोध निबंध लिहिला होता. त्यामध्ये हुसेनबूर म्हणतात की इराणला खच्ची करायचे तर त्या देशामधले ’एथ्निक’ संघर्ष पेटवावे लागतील. इराणमध्ये अझरबैजानी - कुर्द - अरबी - फारसी जमाती जशा आहेत तशीच बलुची जमातही आहे्. खरे तर विशाल बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानखेरीज इराणच्या सिस्तन प्रांताचाही काही भाग येतो. अशा बलुचींना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सौदीला प्रयत्न करता येतील असे हुसेनबूर म्हणतात. इतिहास काळामध्ये देखील पर्शियाच्या वर्चस्वाला झुगारून देण्यासाठी बलुच आणि अरब एकत्र आले होते असे हुसेनबूर म्हणतात. आताही निदान कमी प्रमाणावर का होईना ह्या उठावाला सौदीने मदत करावी असे प्रतिपादन करण्यात आले आहे. चाबहार बंदर आणि आसपासचे बलुच जर इराणच्या विरोधात उठले तर इतकी मोठी सीमा रक्षण्यासाठी इराणला आपली सर्व ताकत खर्ची घालावी लागेल. हुसेनबूर यांच्या प्रतिपादनानुसार पाकिस्तानच्या बलुचींमध्ये अत्याचारांमुळे आणि दडपशाहीमुळे जितका असंतोष आहे तसा असंतोष इराणमधील बलुचींमध्ये नाही पण परकीय शक्ती असले उठाव घडवून आणू शकतात. परंतु तसे करायचे तर यासाठी पाकिस्तानला राजी करावे लागेल याची सौदीला जाणीव आहे. बलुची स्वातंत्र्याला पाठिंबा म्हणजे पाकिस्तानच्या विभाजनचीच तयारी असे साधे समीकरण आहे आणि ते कोणत्या तोंडाने पाकिस्तान सहन करू शकेल? असा हा धोबी पछाड आहे. ज्या सौदीच्या मदतीला जाण्याची पाकिस्तानवर मजबूरी आहे तोच सौदी त्याच्या विभाजनाची कारस्थाने रचत आहे!  

ह्याच विषयावरती अमेरिकन आणि ब्रिटनचे हितसंबंध काय आहेत हे विषद करणारे दोन लेख मी काही महिन्यांपूर्वी लिहिले होते. त्यामध्ये पाकिस्तान विघटनाची अमेरिकन योजना काय होती आणि २००५ नंतरच्या काळामध्ये ती राबवण्याचे काय प्रयत्न करण्यात आले यावर मी सविस्तर लिहिले आहे. (भाग १ - लिंक http://swatidurbin.blogspot.in/2017/02/2005.html भाग २ - लिंक http://swatidurbin.blogspot.in/2017/02/blog-post_45.html) त्याच धर्तीवर पुनश्च अमेरिकेमध्ये प्रयत्न चालू आहेत काय अशी शंका येत आहे. ट्रम्प प्रशासनाशी उत्तम संबंध असलेल्या वॉशिंग्टन डीसी मधील हडसन इन्स्टिट्यूट ह्या थिंक टॅंकने ’एथ्निक’ पायावर इराणचे विघटन हा मुद्दा पुनश्च लावून धरल्याचे दिसते. ह्या संस्थेने ह्या महिन्याच्या शेवटी एक सेमिनार आयोजित केला असून त्यामध्ये बोलण्यासाठी इराणी बलुच - अझरबैजानी - कुर्द - अरबी असे वक्ते निमंत्रित करण्यात आले आहेत. कोणत्या थिंक टॅंकने सेमिनार आयोजित केला म्हणून देशाचे धोरण बदलते का असे आपल्याला वाटेल. पण एखाद्या देशाचे धोरण प्रत्यक्षात बदलण्यापूर्वी काय प्रतिक्रिया येतात हे चाचपण्यासाठी असे सेमिनार हो ऊशकतात तसेच निर्णय जाहीर करायचे ठरलेच असेल् अतर त्याची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीही अशी व्यासपीठे वापरली जातात. कसेही असले तरी हा मुद्दा २००५ - २००६ नंतर पुन्हा एकदा चर्चेच्या वादळात आहे हे मात्र नक्की. 

म्हणूनच कसेही बघितले तरी बलुचींच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शक्तींना अचानक रस निर्माण झाला आहे असे पुढे येत आहे. अर्थातच ही अवस्था पाकिस्तानच्या मुळावर येणारी आहे. कारण इराणमधील बलुच प्रांत सोडा पण पाकिस्तानामधले बलुच फुटले तर सिंध - पश्तुनिस्तान वेगळे व्हायला कितपत वेळ लागेल्? पाकव्याप्त काश्मिरही अलग होईल अशी व्यूहरचाना दिसते. गळू पिकते आहे. फुटेल कधी?  थोडी वाट तर पहा ना. 

माकडाची शेपूट पाचरीत - भाग १


Reality of Jamat-e-Islami


माकडाची शेपूट पाचरीत - भाग १

एप्रिल २०१७ च्या मध्यानंतर पाकिस्तानचे निवृत्त जनरल राहिल शरीफ सौदी अरेबिया पुरस्कृत ४१ देशांच्या संयुक्त लश्करी आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी सौदीची राजधानी रियाध येथे पोहोचले. आजपर्यंत पाकिस्तानने या आघाडीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याचे टाळले होते. सौदी अरेबियाने पुढाकार घेतलेल्या ह्या आघाडीशी मतभेद आहेत म्हणून नव्हे तर ह्या आघाडीचा जो मूळ उद्देश आहे तोच पाकिस्तानच्या मुळावर बेतणार याची त्यांना खात्री आहे. ह्याच भीतीमुळे आजवर पाकिस्तानने जे करण्याचे टाळले ते आता त्यांना करावे लागले आहे. कारण आजवर सौदी मेव्याची मजा तर चाखून झालेली आहेच आता त्याचे चटके सोसण्यापासून सुटका व्हायची कशी?

वरकरणी दहशतवाद विरोध म्हणून उभारण्यात आलेली ही आघाडी वास्तवात शियांच्या संघटनांशी लढत आहे. आणि तिचे पहिले आव्हान आहे अर्थातच येमेनमध्ये आणि दुसरे खुद्द इराणमध्ये. ह्या आघाडीला ज्या संघटनांशी लढायचे आहे त्या शिया संघटनांच्या मागे सिरिया आणि खास करून इराण भक्कम रीत्या पाठीशी उभे आहेत. इराणच्या धर्मसत्तेशी सौदी राजघराण्याचे उभे वैर आहे. एक ना एक दिवस इराण आपल्या घराण्याची सत्ता संपुष्टात आणून येथील राजसत्ता हाती घे ईल याची त्यांना खात्री आहे. सौदी अरेबियाचे राजघराणे सुन्नी आहे आणि जगभरात आपले अत्यंत कर्मठ वहाबी तत्वज्ञन पसरवण्यासाठी घसघशीत मदत पाठवत असते. कधी ना कधी आपला आणि शिया राजसतांचा संघर्ष होणार आणि त्यावेळी जगामधल्या सर्व सुन्नी मुसलमानांनी आपल्या मदतीसाठी यावे याची भक्कम तयारी सौदी गेली कित्येक वर्षे करत आला आहे. सौदी अरेबिया असो की इराण - यांना दहशतवादाचे वावडे नाही. त्यामुळे सौदीने अशा प्रकारची आघाडी करावी हेच हास्यास्पद आहे. या विषयामधला सौदीचा प्रवास बघितला तर त्यांच्या आजच्या कृत्याचे आपल्याला काहीही आश्चर्य वाटणार नाही. 

सद्दाम हुसेनने जेव्हा कुवेटवर आक्रमण केले तेव्हा सौदी अरेबिया घाबरला होता. आत पुढचे पाऊल म्हणून सद्दाम आपल्याकडे लक्ष वळवणार या भीतीने त्यांची गाळण उडाली होती. तो काळ असा होता की अमेरिकेला हवे म्हणून सद्दामने नुकतेच इराणशी छेडलेले आठ वर्षीय युद्ध संपुष्टात आले होते. आणि अफगाणिस्तानामधून रशियन सैन्य माघारी परतले होते. आता आपण कुवेट गिळंकृत केला तर अमेरिका मध्ये पडणार नाही असा त्याला विश्वास असावा. पण तसे झाले नाही. सौदी राजाने आपल्या भीतीपोटी अमेरिकन सैन्याला सौदी भूमीवरती पाचारण केले. (ह्याच मुद्द्यावरून तर सौदी राजाचे आणि ओसामा बिन लादेनचे अखेरचे वाजले. ओसामा म्हणत होता की सद्दामच्या प्रतिकारासाठी मी स्वतः मुजाहिदीन एकत्र करून लढा देतो. समोर सुन्नी मुजाहिदीन पहिले तर सद्दमचे सैन्य त्याचे आदेश पाळणार नाही - लढणार नाही. ह्या एका कारणासाठी तुम्ही अमेरिकन राक्षस ह्या पवित्र भूमीवरती बोलावू नका. इथेच मक्का आणि मदिना आहेत त्या भूमीवरती परके सैन्य नको. पण सौदीच्या राजाने त्याचे ऐकले नाही. अमेरिकन सैन्य तिथे येऊन बसले ते आजतागायत.) इतकेच नव्हे तर सप्टेंबर ११ च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानामध्ये तालिबानांना हुसकून झाल्यावरती सौदीच्या राजघराण्यानेच अध्यक्ष बुश यांना इराकवर हल्ला करायला भाग पाडले. पेट्रोलसाठी मध्यपूर्वेवर अवलंबून असलेल्या अमेरिकेला तसे करणे भाग पडले. (आज तेलाच्या स्वतःच्या उपयोगासाठी अमेरिका मध्यपूर्वेवर अवलंबून नाही.) ह्याचा सगळा दोष बुश यांच्या माथी मारण्यात आला पण मुळात सौदीकडे वाकडी नजर करण्याची हिंमत दाखवणारा सद्दाम सौदील नको होता. शिवाय शिया बहुल देशामध्ये सुन्नींना त्रास होऊ नये म्हणून सौदीने अमेरिकेला मध्ये घालून तेथील राजसत्तेमध्ये शियांसोबत सुन्नी देखील घ्यायला भाग पाडले. 

तेव्हा शिया सुन्नी हा संघर्ष काही नवा नाही. आणि त्यामधली सौदी अरेबियाची आणि इराणची भूमिकाही नवी नाही. मग आताच्या संघर्षात नवे काय आहे? नवीन आहे ती पाकिस्तानची शेपटी. सौदी अरेबियाकडून घेतलेल्या पैशावरती आजवर पाकिस्तानने अण्वस्त्रांचा कार्यक्रम राबवला आहे. त्याच मदतीवरती त्याच्या वहाबी तत्वञ्ञानाने प्रणित मदरसा आणि दहशतवादी संघटना चालवल्या जातात. इराक लिबिया सिरिया आदि देशांमध्ये चालणार्‍या संघर्षामध्ये सुन्नी गटांना आधुनिक हत्यारे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम पाकिस्तानचे लश्करी अधिकारीच करत आले आहेत. पण ह्या सगळ्याच्या मागे ’Deniability' चा बुरखा होता - मी नाही त्यातली म्हणायला मोकळे राहू अशा पद्धतीवर पाकिस्तान हे काम करत होता. आज मात्र सौदीने दबाव टाकून पाकिस्तानला आपल्या युद्धामध्ये सक्रिय ओढले आहे आणि लढ्याचे नेतृत्वही स्वीकारायला लावले आहे. ह्यामधून जो पेच पाकिस्तानसमोर उभा राहिला आहे त्याची सौदीला जराही क्षिती नाही. 

खुद्द पाकिस्तानमध्ये आणि पाकव्याप्त काश्मिरात मोठ्या प्रमाणावर शिया राहतात. पाकिस्तानमध्ये गेल्या तीन वर्षामध्ये जे वारंवार बॉंम्ब हल्ले होतात ते बव्हंशी शिया सुन्नी वादामधून करण्यात येतात. पकिस्तानचा सर्वात खळबळ असलेला प्रांत बलुचिस्तान येथे शिया बव्हंशी आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुन्नींच्या आघाडीचे नेतृत्व करणे म्हणजे स्वताःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. आघाडीत आपण गेलोच तर त्याची इराण विरोधाची धार बोथट करू अशी गाजरे पाकिस्तान खात होता आणि स्वतःची समजूत काढत होता. पण सौदीचे इराणवरचे आक्षेप आगदी मुळाशी जाणारे आहेत आणि ते आजही तसेच धारदार आहेत. उदाहरणार्थ सौदीच्या सरकारचे अधिकृत चॅनेल मिडल इस्ट ब्रॉडकास्टींग टेलेव्हिजन नेटवर्क वरती बोलताना सौदी राजपुत्र आणि संरक्षण मंत्री मोहम्मद म्हणाले की इराणी लोक असे मानतात की इमाम माहदी अवतीर्ण होतील आणि त्यांच्या आगमानच्या प्रतीक्षेत असलेल्या जगामध्ये त्यांना मुस्लिम जगतावर राज्य करता यावे म्हणून अनुकूल पार्श्वभूमी तयार करणे आपले काम आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याशी सुसंवाद कसा साधता ये ईल? सहकार्य कसे करता ये ईल? असा प्रश्न विचारत राजपुत्र मोहम्मद यांनी इराणशी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला. पुढे युद्ध झालेच तर ते इराणच्या भूमीवर हो ईल असेही सांगायला ते विसरले नाहीत. राजपुत्र मोहम्मद यांचा इशारा अर्थातच होता चीन आणि भारताकडे. इराणशी युद्ध छेडले गेलेच तर त्यामध्ये भारत आणि चीन यांनी पडू नये असे राजपुत्राला सुचवायचे असावे. 

सौदीचे गुप्तहेर प्रमुख आणि त्याचे अमेरिका आणि ब्रिटन येथील राजदूत राजपुत्र तुर्की अल फ़ैसल हे पॅरिसमध्ये एका संमेलनामध्ये गेले होते. इराणमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या इराणी नागरिकांनी ते आयोजित केले होते. People’s Mujahedin Organization of Iran or Mujahedin-e-Khalq ही ह्या लोकांची संघटना फ्रान्स येथून काम करते. तिचे लागेबांधे अगदी १९७९ मध्ये इराणच्या शहाला हुसकावून लावण्याच्या वेळेपर्यंतचे आहेत. इराणमधील सध्याची  सत्ता उलथून लावण्याचे ही संघटना प्रयत्न करते. त्यांच्या संमेलनामध्ये जाऊन तुर्की म्हणाले की इराणची सत्ता मलाही नको आहे. तुमच्या प्रयत्नांना भविष्यात जरूर यश ये ईल."

इतकी स्पष्ट भूमिका घेणारा सौदी पकिस्तानसाठी आपले म्हणणे बदलेल ही एक कविकल्पना होती. असेही पाकिस्तानचे आणि इराणचे पटणे कठिण असते. हल्ली हल्ली सुद्धा तुम्ही पाक - इराण सीमेवरती होणार्‍या कुरापतींबद्दल वाचले असेल. जी अवस्था भारत पाक सीमेची आहे तीच इराण पाक सीमेची आहे. इराणचा राजदूत पाकिस्तानाता निर्घृणपणे मारला गेला आणि त्या हल्ल्यामागे पाकिस्तानची आय एस आय होती असा आरोप इराण करत होता. त्यामुळे हल्लेखोरांवर कारवाई अशक्यच. तेव्हा सौदी जर इराणवर आक्रमण करण्याच्या मनःस्थितीमध्ये असेल तर पाकिस्तानची अवस्था काय होईल याचा विचार करा. असा हल्ला करण्याची योजना काय असावी ती पुढील भागात पाहू. 

स्वाती तोरसेकर